शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

१४ ग्रामपंचायतींना ६ लाखांचा दंड

By admin | Updated: June 16, 2017 01:16 IST

शासकीय लेखा परीक्षण विभाग प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे लेखा परीक्षण करते.

आॅडिट रखडले : अभिलेख सादर करण्यात दिरंगाईप्रशांत हेलोंडे। लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय लेखा परीक्षण विभाग प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे लेखा परीक्षण करते. प्रत्येक वर्षी प्राप्त शासकीय निधी व खर्च तसेच कामांचे आॅडीट यात केले जाते; पण जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींनी अभिलेखे सादर न केल्याने त्यांचे आॅडीट रखडले आहे. वारंवार सूचना देऊनही अभिलेख सादर न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेने ६ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी तथा अन्य योजनांसाठी निधी पुरविला जातो. आर्थिक वर्षाच्या अखेरीस सदर निधीचा जमा-खर्च मांडावा लागतो. यासाठी ग्रामसेवक अभिलेखे सादर करीत असतात. यावरून संबंधित ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण केले जाते. मात्र जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींनी अभिलेख सादर केला नसल्याने त्यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अहवाल विभागीय स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती आहे. दंडात्मक कारवाई प्रस्तावित असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये काही ग्रा.पं. चे एक वर्षाचे तर काहींचे तीन वर्षांचे आॅडीट रखडले आहे. यानुसार त्या ग्रामपंचायतींना २५ हजार रुपये वर्षाप्रमाणे दंड प्रस्तावित केला आहे. हे लेखापरीक्षण एक-दोन वर्षांतील नव्हे तर तब्बल २००७ पासून प्रलंबित असल्याचेही जिल्हा परिषदेने काढलेल्या पत्रात नमूद आहे. अभिलेखे सादर न करणाऱ्या १५ ग्रामपंचायतींची यादी जिल्हा परिषदेने दंडात्मक कारवाईसाठी केली होती. यातील बोरगाव (मेघे) ग्रामपंचातीने दंडात्मक कारवाईच्या प्रस्तावानंतर अभिलेखे सादर केले आहेत. यामुळे तेथील लेखापरीक्षणाची कार्यवाही पूर्ण केली जात आहे; पण उर्वरित १४ ग्रामपंचायतींनी अद्यापही अभिलेखे सादर केले नाहीत. सदर ग्रा.पं. च्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत अनेकदा सूचना देण्यात आल्यात; पण दिरंगाई केल्याने ही कारवाई केली जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. पंचायत समितीनिहाय माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून सादर करण्यात आली आहे.चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. याउपरही अभिलेखे सादर न केल्यास संबंधित ग्रामसेवकांवर विभागीय कारवाईची टांगती तलवार असणार आहे. २०१५-१६ च्या २०० वर ग्रा.पं. चे आॅडिट शिल्लकजिल्ह्यातील ५१७ ग्रामपंचायतींपैकी ३१३ ग्रामपंचायतींनी २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण करण्याकरिता अभिलेख सादर केले आहेत. यावरून या ग्रामपंचातींचे आॅडीट करण्यात आले आहे; पण अद्याप जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींनी अभिलेखे सादर केलेले नाहीत. यामुळे त्यांचे लेखापरीक्षण रखडले आहे. असाच प्रकार २०१६-१७ या आर्थिक वर्षातही घडत आहे. मागील आर्थिक वर्षातीलही सुमारे ४७ ग्रामपंचायतींचे आॅडीट शिल्लक असल्याचे लेखापरीक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.