शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

रस्त्यालगतच्या तीन सार्वजनिक वृक्षांची कत्तल

By admin | Updated: November 15, 2016 01:33 IST

शासन, प्रशासनाकडून वृक्ष लागवडीकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात स्थानिक स्वराज्य

नागरिकांत आश्चर्य : कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : शासन, प्रशासनाकडून वृक्ष लागवडीकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह शिक्षकांवरही वृक्ष लागवडीचा भार असतो; पण शहरात शिक्षकांनीच वृक्षतोड केल्याचे समोर आले आहे. याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख जिल्हा परिषद कॉलनीतील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जि.प. कॉलनी आर्वी रोड येथील नागरिक प्रमोद भागवतकर हे ३५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांनी ग्रा.पं. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने घरासमोरील रस्त्याच्या दुतर्फा १४ वृक्षांची लागवड सात ते आठ वर्षांपूर्वी केली होती. त्यांचे संगोपनही ते करीत आहेत. अशातच गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ७-८ वर्षांचे मोठे करंज प्रजातीचे दोन वृक्षांची आशिष अजय देशमुख यांनी कत्तल केली. शिवाय शुक्रवारी पुन्हा एक झाड तोडले. त्यांनी परिसरातील तीन वृक्षांची अवैधरित्या कत्तल केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जि.प. कॉलनीतील रहिवासी हेमंत जुनघरे, हे जि.प. प्राथमिक शाळा धामणगाव (वाठोडा) येथे शिक्षक आहे. ते वारंवार वृक्षतोड करीत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तोडलेल्या झाडांच्या फांद्या तेथेच गोळा करून ठेवत असून वाळल्यानंतर जाळली जात आहेत. आगीमुळे उर्वरित वृक्षही करपत असल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला २०१२-१३ मध्ये ४२.९५ लाख, २०१३-१४ मध्ये ४०.२५ लाख इतके उद्दिष्ट दिलेले होते. यात ग्रामविकास विभागाला २०१२-१३ मध्ये १९.९५ लाख व २०१३-१४ मध्ये १८.६३ लाखांचे उद्दिष्ट होते. यापैकी २४.६२ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. वनमहोत्सव कालावधीत १ जुलै २०१६ मध्ये एकाच दिवशी राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यात वर्धा जिल्ह्यात संपूर्ण यंत्रणेने ७ लाख ६१ हजार ९९४ इतकी वृक्ष लागवड केली आहे. सदर रोपांच्या संगोपनासाठी प्रत्येक झाडाला १२०७.९५ इतका खर्च येत आहे. असे असताना भागवतकर यांनी ७-८ वर्षांपूर्वी बेरोजगार असताना पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक बांधिलकी समजून झाडांवर व्यक्तीश: खर्च केला. यातून त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला; पण नागरिकांनी कुठलीही पूर्वसूचना न देता सदर झाडांची कत्तल केली आहे. आशीष देशमुख व हेमंत जुनघरे हे जि.प. चे शिक्षक असताना त्यांनी शासनाची परवानगी न घेता हे कृत्य केले. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भागवतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)