शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

सहा वर्षांपासून वीजजोडणीला कोलदांडा

By admin | Updated: June 10, 2015 02:21 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या बांधकामासाठी सहा वर्षांपूर्वी तोडण्यात आलेला मोटारपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही.

देवळी : निम्न वर्धा प्रकल्पाच्या बांधकामासाठी सहा वर्षांपूर्वी तोडण्यात आलेला मोटारपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही. जामणी शिवारातील दोन शेतकऱ्यांना यामुळे ओलीत करण्यात व्यत्यय येत आहे. शिवाय अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.सततची नापिकीने शेतकरी कंटाळला आहे. यातच ओलिताची सोय असताना पिकांना ओलीत करु शकत नसल्याने हतबल झालेल्या या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. निम्न वर्धा व विद्युत मंडळ प्रशासनाचा तुघलकी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जामणी शिवारात गोविंद चिरकुट तिरळे यांच्याकडे साडेचार एकर जमीन आहे तर हरिदास मडावी यांच्याकडे सहा एकर शेती आाहे. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. शेतातून अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी तिरळे यांनी १९९५ ला व मडावी यांनी सन २००९ ला विहिरींचे बांधकाम करून मोटारपंपाची जोडणी घेतली. शेतात ओलिताची सुविधा झाल्यानंतर उत्पन्न वाढले. परंतु विकासाची बाब समोर करून २००९ मध्ये त्यांच्या शेतात निम्न वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा व १७ नंबरच्या सेतूचे बांधकामाला सुरूवात केली. याकरिता शेतातील विद्युत खांब व सर्व्हिस लाईन कापण्यात आली. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेतातील लाईन पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यावर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा विसर पडला. शेतक्री वारंवार भेटले, लेखी तक्रार दिली. मात्र निम्न वर्धा प्रकल्प व विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सहा वर्षांच्या कालावधीत काम पूर्ण केले नाही. २००९ च्या आॅक्टोबर महिन्यात शेतातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यातही मोटारपंपाचे देयक २०१३ पर्यंतचे देण्यात आले. या दोन्ही शेतकऱ्यांनी देयकाचा भरणा केला. यानंतर मोटारपंपाची जोडणी शिल्लक दाखविण्यात आली. या सर्व प्रकाराने शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शेतातील विद्युत पोल व सर्व्हिसलाईन पूर्ववत करून देण्यापेक्षा, या कास्तकारांच्या मानसिकतेची अधिकाऱ्यांच्यावतीने विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.(प्रतिनिधी)