नाचणगाव : सिंचनासाठी शेतकरी विहिरीवर कृषी पंप लावतात़ यासाठी वीज जोडणी घेतात; पण यात वीज कंपनी शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे दिसते़ येथील एका शेतकऱ्यास प्राप्त बिल व मिटरच्या प्रत्यक्ष रिडींगमध्ये तफावत आढळून आल्याने हा प्रकार समोर आला़गावातील शेतकऱ्यांना मिळणारे कृषी पंपाचे वीज बिल व प्रत्यक्षातील रिडींग यात तफावत आहे. कृषी पंपाचे देयक हे त्या शेतात पंपावर असलेल्या मिटरमधील चालू व जुन्या रिडींगमधून वजा करून ठरविले जाते; पण महावितरणने शेतात न जाता परस्पर कृषी पंपाची देयके दिलीत़ काही शेतकऱ्यांनी याबाबत कंपनीला सूचना केल्या; पण त्यावर तोडगा निघाला नाही. ही बाब लक्षात आलेल्या शेतकऱ्यांनी ती वीज कंपनीला कळविली; पण जे यापासून अनभिज्ञ आहे, त्या शेतकऱ्यांची लूट कायम आहे़ शासन विविध योजनांतून शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास प्रोत्साहित करते; पण अवाढव्य बिल देत महावितरण शेतकऱ्यांची लूट करीत आहे. या प्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे़(वार्ताहर)
कृषिपंपाचे वीज देयक ठरतेय लुटीचे स्त्रोत
By admin | Updated: January 6, 2015 23:05 IST