शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

प्रत्येक तालुक्यात उभारणार माती परीक्षण प्रयोगशाळा

By admin | Updated: April 2, 2015 02:02 IST

शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, ...

वर्धा : शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.देवळी येथील नगर परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सव, शेतकरी मेळावा तसेच कृषी परिसंवादाचे उद्घाटन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व शेतकरी नेते पाशा पटेल होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि़प़ उपाध्यक्ष विलास कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, नगराध्यक्ष शोभा तडस, सभापती मिलिंद भेंडे, माजी उपाध्यक्ष राजेश बकाने, गटनेता विलास जोशी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर अवेळी पाऊस व गारपीटीचे संकट आले असताना शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देताना ना. अहिर म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली आहे़ राज्य सरकारद्वारे झालेल्या नुकसानीबाबत सर्वेक्षण सुरू आहे. शेतकऱ्यांना यापुढेही मदत देण्यासाठी केंद्र सरकार निश्चित भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मार्गदर्शन होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले़ पाशा पटेल यांनी जलसंधारण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजाणी करण्याची आवश्यकता असून प्रत्येक शेतात जलसंधारणाचा कार्यक्रम राबवावा, असे सांगितले़ खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. प्रकल्पाला गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे म्हणून कृषी मेळावा आयोजित केल्याचे खा. तडस म्हणाले.(प्रतिनिधी)