शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपासून वीजजोडणीला कोलदांडा

By admin | Updated: June 10, 2015 02:21 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या बांधकामासाठी सहा वर्षांपूर्वी तोडण्यात आलेला मोटारपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही.

देवळी : निम्न वर्धा प्रकल्पाच्या बांधकामासाठी सहा वर्षांपूर्वी तोडण्यात आलेला मोटारपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही. जामणी शिवारातील दोन शेतकऱ्यांना यामुळे ओलीत करण्यात व्यत्यय येत आहे. शिवाय अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.सततची नापिकीने शेतकरी कंटाळला आहे. यातच ओलिताची सोय असताना पिकांना ओलीत करु शकत नसल्याने हतबल झालेल्या या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. निम्न वर्धा व विद्युत मंडळ प्रशासनाचा तुघलकी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जामणी शिवारात गोविंद चिरकुट तिरळे यांच्याकडे साडेचार एकर जमीन आहे तर हरिदास मडावी यांच्याकडे सहा एकर शेती आाहे. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. शेतातून अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी तिरळे यांनी १९९५ ला व मडावी यांनी सन २००९ ला विहिरींचे बांधकाम करून मोटारपंपाची जोडणी घेतली. शेतात ओलिताची सुविधा झाल्यानंतर उत्पन्न वाढले. परंतु विकासाची बाब समोर करून २००९ मध्ये त्यांच्या शेतात निम्न वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा व १७ नंबरच्या सेतूचे बांधकामाला सुरूवात केली. याकरिता शेतातील विद्युत खांब व सर्व्हिस लाईन कापण्यात आली. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतातील लाईन पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यावर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा विसर पडला. शेतक्री वारंवार भेटले, लेखी तक्रार दिली. मात्र निम्न वर्धा प्रकल्प व विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सहा वर्षांच्या कालावधीत काम पूर्ण केले नाही. २००९ च्या आॅक्टोबर महिन्यात शेतातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यातही मोटारपंपाचे देयक २०१३ पर्यंतचे देण्यात आले. या दोन्ही शेतकऱ्यांनी देयकाचा भरणा केला. यानंतर मोटारपंपाची जोडणी शिल्लक दाखविण्यात आली. या सर्व प्रकाराने शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शेतातील विद्युत पोल व सर्व्हिसलाईन पूर्ववत करून देण्यापेक्षा, या कास्तकारांच्या मानसिकतेची अधिकाऱ्यांच्यावतीने विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.(प्रतिनिधी)