शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बलांच्या विकास योजनांच्या जनजागृतीसाठी सामाजिक समता सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:21 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी जगभरात साजरी करण्यात येत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील दुर्बल आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांकरिता .....

ठळक मुद्दे८ ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम : सहआयुक्तांना दोन तर प्रादेशिक आयुक्तांना मिळणार तीन लाख

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी जगभरात साजरी करण्यात येत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील दुर्बल आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांकरिता असलेल्या विकास योजनांची माहिती त्यांना व्हावी याकरिता ८ एप्रिलपासून राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे.हा सप्ताह साजरा करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना २ लाख तर प्रादेशिक स्तरावरील संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना ३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हा निधी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. या सप्ताहातील सहा दिवसात राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया योजनांची माहिती गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाज कल्याणसह सामाजिक संस्थांना दिली आहे.डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणे व गांभीर्याने नमुद केली आहे. कलम ४६ मध्ये ‘राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्यायावर सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे सरंक्षण करील’, असे नमूद आहे. या कलमाचा अंमल करण्याकरिता शासनाच्यावतीने हा सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय आहे.राज्यात एकाच वेळी उद्घाटन८ एप्रिलपासून राज्यभर सुरू होणाºया या सामाजिक सप्ताहाचे एकाच वेळी उद्घाटन करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहे. या सप्ताहात जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व जिल्ह्याचे माहिती अधिकारी यांना सदर कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सामावून घ्यावे, याकरिता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सर्व शासकीय अधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रीत करण्यात येणार आहे. या सप्ताहात विद्यार्थ्यांसह दुर्बल घटकांच्या विकासाकरिता असलेल्या सर्वच योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय विभागाने करणे अनिवार्य आहे.सप्ताहातील प्रत्येक दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावे याच्या सूचना संबंधीत विभागांना शासनाकडून करण्यात आल्या आहे. यानुसार हा सप्ताह साजरा होईल अशी अपेक्षा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने व्यक्त केली आहे.