शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
4
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
5
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
6
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
7
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
8
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
9
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
10
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
11
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
12
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
13
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
14
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
15
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
16
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार
17
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
18
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
19
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
20
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार

रेतीसोबतच मातीची तस्करी

By admin | Updated: March 14, 2016 02:22 IST

जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती चोरी असताना त्यात माती ....

वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात : महसूल प्रशासनाचे दुर्लक्षवर्धा : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती चोरी असताना त्यात माती चोरट्यांनीही भर घालत नदी पात्राचे काठ ओरबडायला सुरूवात केली आहे. परिणामी, या नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. वर्धा नदीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आता वीटभट्टीसाठी माती चोरणाऱ्यांवरही अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे. पुलगाव परिसरातील घाटातील अवैध रेती चोरी ही सर्वश्रुत आहे. याच्याच भरवशावर अनेकांनी आपले पर्यायी व्यवसायही थाटले आहेत. सर्वांच्या डोळ्यादेखत तस्करीचा सावळागोंधळ सुरू असताना अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसते. आता परिसरात वीटभट्ट्यांचा व्यवसायही तेजीत सुरू आहे. अनेक विटाभट्टीधारकांनी नदीपात्राच्या काठावर, शासकीय जागेवर धुडगूस घालून माती चोरी सुरू केल्याचे दिसून येत आहे. परिसरातील मार्डा, सोरटा, पुलगाव, सौजना, आपटी, वाघोली, विटाळा, चाका, ओकनाथ येथील विटाभट्टीधारकांनी नदीचे काठ आणि शासकीय जमीन उखरून अवैधरीत्या माती चोरी सुरू केल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दिवसरात्र मातीचोरी सुरू असल्याने माती माफीयांनी शासनाच्या महसुलाची लयलूट सुरू केल्याचेच दिसून येते. यामुळे महसूल विभागाला आता माती चोरट्यांवरही कारवाईचे अस्त्र उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)