शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिताफळाने मला देशभर प्रसिद्धी मिळवून दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:24 IST

रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत.

ठळक मुद्देसुरेश पाटील : नैसर्गिक शेतीच्या भरवशावर वार्षिक ५० लाख उत्पन्न

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत. सिताफळाने देशभर प्रसिद्धी मिळवून दिली, असे ते अभिमानाने सांगतात. डॉ. सुभाष पाळेकर यांच्या तंत्रानुसारच संपूर्ण शेती करीत असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलेनागपूर येथील सुरेश मनोहरराव पाटील यांची हळदगाव येथे ७० एकर शेती आहे. एकत्र कुटुंब असून नागपूर येथे वास्तव्यास आहे. १२ वर्षांपूर्वी त्यांनी १५ एकरात सिताफळाची बाग लावली. त्यांनी कुठल्या दुकानातून बियाणे वा रोप आणले नाही. सुमारे २० वर्षे संशोधन करून सिताफळाचे रोप त्यांनी भावाच्या साह्याने विकसित केले. सदर वाणाला त्यांनी ‘सरस्वती ७’ असे आईचे नाव दिले. या वाणाला हंगामानंतर म्हणजे साधारण सिताफळ अर्धेधिक निघाल्यानंतर फळ येतात. या झाडाला अर्ध्या ते एक किलो वजनाचे फळ येते. दिसायला सुंदर व चवीला हवेहवेसे, गोड हे सिताफळ पसंतीस उतरत आहे. संपूर्ण शेती जीवामृतावर आधारित नैसर्गिक पद्धतीने करीत असून कुठलेही विषाचे स्प्रे नाही.१५ एकरात लिंबू आहे. लिंबाची बेडवर लागवड केली. आवळा, चार एकरात क्रिकेट बॉल चिकू, दीड एकरात लखनऊ ४९ पांढरा व ललित हा लाल पेरू, अडीच एकरात डाळींब व काही भागात तुरी आहे. संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करीत असून वखर, नांगरण करीत नाही. आजपर्यंत शेतात ट्रॅक्टरची गरज पडली नाही.सिताफळाची मार्केटींग सुरेश पाटील स्वत: करतात. गिफ्ट बॉक्स म्हणून जातात. नागपूरच्या प्रत्येक प्रदर्शनात स्टॉल लावला जातो. यापूर्वी सिताफळ दुबई येथे एक्स्पोर्ट केले; पण त्यात आपले नावही येत नाही. यामुळे एक्स्पोर्ट करणे बंद केले आहे. नागपूरमध्येच सिताफळांचा ‘शॉर्टेज’ असतो. अर्धा किलो वजनाच्या सिताफळांचा दोन किलोचा बॉक्स ४०० रुपयांना विकतो तर एक किलो वजनाची सिताफळे त्यापेक्षा महाग खपतात. कुठल्याही स्थितीत भाव कमी करीत नाही. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य केंद्रीय मंत्र्यांनाही सिताफळ खाऊ घातले आहे. शेतात नर्सरी असून सर्व रोपे तेथे तयार होता. तायवान पपई, सिताफळ, पेरू, चिकूची रोपे आहेत. या ७० एकर शेतीतून वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न होते.गरज पडल्यास नैसर्गिक अर्काची फवारणीगरज पडल्यास निमास्त्र व दशपर्णी अर्क यांची फवारणी करतो. निमास्त्रामध्ये १० किलो कडुनिंबाचा पाला, ५ लिटर गोमुत्र, अर्धा किलो शेण व पाणी हे तीन दिवस प्लास्टिक ड्रममध्ये ठेवून नंतर फवारणी करता येते. दशपर्णी अर्कामध्ये सिताफळ, येरंडी, निरगुडी, करंजी, बेल, काळी तुळस, रूई, झेंडू, धोत्रा व बेशरमची प्रत्येकी दोन किलो पाने, काड्या बारिक करायच्या. यात २० लिटर गोमुत्र, एक किलो तिखट, २५० ग्रॅम हळद, अर्धा किलो अद्रक व लसन २०० लिटर पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये ४० दिवस सडवायचे. यानंतर ते गाळून ३ लिटर प्रत्येकी १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची.आंतरपीक पद्धतीने केली शेतीसिताफळ, पेरू, चिकू या बागांमध्ये शेवगा आंतरपीक घेतले. शेवग्यामुळे झाडांना विरळ सावली मिळते. शेवगा ‘नायट्रोजनचे फिक्सेशन’ करते. आपल्याकडे उन्हाळ्यात प्रखर उन्ह असते. शेवग्यामुळे उन्हावर नियंत्रण ठेवता येते.किचन पद्धतप्रत्येक झाडाला त्याचं किचन पाहिजे. यासाठी चिकूमध्ये दोन झाडांच्या मध्ये ८ फुट लांब, ४ फुट रूंद व दीड फुट खोल तर पेरूमध्ये १० बाय ६ फुट खड्डा केला आहे. तो कचºयाने भरला. यात गांडुळ निर्माण होऊन झाडांना लागणारे ह्युमस तयार होते.शेतीत तीन पद्धतीचा वापरसिताफळ बागेला नैसर्गिक द्रावण दिले जाते. यात १० किलो गावराण गाईचे शेण, ५ ते १० किलो गोमुत्र, प्रत्येकी एक किलो गुळ, बेसन, धुºयावरील मुठभर माती हे २०० लिटर पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये टाकायचे. ड्रम सावलीत सकाळ-सायंकाळ क्लॉकवाईज ठेवावे. तीन दिवसांनंतर ते वापरता येते. जमिनीवर टाकायचे झाल्यास प्रत्येक झाडाला एक डबा तर फवारणी ५ ते १० लिटर गाळून करता येते.आच्छादन पद्धतीत शेतातील काडीकचरा कधीही काढला वा जाळला नाही. तो जमिनीवर ठेवला. त्याखाली गांडूळ वाढून ते जमीन सुपिक बवनितात. कचºयाचे आच्छादन हे गांडुळांचे घर ठरते. जमिनीत १२ फुटांपर्यंत गांडुळ असतात. त्यांनी खाल्लेल्या मातीमध्ये नत्र, स्पूरद, पलाश मुबलक असते. गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत होऊन पाणी मुरते. वॉटर लेव्हल वाढते. शेताला वनभिंत केली आहे. यात तीन ‘स्टेज’मध्ये उतरत्या क्रमाने झाडे लावली. यामुळे वादळ थेट शेतात शिरत नाही. परिणामी, शेतात निर्माण होणारे कार्डबडाय आॅक्साईड झाडाला मिळते.