शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजोपयोगी वृक्ष लागवड हितकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:12 IST

अवघड असलेले कार्य साध्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडाची चिकाटी ही स्तुत्य आहे. ५० टक्के जंगल नष्ट झाल्याची खंत व्यक्त करीत काही समाजसेवी संस्था पूढे येऊन वृक्षांची लागवड करीत आहे.

ठळक मुद्देमारूती चितमपल्ली : जनहित मंचचा पाचवा वर्धापन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवघड असलेले कार्य साध्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडाची चिकाटी ही स्तुत्य आहे. ५० टक्के जंगल नष्ट झाल्याची खंत व्यक्त करीत काही समाजसेवी संस्था पूढे येऊन वृक्षांची लागवड करीत आहे. वृक्ष लागवड करीत असताना वृक्ष लागवड समाजासाठी हितकारक ठरेल, असे मत मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक व वन्यजीव अभ्यासक, लेखक मारोती चितमपल्ली यांनी व्यक्त केले.जनहित मंचचा पाचवा वर्धापन दिन सोहळा ‘मुक्तांगण’ आदिवासी वसतिगृहासमोर आयटीआय टेकडी उमरी (मेघे) येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे, सचिव डॉ. राजेश आसमवार, उपाध्यक्ष सुभाष पाटणकर आदी उपस्थित होते.मारूती चितमपल्ली पूढे म्हणाले की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. आज चिमण्या, कावळे व घारी हे पक्षी नाहीसे झाले आहेत. सापांना ठार मारले जाते. सापांना मारू नका, निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी कढीपत्ता व शेवग्याच्या शेंगांची झाडे लावा. मधमाशा पालन करा. नदी, नाल्यांच्या बाजूला उंबराची झाडे लावा. ती झाडे पाण्याची पातळी वर आणते. शेतात बांध घातले पाहिजे. चारोळीची झाडे लावा. ते एक उत्पन्नाचे साधन होईल. ताड, चिंच, खजुर, सिंदीचे झाडे लावल्याने समाजाला त्याचा उपयोग होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीची चिकाटी स्तुत्य आहे.जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, जनहित मंचने निर्माण केलेला हा परिसर खºया अर्थाने वर्धेकरांसाठी मुक्त आंगण म्हणून उदयास येत आहे. मुक्तांगणात बहरलेले फुल पाहताना तुमच्या परिश्रमाने रंग आणला. कोणतेही कार्य करताना स्वत:चे समर्पण असेल तर त्याचे महत्त्व मोठे असते. मुक्तांगण हे एक मॉडेल ठरू शकते. शिक्षण प्रणालीमध्ये थोडा बदल करून त्या शिक्षणासोबत वृक्षारोपण, स्वच्छता, वृद्धांचा सन्मान असे सामाजिक मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांत संस्कारयुक्त शिक्षणाचा समावेश गरजेचा आहे. सामाजिक परिवर्तनास्तव संस्कारयुक्त बालक घडविण्याचा प्रयत्न विविध स्वयंसेवी संस्थांनी करावा. हे शास्वत विकासासाठी उपयोगी, प्रेरणादायी ठरेल. सर्वांनी सकारात्मक कार्य केल्यास बदल निश्चित घडून येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश बावसे यांनी केले तर मुक्तांगणची वाटचाल डॉ. राजेश आसमवार यांनी विषद केली. संचालन सुभाष पाटणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. जयंत मकरंदे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मुरलीधर बेलखोडे, डॉ. तारक काटे, डॉ. अरुण पावडे, डॉ. सचिन पावडे, भोयर, कौशल मिश्रा, अविनाश सातव, सुनील सावध, प्रा. शेख हाशम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता जनहित मंचचे सर्व सदस्य, पदाधिकारी व नागरिकांनी सहकार्य केले.जनहित मंचच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील ‘मुक्तांगण’ला सहकार्य करणाºया मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात बजाज फाऊंडेशनचे महेंद्र फाटे, आदिवासी वसतिगृहाचे किशोर रहाटे, अरविंद पवार व अमेरिका स्थित डॉ. सुरूची गालकर यांचा मानपत्र देत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.