शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मंगलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी

By admin | Updated: August 25, 2015 02:46 IST

अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंगला वरठी हिच्या पतीने तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर कुऱ्हाडीने तिच्या शरिराचे

वर्धा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंगला वरठी हिच्या पतीने तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर कुऱ्हाडीने तिच्या शरिराचे तुकडे केले. शनिवारी सायंकाळी ही घटना उघड झाली. यात तिच्या पतीसह अनेक दारूविक्रेत्यांचा सहभाग आहे. यामुळे या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शहरातील सर्वच दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. मृतक मंगला वरठी ही दारूबंदी महिला मंडळाची सक्रिय सदस्य होती. त्यामुळे त्या भागातील अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांवर तिचा वचक होता. यामुळेच ती त्यांच्या निशाण्यावर होती. तिचा वर्धेतील विविध दारूबंदी मंडळाच्या स्थापनेमध्येही सहभाग होता. मोहन वरठी याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याचा दारूबंदी महिला मंडळामध्ये पत्नी मंगलाचा असण्याला विरोध होता. यापूर्वीही मोहनच्या मारहाणीविरोधात तिने शहर पोलीस ठाण्यात मंडळामार्फत तक्रार दिली होती. मोहन हा दारू विक्रेत्यांकडे दारू पिण्यास गेल्यावर दारूविक्रेते त्याला त्रास देत असत. यामुळे तो घरी येऊन मंगलासोबत भांडण करून मारहाण करीत होता. दारूबंदी महिला मंडळामध्ये मंगला सक्रीय असल्यामुळे व विविध भागातील दारूबंदी महिला मंडळ स्थापनेत तिचा सहभाग असल्याने अवैधरित्या दारू विकणाऱ्यांनी मोहनच्या मदतीने तिची हत्या केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. असे असताना तपास यंत्रणा आरोपीच्या बयाणावर विश्वास ठेवून ती चारित्र्यहीन असल्याच्या दिशेने तपास करीत आहे. चौकशीकरिता केवळ परिवारातील सदस्यांनाच ताब्यात घेऊन विचारणा करण्यात येत आहे. ती चारित्र्यहीन होती व तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलीस मृतकाच्या बहिणीवर व्यक्त करीत आहेत.या घटनेमुळे अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची हिंमत वाढली असून आता दारूविक्रेते खुलेआम महिलांना धमकावित असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी महिला मंडळे स्थापन करण्याची गरज पडणे, ही बाबच लाजिरवाणी आहे; पण त्यातही मंडळाला पोलिसांचे तितकेसे सहकार्य नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आम्ही जीव धोक्यात घालून दारूविक्रेत्यास मालासह पकडून देतो; पण ते सुटून आल्यावर पुन्हा नव्या जोमाने दारूविक्री सुरू करतात. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मंगलाच्या खऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी शोधून काढत त्यास त्वरित अटक करावी आणि सर्व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय सर्व दारूबंदी महिला मंडळातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याचीही मागणी करण्यात आली.यावेळी बिरसा मुंडा राणी दुर्गावती, जय महाकाली, जय भवानी, जय मॉँ वैष्णवी, जय मॉँ वैष्णौदेवी, जय सेवा, क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा या दारूबंदी महिला मंडळातील शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी माया कुमरे, अ‍ॅड. रेखा सुरोशे, पार्वती व इंदू कोकाटे, सुशिला परतेकी, गीता परतेकी, भारती मसराम, पूजा कोराम यासह शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.(शहर प्रतिनिधी)