शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मंगलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी

By admin | Updated: August 25, 2015 02:46 IST

अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंगला वरठी हिच्या पतीने तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर कुऱ्हाडीने तिच्या शरिराचे

वर्धा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंगला वरठी हिच्या पतीने तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर कुऱ्हाडीने तिच्या शरिराचे तुकडे केले. शनिवारी सायंकाळी ही घटना उघड झाली. यात तिच्या पतीसह अनेक दारूविक्रेत्यांचा सहभाग आहे. यामुळे या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शहरातील सर्वच दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. मृतक मंगला वरठी ही दारूबंदी महिला मंडळाची सक्रिय सदस्य होती. त्यामुळे त्या भागातील अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांवर तिचा वचक होता. यामुळेच ती त्यांच्या निशाण्यावर होती. तिचा वर्धेतील विविध दारूबंदी मंडळाच्या स्थापनेमध्येही सहभाग होता. मोहन वरठी याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याचा दारूबंदी महिला मंडळामध्ये पत्नी मंगलाचा असण्याला विरोध होता. यापूर्वीही मोहनच्या मारहाणीविरोधात तिने शहर पोलीस ठाण्यात मंडळामार्फत तक्रार दिली होती. मोहन हा दारू विक्रेत्यांकडे दारू पिण्यास गेल्यावर दारूविक्रेते त्याला त्रास देत असत. यामुळे तो घरी येऊन मंगलासोबत भांडण करून मारहाण करीत होता. दारूबंदी महिला मंडळामध्ये मंगला सक्रीय असल्यामुळे व विविध भागातील दारूबंदी महिला मंडळ स्थापनेत तिचा सहभाग असल्याने अवैधरित्या दारू विकणाऱ्यांनी मोहनच्या मदतीने तिची हत्या केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. असे असताना तपास यंत्रणा आरोपीच्या बयाणावर विश्वास ठेवून ती चारित्र्यहीन असल्याच्या दिशेने तपास करीत आहे. चौकशीकरिता केवळ परिवारातील सदस्यांनाच ताब्यात घेऊन विचारणा करण्यात येत आहे. ती चारित्र्यहीन होती व तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलीस मृतकाच्या बहिणीवर व्यक्त करीत आहेत.या घटनेमुळे अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची हिंमत वाढली असून आता दारूविक्रेते खुलेआम महिलांना धमकावित असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी महिला मंडळे स्थापन करण्याची गरज पडणे, ही बाबच लाजिरवाणी आहे; पण त्यातही मंडळाला पोलिसांचे तितकेसे सहकार्य नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आम्ही जीव धोक्यात घालून दारूविक्रेत्यास मालासह पकडून देतो; पण ते सुटून आल्यावर पुन्हा नव्या जोमाने दारूविक्री सुरू करतात. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मंगलाच्या खऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी शोधून काढत त्यास त्वरित अटक करावी आणि सर्व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय सर्व दारूबंदी महिला मंडळातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याचीही मागणी करण्यात आली.यावेळी बिरसा मुंडा राणी दुर्गावती, जय महाकाली, जय भवानी, जय मॉँ वैष्णवी, जय मॉँ वैष्णौदेवी, जय सेवा, क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा या दारूबंदी महिला मंडळातील शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी माया कुमरे, अ‍ॅड. रेखा सुरोशे, पार्वती व इंदू कोकाटे, सुशिला परतेकी, गीता परतेकी, भारती मसराम, पूजा कोराम यासह शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.(शहर प्रतिनिधी)