शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

१७ टक्के क्षेत्रात दुबार पेरणी

By admin | Updated: June 25, 2017 00:34 IST

यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे.

पावसाची दडी : पुन्हा सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे. आष्टीसह तालुक्यात १७ टक्के पेरण्या फसल्या आहेत. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे व पेरणी खर्चाकरिता बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराची पायरी गाठून जुगाड करावे लागणार असल्याचे दिसते. मागील वर्षी कापूस व तुरीला योग्य भाव मिळाला नाही. शासनाच्या लेटलतिफ धोरणाचा फटका उत्पन्नाला बसला आहे. यामुळे शेतकरी धायकुतीस आले आहेत. मोठ्या कालावधीनंतर कर्जमाफीची घोषणा झाली; पण बँकांना अद्याप आदेश आले नाहीत. त्याचा फटका कर्ज वाटपालाही बसला आहे. १० हजार रुपये नगदी देण्याचा निर्णयही अद्याप कागदावरच आहे. यामुळे पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जून महिना जवळपास संपत आला आहे. जुलै महिन्यात पाऊस काय करतो, यावर शेतकऱ्यांचे गणित अवलंबून आहे. तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेटकर यांना पेरणीबाबत विचारणा केली असता तीन दिवस झालेला पावसाळा गृहित धरून १७ टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने स्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांनी चांगला, समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन पेटकर यांनी केले आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली आहे. यामुळे पावसावर सर्वकाही अवलंबून आहे. अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. या गटातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीकरिता प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते. शासनाने आदेश बँकांपर्यंत पोहोचविले नाहीत. यामुळे मोठी तारांबळ उडत आहे. शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर कर्जमाफी आदेश आल्यानंतरच नवीन कर्ज देणार असल्याचे बँक आॅफ इंडिया व भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे. पाच एकरावरील शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरल्याने तत्सम शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येणार आहे. खरीप हंगामातील लगबग सुरू झाली तरी सर्व काही पावसावर अवलंबून आहे. आष्टी तालुक्यात पाऊस यावा म्हणून शेतकरी धोंडी काढत आहे. ग्रामीण भागात विविध नवस पूर्ण केले जात आहे. कर्जातील विलंबाचाही पेरणीवर परिणाम आष्टी तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व को-आॅपरेटीव्ह बँक बंद झाल्याने कर्जाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने कर्जमाफी दिल्यावर या बँकेला फायदा होईल; पण राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास विलंब लावू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभविण्याची मागणी शेतकरी करीत आहे. नोड्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कर्जाची प्रकरणे मंजूर होऊ शकतात. त्याचाही परिणाम पेरणीवर होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती; पण प्रारंभीच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत. त्यांना विलंब झाल्यास उत्पादनावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.