शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

प्रत्येक तालुक्यात उभारणार माती परीक्षण प्रयोगशाळा

By admin | Updated: April 2, 2015 02:02 IST

शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, ...

वर्धा : शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.देवळी येथील नगर परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सव, शेतकरी मेळावा तसेच कृषी परिसंवादाचे उद्घाटन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व शेतकरी नेते पाशा पटेल होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि़प़ उपाध्यक्ष विलास कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, नगराध्यक्ष शोभा तडस, सभापती मिलिंद भेंडे, माजी उपाध्यक्ष राजेश बकाने, गटनेता विलास जोशी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर अवेळी पाऊस व गारपीटीचे संकट आले असताना शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देताना ना. अहिर म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली आहे़ राज्य सरकारद्वारे झालेल्या नुकसानीबाबत सर्वेक्षण सुरू आहे. शेतकऱ्यांना यापुढेही मदत देण्यासाठी केंद्र सरकार निश्चित भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मार्गदर्शन होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले़ पाशा पटेल यांनी जलसंधारण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजाणी करण्याची आवश्यकता असून प्रत्येक शेतात जलसंधारणाचा कार्यक्रम राबवावा, असे सांगितले़ खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. प्रकल्पाला गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे म्हणून कृषी मेळावा आयोजित केल्याचे खा. तडस म्हणाले.(प्रतिनिधी)