शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

आॅनलाईन फसवणुकीत शासनाकडून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 01:58 IST

सध्या आॅनलाईन खरेदीसह व्यवहाराची प्रथा वाढत आहे. यात अनेकांना गंडा बसतो. काहींना एटीएमचा पासवर्ड विचारून गंडविले जाते.

रक्कम परत मिळण्याची संधी : वर्धेत सात महिन्यात २३ जणांना ११.८५ लाखांचा गंडा रूपेश खैरी वर्धासध्या आॅनलाईन खरेदीसह व्यवहाराची प्रथा वाढत आहे. यात अनेकांना गंडा बसतो. काहींना एटीएमचा पासवर्ड विचारून गंडविले जाते. यात अनेकांना लाखोंचा चूना लागतो. अशा आॅनलाईन फसगत झालेल्या नागरिकांना आपली रक्कम गेली, ती आता परत मिळणार नाही, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण अशा फसवणुकीत नागरिकांना चिंता करण्याची गरज नाही. आॅनलाईन व्यवहारात झालेल्या फसवणुकीची रक्कम नागरिकांना देण्याची सवलत शासनाच्यावतीनेच दिली आहे. याचा लाभ घेण्याकरिता आॅनलाईन फसगत झालेल्या नागरिकांना केवळ सायबर सेलच्या माध्यमातून मंत्रालयात असलेल्या ‘सचिव, माहिती व तंत्रज्ञान संचालक’ यांच्या नावे अर्ज करण्याची गरज आहे. हा अर्ज करताना त्यांना शासनाने या संदर्भात दिलेल्या नियमानुसार काही रक्कम भरावी लागते. ही रक्कम भरून केलेल्या अर्जाची तपासणी होवून नागरिकांना चोरट्यांनी लांबविलेली रक्कम मिळण्याची संधी आहे. ही संधी केवळ आॅनलाईन फसगत झालेल्यांकरिताच आहे. ज्या कुणी आमिषाला बळी पडून बॅकेत जात रक्कम भरली त्यांना मात्र या सुविधेचा लाभ होत नाही. या सुविधेची माहिती अनेकांना नसल्याचे दिसून आले आहे. वर्धेत गत सात महिन्यात एटीएमच्या माध्यमातून २३ जणांना एकूण ११ लाख ८५ हजार ३५२ रुपयांनी गंडा बसल्याची नोंद आहे. या पैकी दोन गुन्ह्यातील १ लाख ८० हजार रुपये वसूल झाले आहे. यातील एक लाख २५ हजार ७०० रुपये कंपनीकडून वसूल करण्यात आले आहे. यात आतापर्यंत केवळ तिघांनाच अटक केल्याची माहिती आहे. अशा प्रकारात झालेल्या फसवणुकीचा शोध लागणे तसे कठीणच. रक्कम मिळविण्याकरिता रकमेनुसार भरावे लागणारे शुल्कफसवणुकीत गेलेली रक्कम मिळविण्याकरिता नागरिकांना गुन्हा दाखल असलेल्या जिल्ह्याच्या सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून अर्ज करण्याची गरज आहे. या अर्जाची किंमत ५० रुपये आहे. हा अर्ज थेट केल्यास कुठलाही लाभ होणार नाही. तो सायबर सेलच्या माध्यमातूनच होणे आवश्यक आहे. शुल्क भरण्याचा नियम १० हजार रुपयांपर्यंत गंडा बसल्यास अर्ज करताना रकमेच्या १० टक्के शुल्क भरावा लागणार आहे.१० ते ५० हजार रुपयापर्यंतच्या नुकसानाकरिता १ हजार रुपयासंह रकमेनुसार ५ टक्के शुल्क भरणे गरजेचे आहे.५० हजार ते १ लाख रुपयांकरिता ३ हजार रुपये आणि रकमेच्या चार टक्के शुल्क तर एक लाखा पेक्षा अधिक रक्कम असल्यास ५ हजार रुपये आणि रकमेच्या दोन टक्के शुल्क भरावे लागतील.माहिती असतानाही फसगत तुमचा एटीएम क्रमांक ब्लॉक झाला, तुुम्हाला नवा क्रमांक देण्यात येत आहे. असे म्हणत एटीएमचा पासवर्ड विचारून फसवणूक करण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. अशा घटना घडत असल्याची माहिती नागरिकांना असली तरी अशा थापांना ते बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतात टॉवर उभारण्यासंदर्भात पैशाची मागणी करून लाभ देण्याच्या आमिषाने फसविल्याच्या घटनाही समोर येत आहे. यापासून नागरिकांनी सावधान राहण्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून जनजागृती एटीएमच्या माध्यमातून फसगत झाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या, त्याच्या तक्रारीही पोलिसात आहे. त्यांचा तपास लागणे तसे कठीणच. मात्र पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. अशी फासगत होण्यापेक्षा नागरिकांनी सावधागिरी बाळगावी असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वर्धा पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रम म्हणून एसएमएस पाठविण्यात येत आहेत.