शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भूईमुंगाचा पेरा ३९.२६ टक्के

By admin | Updated: April 2, 2017 00:54 IST

सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांत भाजीपाला, सूर्यफूल यासह मोठ्या प्रमाणात भूईमुंग पिकाची लागवड करतात.

यंदा १६२० हेक्टरचे नियोजन : गतवर्षी ३४९८ हेक्टरमध्ये होती पेरणी वर्धा : सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांत भाजीपाला, सूर्यफूल यासह मोठ्या प्रमाणात भूईमुंग पिकाची लागवड करतात. यंदा १ हजार ६२० हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा जिल्ह्यातील कृषी विभागाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३६ हेक्टरमध्ये भूईमुंगाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ३९.२६ इतकी आहे. गतवर्षी ३ हजार ४९८ हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड करण्यात आली होती. भूईमुंग पीक घेण्यासाठी हलकी, मध्यम प्रतीची, सेंद्रीय पदार्थ व कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेली तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी शेतजमीन लागते. गतवर्षी जिल्ह्यात एकूण १ हजार ६२० हेक्टर इतके उन्हाळी भूईमुंगाचे नियोजित क्षेत्र होते; पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भूईमुंग पिकाला प्रथम प्राधान्य दिल्याने त्यावेळी एकूण ३ हजार ४९८ हेक्टरमध्ये लागवड झाली. आर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ४५ हेक्टरमध्ये सूर्यफूलाचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या वर्षी मागील वर्षी इतक्याच क्षेत्रात भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६३६ हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीपर्यंत कृषी विभागानेच भूईमुंग उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून दिले होते; पण यंदा कृषी विभागाच्या सहकार्याने महाबीज सोबत समन्वय साधून ६० टक्के दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भूईमुंग पिकाकडील कल वाढावा म्हणून कृषी विभागाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.(शहर प्रतिनिधी) सेलू तालुक्यात होती सर्वाधिक लागवड मागील वर्षी जिल्ह्यात १ हजार ६२० हेक्टरमध्ये भूईमुंग पिकाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. यात सेलू तालुक्यात सर्वाधिक २ हजार २०० हेक्टरचा पेरा झाला होता. आर्वी तालुक्यात ५२५ हेक्टर, कारंजा (घा.) १९७, आष्टी (श.) २०९, वर्धा १२०, देवळी २३५ तर समुद्रपूर तालुकयात १२ हेक्टरमध्ये उन्हाळी भूईमुंगाचे पीक घेण्यात आले. त्याची टक्केवारी २३३ इतकी होती.