शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रत्येक तालुक्यात उभारणार माती परीक्षण प्रयोगशाळा

By admin | Updated: April 2, 2015 02:02 IST

शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, ...

वर्धा : शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.देवळी येथील नगर परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सव, शेतकरी मेळावा तसेच कृषी परिसंवादाचे उद्घाटन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व शेतकरी नेते पाशा पटेल होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि़प़ उपाध्यक्ष विलास कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, नगराध्यक्ष शोभा तडस, सभापती मिलिंद भेंडे, माजी उपाध्यक्ष राजेश बकाने, गटनेता विलास जोशी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर अवेळी पाऊस व गारपीटीचे संकट आले असताना शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देताना ना. अहिर म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली आहे़ राज्य सरकारद्वारे झालेल्या नुकसानीबाबत सर्वेक्षण सुरू आहे. शेतकऱ्यांना यापुढेही मदत देण्यासाठी केंद्र सरकार निश्चित भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मार्गदर्शन होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले़ पाशा पटेल यांनी जलसंधारण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजाणी करण्याची आवश्यकता असून प्रत्येक शेतात जलसंधारणाचा कार्यक्रम राबवावा, असे सांगितले़ खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. प्रकल्पाला गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे म्हणून कृषी मेळावा आयोजित केल्याचे खा. तडस म्हणाले.(प्रतिनिधी)