शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

तेव्हा ‘ते’ चिमुकल्यांच्या पंखांना यशाच्या भरारीचे बळ देऊन गेले

By admin | Updated: July 28, 2015 03:10 IST

पुस्तके ज्ञानाचे स्त्रोत आहे. मिशन इंडिया २०२० ला डोळ्यापुढे ठेवून जे विद्यार्थी आठवी ते दहावीमध्ये असेल त्या प्रत्येकांना या

एपीजेंच्या आठवणींचा मोहोळ : बापंूच्या जिल्ह्याशी त्यांचे असेही ऋणानुबंधराजेश भोजेकर ल्ल वर्धापुस्तके ज्ञानाचे स्त्रोत आहे. मिशन इंडिया २०२० ला डोळ्यापुढे ठेवून जे विद्यार्थी आठवी ते दहावीमध्ये असेल त्या प्रत्येकांना या मिशनमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी आतापासूनच त्या दिशेने वाटचाल करावयाची आहे, असा मंत्र मिसाईल मॅन व माजी महामहीम राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी वर्धेतील विद्यार्थ्यांना दिला होता. त्यांच्या एकाएकी निधनाने या आठवणींचा मोहोळ उठला आहे. डिसेंबर २०१३ मध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या येथील वर्धा एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनाचे निमित्त होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कमाल वर्धेत आले होते. त्यांनी सुमारे अर्धा तासांवर विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी ते विद्यार्थ्यांमध्ये अक्षरश: मिसळून गेले होते. एखादी मोठी व्यक्ती भाषण देत आहे आणि श्रोते ऐकत आहे. असे न होता. ते व्यासपीठावर विद्यार्थ्यांशी हितगुज करीत होते. त्या भाषणादरम्यान ते बोलण्यात आणि विद्यार्थी ऐकण्यात तल्लीन झाले होते. हे पाहुन त्या कार्यक्रमाला उपस्थितांनाही विद्यार्थी आणि त्यांच्यात रंगलेला संवाद ऐकतच राहावे असे वाटत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खरा देशभक्त होण्यासाठीचे सर्व बाळकडू दिले. आपण केलेली प्रत्येक लहान गोष्ट पुढे देशहितार्थ होते, याचा प्रत्यय येतो. आतापासूनच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संशोधनावर भर दिला पाहिजे. यावेळी स्वत: लिहिलेल्या पुस्तकांचे दाखले देतानाच महत्त्वही विद्यार्थ्यांना त्याच्याच भाषेत समजावून सांगत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न बघण्याचा आग्रह केला. विद्यार्थी सर्वाधिक गुण वा अधिक टक्केवारीने मोठा ठरत नाही. हे समजावून सांगताना, सर्वाधिक बुद्धीवान आपल्या वर्गात शेवटच्या बाकावर बसत असल्याचे आपल्याला बघायला मिळेल, हे मार्मिक उदाहरण दिले. त्यांनी संपूर्ण भाषणात जगावेगळ्या ज्ञानाची महती पटवून दिली. यावेळी दिलेला मंत्र येथील विद्यार्थ्यांना भविष्यात गगणभरारी घेण्यासाठी बळ देणाराच होता. कार्यक्रमात ते अतिशय साधेपणाने वावरले. तसेच त्यांनी बालवैज्ञानिकांच्या प्रतिकृतींना भेट देऊन त्यांचे तोंडभरुन कौतुकही केले. या मिसाईल मॅनने त्यावेळी येथील विद्यार्थ्यांना खऱ्या देशभक्तीचा परिचयच दिला. ते वर्धेत यापूर्वी दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेतही आले होते. त्यावेळीही त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून खरा देशभक्त होण्यासाठी आतापासूनच आपली वाटचाल कशी करावी, याचा मूलमंत्र दिला होता. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठालाही त्यांनी भेट दिली होती. त्यांची वर्धेकरांसोबत या निमित्ताने एका आगळ्यावेगळ्या नात्याची गुंफन झाली होती. त्यांनी बापूंच्या जिल्ह्यात पाय ठेवताच सेवाग्राम आश्रम आणि पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला आवर्जून भेट दिली होती.