शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

नाट्यगृहासाठी सरसावल्या सामाजिक संघटना

By admin | Updated: July 14, 2017 01:29 IST

मागील दोन दशकांपासून वर्धेकरांनी सांस्कृतिक सभागृहाची, संकुलाची सातत्याने मागणी केली आहे;

जिल्हा प्रशासनाला निवेदन : सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील दोन दशकांपासून वर्धेकरांनी सांस्कृतिक सभागृहाची, संकुलाची सातत्याने मागणी केली आहे; पण कलेचा वारसा लाभलेल्या वर्धा शहर तथा जिल्ह्याला नाट्यगृह लाभले नाही. प्रत्येकवेळी राज्य शासन व प्रशासनाने या मागणीला बगल दिली आहे. आता मात्र सामाजिक, सांस्कृतिक संघटना या मागणीसाठी पुन्हा एकदा सरसावल्या आहेत. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना गुरूवारी निवेदनही देण्यात आले.वर्धेकरांचा हक्क असलेल्या जिल्हा सांस्कृतिक सभागृहाची दीर्घ काळापासून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संघटनांना करावी लागत आहे. वर्धा नगरी आणि जिल्हा आकारमानाने लहान असला तरी सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आणि क्रियाशील आहे. हा जिल्हा अनेक चळवळींचे माहेरघर राहिला आहे. येथील उपक्रमांचे अनुकरण राज्यात केले जाते. वर्षभर साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, व्याख्यान, परिसंवाद, रंगचित्रे, छायाचित्रे, हस्तकला प्रदर्शन आदी अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात; पण आंतरराष्ट्रीय ख्याती असलेला गांधी जिल्हा सांस्कृतिक संकुलापासून अद्यापही वंचित आहे. राज्य शासनाने वर्धा जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारे नाट्यगृह, सभाकक्ष, कलादालन, उद्यान, वाहनतळ यांचा समावेश असणारे सांस्कृतिक संकुल निर्माण करावे. पूढील पिढीला आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाची तथा व्यक्तिमत्व विकासाची संधी द्यावी. जागा निश्चित केली असल्यास त्या जागेवर सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित जागा, असा फलकही त्वरित लावण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, अध्ययन भारतीचे हरिष इथापे, वसंत जळीत, सही फिल्मस्चे प्रा. गिरीष भोवरे, नई तालीम समितीचे प्रभाकर पुसदकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, निवृत्त अधिकारी भारतीय स्टेट बँक शत्रूघ्न मून, विदर्भ साहित्य संघ वर्धाचे सहसचिव प्रा. पद्माकर बाविस्कर, डॉ. राजेश देशपांडे, सेवा समितीचे उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांना पाठविण्यात आल्या आहेत.नाट्य तथा सिनेसृष्टीला कलावंत देणारा जिल्हाच उपेक्षितकला, अभिनयाचा वारसा जोपासणारा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. या जिल्ह्याने नाट्य तसे सिने सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. कुणी मराठी सिनेमामध्ये नाव केले तर कुणी हास्याच्या मैफलीमध्ये वर्धेची मान उंचावली. नाट्य क्षेत्रात तर वर्धेची अनेक नाटकेही गाजलेली आहेत. असे असताना सुमारे दोन दशकांपासून वर्धेकरांना सांस्कृतिक सभागृहापासून वंचित राहावे लागत आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागते. अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य संघटनांनी वर्धा जिल्ह्याला सांस्कृतिक संकूल मिळावे म्हणून प्रयत्न केलेत; पण शासन, प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले. आता पुन्हा एकदा हा मुद्दा रेटण्यात आला असून शासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.