शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवरसाठी ३५ वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:15 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नजीकच्या पळसगाव येथील शाळा परिसरात लावण्यात आलेली रोपटी योग्य निगा घेतल्याने झपाट्याने मोठी झाली.

ठळक मुद्देपळसगाव येथील प्रकार : गावकºयांचा विरोध; कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नजीकच्या पळसगाव येथील शाळा परिसरात लावण्यात आलेली रोपटी योग्य निगा घेतल्याने झपाट्याने मोठी झाली. परंतु, विकासाचे नाव पुढे करीत चक्क एका नामवंत कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी येथील मोठी ३५ वृक्षांची कत्तल करण्यात आली. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतापले असून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच रविंद्र चौधरी यांनी निवेदनातून केली आहे.वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून पटवून दिल्या जात आहे. परंतु, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही वृक्ष कत्तल होत असल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या तेरा गावापैकी पळसगाव हे एक गाव आहे. या ठिकाणी ग्रामसेवक दुत म्हणून हेमंत जांबोदे यांची नियुक्ती करण्यात आली. जांबोदे यांनी विकास आढावा बैठक घेवून ग्रामस्थांची मते जाणून घेतली. शाळा परिसरात रिलायन्स जिओ टॉवर घेवू नये, असे सर्वानुमत ठरविण्यात आले. स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत या विषयावर मते जाणून घेतल्यानंतरच मोबाईल टॉवर उभारणीचे काम हाती घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. परंतु ही बाब गावचे सरपंच रजनी ठाकरे, ग्रामसेवक कावळे व जिओचे टॉवर अधिकारी पुस्करे कुसरे यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी ग्रामसभेच्या आधी ४ आॅगस्टला शाळा परिसरात जेसीबीच्या सहाय्याने टॉवरकरिता खोदकाम सुरू केले. या टॉवरच्या कामात रोजगार हमी योजनेच्या १ लाख ९९ हजार ७१७ रुपयांच्या खर्चातून उभारलेले पाच वर्षांपूर्वी लावल्यानंतर चांगली मोठी झालेली ३५ झाडे तोडण्यात आली आहे. या झाडांनी प्राथमिक शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालय परिसर हिरवागार झाला होता. हा नयनरम्य परिसर सर्वांचे लक्षही वेधीत होता. टॉवरच्या बांधकामासाठी स्मशानभूमी जवळील जागा देण्यासाठी सर्वांची सहमती होती. परंतु, गावकºयांचे व गावातील निसर्ग प्रेमींचे मत न जाणून घेताच शाळा परिसरातील सर्व्हे क्रमांक २३४ आराजी १.२८ हे. आर या जागेची निवड करण्यात आली.गावातील मोठी ३५ वृक्ष कत्तलीच्या प्रकरणात गावातील सरपंच, ग्रामसेवक तसेच मोबाईल कंपनीचे अधिकारी जबाबदार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून उपसरपंच रविंद्र चौधरी यांनी केली आहे.