शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यलढ्याचे स्थळ अद्याप दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:21 IST

१९४२ ला नागपंचमीच्या दिवशी झालेल्या भारत छोडो आंदोलनात आष्टीला रक्तरंजित क्रांती झाली. यामध्ये सहा जण शहीद झाले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे ही शिक्षा माफ झाली.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी? : केवळ आश्वासनांची खैरात

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : १९४२ ला नागपंचमीच्या दिवशी झालेल्या भारत छोडो आंदोलनात आष्टीला रक्तरंजित क्रांती झाली. यामध्ये सहा जण शहीद झाले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे ही शिक्षा माफ झाली. उकंडराव सोनवणे (भोई) यांची अपील तर लंडनच्या मिली कौन्सिलमध्ये चालली. एवढा समग्र इतिहास प्राप्त असणारे स्वातंत्र्यलढ्याचे तत्कालीन स्थळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७७ वर्षांपासून वंचित आहे.या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटनस्थळ म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धूळखात आहे. हे स्थळ तेव्हाचे पोलीस ठाणे, तर आताचे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय म्हणून ओळखले जाते. हुतात्मा स्मारक समितीचे प्रतिनिधी गत अनेक वर्षांपासून शासनाच्या प्रतिनिधींना भेटून आष्टीच्या स्वातंत्र्यलढ्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या, अशी आग्रही भूमिका घेत आहेत. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे.स्वातंत्र्यलढ्याचे स्थळ सुरक्षित राहावे म्हणून १९५८ साली येथे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या स्थळी दरवर्षी शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ लागले. आष्टीला पंतप्रधान ते मुख्यमंत्री पर्यंतच्या मंत्र्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची मात्र पूर्तता केली नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्मारकाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले; पण मागील १० वर्षांपासून सध्याची हुतात्मा स्मारक समितीची कार्यकारिणी सक्रिय झाली.स्वातंत्र्यलढ्यावरील लघुचित्रपट तयार केला. त्याचे शाळा, महाविद्यालय, विधानसभा, विधानपरिषद येथे सादरीकरण करण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटून आष्टीच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली. २०१६ ला पालकमंत्री सुधीर मुगंटीवार आष्टीला आले असता माजी आमदार दादाराव केचे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक पारे, सचिन भरत वणझारा यांनी राष्ट्रीय स्मारकाची मागणी लावून धरली. यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला. स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्मिती झाली. मात्र, येथे राजकारण आडवे आले. यातील ३ कोटी आष्टीतील रस्ते, नाल्या, स्मशानभूमीवर खर्च केले असून २ कोटींचा निधी प्रशासनाकडे पडून आहे. या स्वातंत्र्यलढ्याला तत्काळ राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिल्यास खऱ्या अर्थाने शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचे सार्थक होईल, असे बोलले जात आहे.