शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

सिताफळाने मला देशभर प्रसिद्धी मिळवून दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:24 IST

रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत.

ठळक मुद्देसुरेश पाटील : नैसर्गिक शेतीच्या भरवशावर वार्षिक ५० लाख उत्पन्न

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत. सिताफळाने देशभर प्रसिद्धी मिळवून दिली, असे ते अभिमानाने सांगतात. डॉ. सुभाष पाळेकर यांच्या तंत्रानुसारच संपूर्ण शेती करीत असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलेनागपूर येथील सुरेश मनोहरराव पाटील यांची हळदगाव येथे ७० एकर शेती आहे. एकत्र कुटुंब असून नागपूर येथे वास्तव्यास आहे. १२ वर्षांपूर्वी त्यांनी १५ एकरात सिताफळाची बाग लावली. त्यांनी कुठल्या दुकानातून बियाणे वा रोप आणले नाही. सुमारे २० वर्षे संशोधन करून सिताफळाचे रोप त्यांनी भावाच्या साह्याने विकसित केले. सदर वाणाला त्यांनी ‘सरस्वती ७’ असे आईचे नाव दिले. या वाणाला हंगामानंतर म्हणजे साधारण सिताफळ अर्धेधिक निघाल्यानंतर फळ येतात. या झाडाला अर्ध्या ते एक किलो वजनाचे फळ येते. दिसायला सुंदर व चवीला हवेहवेसे, गोड हे सिताफळ पसंतीस उतरत आहे. संपूर्ण शेती जीवामृतावर आधारित नैसर्गिक पद्धतीने करीत असून कुठलेही विषाचे स्प्रे नाही.१५ एकरात लिंबू आहे. लिंबाची बेडवर लागवड केली. आवळा, चार एकरात क्रिकेट बॉल चिकू, दीड एकरात लखनऊ ४९ पांढरा व ललित हा लाल पेरू, अडीच एकरात डाळींब व काही भागात तुरी आहे. संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करीत असून वखर, नांगरण करीत नाही. आजपर्यंत शेतात ट्रॅक्टरची गरज पडली नाही.सिताफळाची मार्केटींग सुरेश पाटील स्वत: करतात. गिफ्ट बॉक्स म्हणून जातात. नागपूरच्या प्रत्येक प्रदर्शनात स्टॉल लावला जातो. यापूर्वी सिताफळ दुबई येथे एक्स्पोर्ट केले; पण त्यात आपले नावही येत नाही. यामुळे एक्स्पोर्ट करणे बंद केले आहे. नागपूरमध्येच सिताफळांचा ‘शॉर्टेज’ असतो. अर्धा किलो वजनाच्या सिताफळांचा दोन किलोचा बॉक्स ४०० रुपयांना विकतो तर एक किलो वजनाची सिताफळे त्यापेक्षा महाग खपतात. कुठल्याही स्थितीत भाव कमी करीत नाही. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य केंद्रीय मंत्र्यांनाही सिताफळ खाऊ घातले आहे. शेतात नर्सरी असून सर्व रोपे तेथे तयार होता. तायवान पपई, सिताफळ, पेरू, चिकूची रोपे आहेत. या ७० एकर शेतीतून वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न होते.गरज पडल्यास नैसर्गिक अर्काची फवारणीगरज पडल्यास निमास्त्र व दशपर्णी अर्क यांची फवारणी करतो. निमास्त्रामध्ये १० किलो कडुनिंबाचा पाला, ५ लिटर गोमुत्र, अर्धा किलो शेण व पाणी हे तीन दिवस प्लास्टिक ड्रममध्ये ठेवून नंतर फवारणी करता येते. दशपर्णी अर्कामध्ये सिताफळ, येरंडी, निरगुडी, करंजी, बेल, काळी तुळस, रूई, झेंडू, धोत्रा व बेशरमची प्रत्येकी दोन किलो पाने, काड्या बारिक करायच्या. यात २० लिटर गोमुत्र, एक किलो तिखट, २५० ग्रॅम हळद, अर्धा किलो अद्रक व लसन २०० लिटर पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये ४० दिवस सडवायचे. यानंतर ते गाळून ३ लिटर प्रत्येकी १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची.आंतरपीक पद्धतीने केली शेतीसिताफळ, पेरू, चिकू या बागांमध्ये शेवगा आंतरपीक घेतले. शेवग्यामुळे झाडांना विरळ सावली मिळते. शेवगा ‘नायट्रोजनचे फिक्सेशन’ करते. आपल्याकडे उन्हाळ्यात प्रखर उन्ह असते. शेवग्यामुळे उन्हावर नियंत्रण ठेवता येते.किचन पद्धतप्रत्येक झाडाला त्याचं किचन पाहिजे. यासाठी चिकूमध्ये दोन झाडांच्या मध्ये ८ फुट लांब, ४ फुट रूंद व दीड फुट खोल तर पेरूमध्ये १० बाय ६ फुट खड्डा केला आहे. तो कचºयाने भरला. यात गांडुळ निर्माण होऊन झाडांना लागणारे ह्युमस तयार होते.शेतीत तीन पद्धतीचा वापरसिताफळ बागेला नैसर्गिक द्रावण दिले जाते. यात १० किलो गावराण गाईचे शेण, ५ ते १० किलो गोमुत्र, प्रत्येकी एक किलो गुळ, बेसन, धुºयावरील मुठभर माती हे २०० लिटर पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये टाकायचे. ड्रम सावलीत सकाळ-सायंकाळ क्लॉकवाईज ठेवावे. तीन दिवसांनंतर ते वापरता येते. जमिनीवर टाकायचे झाल्यास प्रत्येक झाडाला एक डबा तर फवारणी ५ ते १० लिटर गाळून करता येते.आच्छादन पद्धतीत शेतातील काडीकचरा कधीही काढला वा जाळला नाही. तो जमिनीवर ठेवला. त्याखाली गांडूळ वाढून ते जमीन सुपिक बवनितात. कचºयाचे आच्छादन हे गांडुळांचे घर ठरते. जमिनीत १२ फुटांपर्यंत गांडुळ असतात. त्यांनी खाल्लेल्या मातीमध्ये नत्र, स्पूरद, पलाश मुबलक असते. गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत होऊन पाणी मुरते. वॉटर लेव्हल वाढते. शेताला वनभिंत केली आहे. यात तीन ‘स्टेज’मध्ये उतरत्या क्रमाने झाडे लावली. यामुळे वादळ थेट शेतात शिरत नाही. परिणामी, शेतात निर्माण होणारे कार्डबडाय आॅक्साईड झाडाला मिळते.