शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रस्त्यालगतच्या तीन सार्वजनिक वृक्षांची कत्तल

By admin | Updated: November 15, 2016 01:33 IST

शासन, प्रशासनाकडून वृक्ष लागवडीकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात स्थानिक स्वराज्य

नागरिकांत आश्चर्य : कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : शासन, प्रशासनाकडून वृक्ष लागवडीकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह शिक्षकांवरही वृक्ष लागवडीचा भार असतो; पण शहरात शिक्षकांनीच वृक्षतोड केल्याचे समोर आले आहे. याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख जिल्हा परिषद कॉलनीतील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जि.प. कॉलनी आर्वी रोड येथील नागरिक प्रमोद भागवतकर हे ३५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांनी ग्रा.पं. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने घरासमोरील रस्त्याच्या दुतर्फा १४ वृक्षांची लागवड सात ते आठ वर्षांपूर्वी केली होती. त्यांचे संगोपनही ते करीत आहेत. अशातच गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ७-८ वर्षांचे मोठे करंज प्रजातीचे दोन वृक्षांची आशिष अजय देशमुख यांनी कत्तल केली. शिवाय शुक्रवारी पुन्हा एक झाड तोडले. त्यांनी परिसरातील तीन वृक्षांची अवैधरित्या कत्तल केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जि.प. कॉलनीतील रहिवासी हेमंत जुनघरे, हे जि.प. प्राथमिक शाळा धामणगाव (वाठोडा) येथे शिक्षक आहे. ते वारंवार वृक्षतोड करीत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तोडलेल्या झाडांच्या फांद्या तेथेच गोळा करून ठेवत असून वाळल्यानंतर जाळली जात आहेत. आगीमुळे उर्वरित वृक्षही करपत असल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला २०१२-१३ मध्ये ४२.९५ लाख, २०१३-१४ मध्ये ४०.२५ लाख इतके उद्दिष्ट दिलेले होते. यात ग्रामविकास विभागाला २०१२-१३ मध्ये १९.९५ लाख व २०१३-१४ मध्ये १८.६३ लाखांचे उद्दिष्ट होते. यापैकी २४.६२ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. वनमहोत्सव कालावधीत १ जुलै २०१६ मध्ये एकाच दिवशी राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यात वर्धा जिल्ह्यात संपूर्ण यंत्रणेने ७ लाख ६१ हजार ९९४ इतकी वृक्ष लागवड केली आहे. सदर रोपांच्या संगोपनासाठी प्रत्येक झाडाला १२०७.९५ इतका खर्च येत आहे. असे असताना भागवतकर यांनी ७-८ वर्षांपूर्वी बेरोजगार असताना पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक बांधिलकी समजून झाडांवर व्यक्तीश: खर्च केला. यातून त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला; पण नागरिकांनी कुठलीही पूर्वसूचना न देता सदर झाडांची कत्तल केली आहे. आशीष देशमुख व हेमंत जुनघरे हे जि.प. चे शिक्षक असताना त्यांनी शासनाची परवानगी न घेता हे कृत्य केले. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भागवतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)