शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवरसाठी ३५ वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:15 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नजीकच्या पळसगाव येथील शाळा परिसरात लावण्यात आलेली रोपटी योग्य निगा घेतल्याने झपाट्याने मोठी झाली.

ठळक मुद्देपळसगाव येथील प्रकार : गावकºयांचा विरोध; कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नजीकच्या पळसगाव येथील शाळा परिसरात लावण्यात आलेली रोपटी योग्य निगा घेतल्याने झपाट्याने मोठी झाली. परंतु, विकासाचे नाव पुढे करीत चक्क एका नामवंत कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी येथील मोठी ३५ वृक्षांची कत्तल करण्यात आली. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतापले असून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच रविंद्र चौधरी यांनी निवेदनातून केली आहे.वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून पटवून दिल्या जात आहे. परंतु, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही वृक्ष कत्तल होत असल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या तेरा गावापैकी पळसगाव हे एक गाव आहे. या ठिकाणी ग्रामसेवक दुत म्हणून हेमंत जांबोदे यांची नियुक्ती करण्यात आली. जांबोदे यांनी विकास आढावा बैठक घेवून ग्रामस्थांची मते जाणून घेतली. शाळा परिसरात रिलायन्स जिओ टॉवर घेवू नये, असे सर्वानुमत ठरविण्यात आले. स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत या विषयावर मते जाणून घेतल्यानंतरच मोबाईल टॉवर उभारणीचे काम हाती घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. परंतु ही बाब गावचे सरपंच रजनी ठाकरे, ग्रामसेवक कावळे व जिओचे टॉवर अधिकारी पुस्करे कुसरे यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी ग्रामसभेच्या आधी ४ आॅगस्टला शाळा परिसरात जेसीबीच्या सहाय्याने टॉवरकरिता खोदकाम सुरू केले. या टॉवरच्या कामात रोजगार हमी योजनेच्या १ लाख ९९ हजार ७१७ रुपयांच्या खर्चातून उभारलेले पाच वर्षांपूर्वी लावल्यानंतर चांगली मोठी झालेली ३५ झाडे तोडण्यात आली आहे. या झाडांनी प्राथमिक शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालय परिसर हिरवागार झाला होता. हा नयनरम्य परिसर सर्वांचे लक्षही वेधीत होता. टॉवरच्या बांधकामासाठी स्मशानभूमी जवळील जागा देण्यासाठी सर्वांची सहमती होती. परंतु, गावकºयांचे व गावातील निसर्ग प्रेमींचे मत न जाणून घेताच शाळा परिसरातील सर्व्हे क्रमांक २३४ आराजी १.२८ हे. आर या जागेची निवड करण्यात आली.गावातील मोठी ३५ वृक्ष कत्तलीच्या प्रकरणात गावातील सरपंच, ग्रामसेवक तसेच मोबाईल कंपनीचे अधिकारी जबाबदार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून उपसरपंच रविंद्र चौधरी यांनी केली आहे.