शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

४६ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By admin | Updated: July 10, 2017 00:48 IST

जिल्ह्यात गत आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पेरणीच्या कामांना जोर आला होता. पाऊस येताच शेतकऱ्यांनी रखडलेली सोयाबीनची पेरणी केली.

पावसाची दडी : २.३७ लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात गत आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पेरणीच्या कामांना जोर आला होता. पाऊस येताच शेतकऱ्यांनी रखडलेली सोयाबीनची पेरणी केली. पेरलेले सोयाबीन अंकुरले; मात्र गत चार दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीने व रोजच तापत असलेल्या उन्हामुळे सोयाबीनचे उगविलेले अंकूर करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांचाही धीर खचत आहे.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २ लाख ३७ हजार २५४ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यात १ लाख ६० हजार १२८ हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. तर पावसाच्या अनियमिततेमुळे आतापर्यंत केवळ ४५ हजार ९९० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर ३० हजार ६९६ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. शेतात अंकुरलेली कपाशी आणि सोयाबीनची झाडे पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. जुलै महिना मध्यात पोहोचला. या काळापर्यत खरीपाच्या पेरण्या पूर्ण होत असल्याच्या नोंदी कृषी विभागात यापूर्वीच्या काळात झाल्या आहेत. यंदा मात्र चित्र उलटल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी यंदा पावसाच्या लहरीपणावर विश्वास ठेवत नसल्याचे दिसून आले. वेळोवळी पावसाने दिलेल्या दडीमुळे यंदा शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठच केल्याचे दिसून आले आहे. प्रारंभीपासूनच जिल्ह्यातील शेतकरी पावसानंतरच पेरणी म्हणत आहे. यंदा पाऊस आल्यानंतर पेरणीला प्रारंभ झाला; मात्र गत चार पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा पेरणीला ब्रेक बसल्याचे वास्तव आहे. झालेल्या पेरण्या अंकुरल्या असून या उन्हामुळे आणि पाऊस नसल्यामुळे या पेरण्या कोमेजल्या असून ही रोपटी आता करपण्याच्या मार्गावर आली आहेत. कापूस उत्पादकांवर दुबार, तिबार पेरणीचे सावट कापूस उत्पादकांचा पट्टा असलेल्या वर्धा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवत जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादकांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे लावगड केलेली कपाशी अंकुरली. यानंतर मात्र पावसाने मारलेल्या दडीमुळे उगविलेली कपाशी करण्याचा प्रकार झाला. ज्यांच्या शेतात सिंचनाची सोय होती त्यांनी स्प्रिंकलर व ठिंबक सिंचनाच्या मदतीने पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यांच्याकडे याची सोय नव्हती अशांवर दुबार आणि आता तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची कंबर मोडली असून असलेले वातावरण कोरड्या दुष्काळाचे संकेत देत असल्याचे चित्र आहे. स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिंकलरचा वापर करून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडे याची सोय नाही ते शेतकरी आकाशाकडे नजरा लावून आहेत. सोयाबीनची उतारी कमी होणार ? सोयाबीन अंकुरल्यानंतर पावसाची गरज आहे. पाऊस आल्यास सोयाबीनची वाढ उत्तम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तीन महिन्याच्या असलेल्या या पिकाला वेळीच पाणी आणि खत मिळाल्यास उत्तम उत्पादन येण्याची शक्यता आहे. यंदा मात्र तसे होणार नसल्याचे संकेत दिसत आहे. पावसाने मारलेल्या या दडीने सोयाबीनची उतारी कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.