शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४६ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

By admin | Updated: July 10, 2017 00:48 IST

जिल्ह्यात गत आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पेरणीच्या कामांना जोर आला होता. पाऊस येताच शेतकऱ्यांनी रखडलेली सोयाबीनची पेरणी केली.

पावसाची दडी : २.३७ लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात गत आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पेरणीच्या कामांना जोर आला होता. पाऊस येताच शेतकऱ्यांनी रखडलेली सोयाबीनची पेरणी केली. पेरलेले सोयाबीन अंकुरले; मात्र गत चार दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीने व रोजच तापत असलेल्या उन्हामुळे सोयाबीनचे उगविलेले अंकूर करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांचाही धीर खचत आहे.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २ लाख ३७ हजार २५४ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यात १ लाख ६० हजार १२८ हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. तर पावसाच्या अनियमिततेमुळे आतापर्यंत केवळ ४५ हजार ९९० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर ३० हजार ६९६ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. शेतात अंकुरलेली कपाशी आणि सोयाबीनची झाडे पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. जुलै महिना मध्यात पोहोचला. या काळापर्यत खरीपाच्या पेरण्या पूर्ण होत असल्याच्या नोंदी कृषी विभागात यापूर्वीच्या काळात झाल्या आहेत. यंदा मात्र चित्र उलटल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी यंदा पावसाच्या लहरीपणावर विश्वास ठेवत नसल्याचे दिसून आले. वेळोवळी पावसाने दिलेल्या दडीमुळे यंदा शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठच केल्याचे दिसून आले आहे. प्रारंभीपासूनच जिल्ह्यातील शेतकरी पावसानंतरच पेरणी म्हणत आहे. यंदा पाऊस आल्यानंतर पेरणीला प्रारंभ झाला; मात्र गत चार पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा पेरणीला ब्रेक बसल्याचे वास्तव आहे. झालेल्या पेरण्या अंकुरल्या असून या उन्हामुळे आणि पाऊस नसल्यामुळे या पेरण्या कोमेजल्या असून ही रोपटी आता करपण्याच्या मार्गावर आली आहेत. कापूस उत्पादकांवर दुबार, तिबार पेरणीचे सावट कापूस उत्पादकांचा पट्टा असलेल्या वर्धा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवत जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादकांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे लावगड केलेली कपाशी अंकुरली. यानंतर मात्र पावसाने मारलेल्या दडीमुळे उगविलेली कपाशी करण्याचा प्रकार झाला. ज्यांच्या शेतात सिंचनाची सोय होती त्यांनी स्प्रिंकलर व ठिंबक सिंचनाच्या मदतीने पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यांच्याकडे याची सोय नव्हती अशांवर दुबार आणि आता तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची कंबर मोडली असून असलेले वातावरण कोरड्या दुष्काळाचे संकेत देत असल्याचे चित्र आहे. स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिंकलरचा वापर करून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडे याची सोय नाही ते शेतकरी आकाशाकडे नजरा लावून आहेत. सोयाबीनची उतारी कमी होणार ? सोयाबीन अंकुरल्यानंतर पावसाची गरज आहे. पाऊस आल्यास सोयाबीनची वाढ उत्तम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तीन महिन्याच्या असलेल्या या पिकाला वेळीच पाणी आणि खत मिळाल्यास उत्तम उत्पादन येण्याची शक्यता आहे. यंदा मात्र तसे होणार नसल्याचे संकेत दिसत आहे. पावसाने मारलेल्या या दडीने सोयाबीनची उतारी कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.