शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१७ टक्के क्षेत्रात दुबार पेरणी

By admin | Updated: June 25, 2017 00:34 IST

यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे.

पावसाची दडी : पुन्हा सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे. आष्टीसह तालुक्यात १७ टक्के पेरण्या फसल्या आहेत. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे व पेरणी खर्चाकरिता बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराची पायरी गाठून जुगाड करावे लागणार असल्याचे दिसते. मागील वर्षी कापूस व तुरीला योग्य भाव मिळाला नाही. शासनाच्या लेटलतिफ धोरणाचा फटका उत्पन्नाला बसला आहे. यामुळे शेतकरी धायकुतीस आले आहेत. मोठ्या कालावधीनंतर कर्जमाफीची घोषणा झाली; पण बँकांना अद्याप आदेश आले नाहीत. त्याचा फटका कर्ज वाटपालाही बसला आहे. १० हजार रुपये नगदी देण्याचा निर्णयही अद्याप कागदावरच आहे. यामुळे पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जून महिना जवळपास संपत आला आहे. जुलै महिन्यात पाऊस काय करतो, यावर शेतकऱ्यांचे गणित अवलंबून आहे. तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेटकर यांना पेरणीबाबत विचारणा केली असता तीन दिवस झालेला पावसाळा गृहित धरून १७ टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने स्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांनी चांगला, समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन पेटकर यांनी केले आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली आहे. यामुळे पावसावर सर्वकाही अवलंबून आहे. अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. या गटातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीकरिता प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते. शासनाने आदेश बँकांपर्यंत पोहोचविले नाहीत. यामुळे मोठी तारांबळ उडत आहे. शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर कर्जमाफी आदेश आल्यानंतरच नवीन कर्ज देणार असल्याचे बँक आॅफ इंडिया व भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे. पाच एकरावरील शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरल्याने तत्सम शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येणार आहे. खरीप हंगामातील लगबग सुरू झाली तरी सर्व काही पावसावर अवलंबून आहे. आष्टी तालुक्यात पाऊस यावा म्हणून शेतकरी धोंडी काढत आहे. ग्रामीण भागात विविध नवस पूर्ण केले जात आहे. कर्जातील विलंबाचाही पेरणीवर परिणाम आष्टी तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व को-आॅपरेटीव्ह बँक बंद झाल्याने कर्जाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने कर्जमाफी दिल्यावर या बँकेला फायदा होईल; पण राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास विलंब लावू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभविण्याची मागणी शेतकरी करीत आहे. नोड्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कर्जाची प्रकरणे मंजूर होऊ शकतात. त्याचाही परिणाम पेरणीवर होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती; पण प्रारंभीच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत. त्यांना विलंब झाल्यास उत्पादनावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.