शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

सिताफळाने मला देशभर प्रसिद्धी मिळवून दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:24 IST

रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत.

ठळक मुद्देसुरेश पाटील : नैसर्गिक शेतीच्या भरवशावर वार्षिक ५० लाख उत्पन्न

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत. सिताफळाने देशभर प्रसिद्धी मिळवून दिली, असे ते अभिमानाने सांगतात. डॉ. सुभाष पाळेकर यांच्या तंत्रानुसारच संपूर्ण शेती करीत असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलेनागपूर येथील सुरेश मनोहरराव पाटील यांची हळदगाव येथे ७० एकर शेती आहे. एकत्र कुटुंब असून नागपूर येथे वास्तव्यास आहे. १२ वर्षांपूर्वी त्यांनी १५ एकरात सिताफळाची बाग लावली. त्यांनी कुठल्या दुकानातून बियाणे वा रोप आणले नाही. सुमारे २० वर्षे संशोधन करून सिताफळाचे रोप त्यांनी भावाच्या साह्याने विकसित केले. सदर वाणाला त्यांनी ‘सरस्वती ७’ असे आईचे नाव दिले. या वाणाला हंगामानंतर म्हणजे साधारण सिताफळ अर्धेधिक निघाल्यानंतर फळ येतात. या झाडाला अर्ध्या ते एक किलो वजनाचे फळ येते. दिसायला सुंदर व चवीला हवेहवेसे, गोड हे सिताफळ पसंतीस उतरत आहे. संपूर्ण शेती जीवामृतावर आधारित नैसर्गिक पद्धतीने करीत असून कुठलेही विषाचे स्प्रे नाही.१५ एकरात लिंबू आहे. लिंबाची बेडवर लागवड केली. आवळा, चार एकरात क्रिकेट बॉल चिकू, दीड एकरात लखनऊ ४९ पांढरा व ललित हा लाल पेरू, अडीच एकरात डाळींब व काही भागात तुरी आहे. संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करीत असून वखर, नांगरण करीत नाही. आजपर्यंत शेतात ट्रॅक्टरची गरज पडली नाही.सिताफळाची मार्केटींग सुरेश पाटील स्वत: करतात. गिफ्ट बॉक्स म्हणून जातात. नागपूरच्या प्रत्येक प्रदर्शनात स्टॉल लावला जातो. यापूर्वी सिताफळ दुबई येथे एक्स्पोर्ट केले; पण त्यात आपले नावही येत नाही. यामुळे एक्स्पोर्ट करणे बंद केले आहे. नागपूरमध्येच सिताफळांचा ‘शॉर्टेज’ असतो. अर्धा किलो वजनाच्या सिताफळांचा दोन किलोचा बॉक्स ४०० रुपयांना विकतो तर एक किलो वजनाची सिताफळे त्यापेक्षा महाग खपतात. कुठल्याही स्थितीत भाव कमी करीत नाही. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य केंद्रीय मंत्र्यांनाही सिताफळ खाऊ घातले आहे. शेतात नर्सरी असून सर्व रोपे तेथे तयार होता. तायवान पपई, सिताफळ, पेरू, चिकूची रोपे आहेत. या ७० एकर शेतीतून वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न होते.गरज पडल्यास नैसर्गिक अर्काची फवारणीगरज पडल्यास निमास्त्र व दशपर्णी अर्क यांची फवारणी करतो. निमास्त्रामध्ये १० किलो कडुनिंबाचा पाला, ५ लिटर गोमुत्र, अर्धा किलो शेण व पाणी हे तीन दिवस प्लास्टिक ड्रममध्ये ठेवून नंतर फवारणी करता येते. दशपर्णी अर्कामध्ये सिताफळ, येरंडी, निरगुडी, करंजी, बेल, काळी तुळस, रूई, झेंडू, धोत्रा व बेशरमची प्रत्येकी दोन किलो पाने, काड्या बारिक करायच्या. यात २० लिटर गोमुत्र, एक किलो तिखट, २५० ग्रॅम हळद, अर्धा किलो अद्रक व लसन २०० लिटर पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये ४० दिवस सडवायचे. यानंतर ते गाळून ३ लिटर प्रत्येकी १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची.आंतरपीक पद्धतीने केली शेतीसिताफळ, पेरू, चिकू या बागांमध्ये शेवगा आंतरपीक घेतले. शेवग्यामुळे झाडांना विरळ सावली मिळते. शेवगा ‘नायट्रोजनचे फिक्सेशन’ करते. आपल्याकडे उन्हाळ्यात प्रखर उन्ह असते. शेवग्यामुळे उन्हावर नियंत्रण ठेवता येते.किचन पद्धतप्रत्येक झाडाला त्याचं किचन पाहिजे. यासाठी चिकूमध्ये दोन झाडांच्या मध्ये ८ फुट लांब, ४ फुट रूंद व दीड फुट खोल तर पेरूमध्ये १० बाय ६ फुट खड्डा केला आहे. तो कचºयाने भरला. यात गांडुळ निर्माण होऊन झाडांना लागणारे ह्युमस तयार होते.शेतीत तीन पद्धतीचा वापरसिताफळ बागेला नैसर्गिक द्रावण दिले जाते. यात १० किलो गावराण गाईचे शेण, ५ ते १० किलो गोमुत्र, प्रत्येकी एक किलो गुळ, बेसन, धुºयावरील मुठभर माती हे २०० लिटर पाण्यात प्लास्टिक ड्रममध्ये टाकायचे. ड्रम सावलीत सकाळ-सायंकाळ क्लॉकवाईज ठेवावे. तीन दिवसांनंतर ते वापरता येते. जमिनीवर टाकायचे झाल्यास प्रत्येक झाडाला एक डबा तर फवारणी ५ ते १० लिटर गाळून करता येते.आच्छादन पद्धतीत शेतातील काडीकचरा कधीही काढला वा जाळला नाही. तो जमिनीवर ठेवला. त्याखाली गांडूळ वाढून ते जमीन सुपिक बवनितात. कचºयाचे आच्छादन हे गांडुळांचे घर ठरते. जमिनीत १२ फुटांपर्यंत गांडुळ असतात. त्यांनी खाल्लेल्या मातीमध्ये नत्र, स्पूरद, पलाश मुबलक असते. गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत होऊन पाणी मुरते. वॉटर लेव्हल वाढते. शेताला वनभिंत केली आहे. यात तीन ‘स्टेज’मध्ये उतरत्या क्रमाने झाडे लावली. यामुळे वादळ थेट शेतात शिरत नाही. परिणामी, शेतात निर्माण होणारे कार्डबडाय आॅक्साईड झाडाला मिळते.