शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

१७ टक्के क्षेत्रात दुबार पेरणी

By admin | Updated: June 25, 2017 00:34 IST

यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे.

पावसाची दडी : पुन्हा सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे. आष्टीसह तालुक्यात १७ टक्के पेरण्या फसल्या आहेत. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे व पेरणी खर्चाकरिता बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराची पायरी गाठून जुगाड करावे लागणार असल्याचे दिसते. मागील वर्षी कापूस व तुरीला योग्य भाव मिळाला नाही. शासनाच्या लेटलतिफ धोरणाचा फटका उत्पन्नाला बसला आहे. यामुळे शेतकरी धायकुतीस आले आहेत. मोठ्या कालावधीनंतर कर्जमाफीची घोषणा झाली; पण बँकांना अद्याप आदेश आले नाहीत. त्याचा फटका कर्ज वाटपालाही बसला आहे. १० हजार रुपये नगदी देण्याचा निर्णयही अद्याप कागदावरच आहे. यामुळे पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जून महिना जवळपास संपत आला आहे. जुलै महिन्यात पाऊस काय करतो, यावर शेतकऱ्यांचे गणित अवलंबून आहे. तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेटकर यांना पेरणीबाबत विचारणा केली असता तीन दिवस झालेला पावसाळा गृहित धरून १७ टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने स्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांनी चांगला, समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन पेटकर यांनी केले आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली आहे. यामुळे पावसावर सर्वकाही अवलंबून आहे. अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. या गटातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीकरिता प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते. शासनाने आदेश बँकांपर्यंत पोहोचविले नाहीत. यामुळे मोठी तारांबळ उडत आहे. शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर कर्जमाफी आदेश आल्यानंतरच नवीन कर्ज देणार असल्याचे बँक आॅफ इंडिया व भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे. पाच एकरावरील शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरल्याने तत्सम शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येणार आहे. खरीप हंगामातील लगबग सुरू झाली तरी सर्व काही पावसावर अवलंबून आहे. आष्टी तालुक्यात पाऊस यावा म्हणून शेतकरी धोंडी काढत आहे. ग्रामीण भागात विविध नवस पूर्ण केले जात आहे. कर्जातील विलंबाचाही पेरणीवर परिणाम आष्टी तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व को-आॅपरेटीव्ह बँक बंद झाल्याने कर्जाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने कर्जमाफी दिल्यावर या बँकेला फायदा होईल; पण राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास विलंब लावू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभविण्याची मागणी शेतकरी करीत आहे. नोड्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कर्जाची प्रकरणे मंजूर होऊ शकतात. त्याचाही परिणाम पेरणीवर होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती; पण प्रारंभीच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत. त्यांना विलंब झाल्यास उत्पादनावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.