शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

साहेब...! दिवाळी आली अन् गेली; आम्हा भटकंती करणाऱ्या जमातीसाठी रोजचाच शिमगा, रोजचीच दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच  दिवाळे निघाल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या उत्साहावर पडला. या भटक्या जमातीच्या लाेकांनीही दिवाळीचा आनंद घेता आला नाही.

ठळक मुद्देरस्त्यालगतच्या झोपडीत पेटविली पणती ; फाटक्या कापडांवरच बच्चेकंपनींचा निरागस उत्साह

 लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/ आर्वी : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. हा सण प्रकाशपर्व म्हणून श्रीमंतापासून तर सर्व सामान्यांपर्यंत सारेच आपापल्या परीने साजरे करतात. मात्र, रस्याच्या कडेला पाल ठाकून राहणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांच्या झोपडीत दिवाही पेटला नाही. एकाच पणतीच्या प्रकाशात दिवाळी साजरी करणाऱ्या या भटक्या कुटुंबानी ‘साहेब...! आमच्याकरिता रोजचाच शिमगा अन् रोजचीच दिवाळी’, अशी अगतिकता लोकमतशी बोलताना व्यक्त केली.आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच  दिवाळे निघाल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या उत्साहावर पडला. या भटक्या जमातीच्या लाेकांनीही दिवाळीचा आनंद घेता आला नाही.

दिवाळी काय खरेदी केले?दिवाळी कधी आली अन् कधी गेली आम्हाला कळलेही नाही. त्या दिवशी आमच्या पालात पणती लावली आणि देवीची पूजा केली. पण, आम्हा लाेकांवर देवी कधी प्रसन्न होईल हे देव जाणे. येथे खायचेचे वांधे झाले आहे तेथे दिवाळीची खरेदी कुठून करणार, अशी व्यथा मांडली.

मुलांनी कसा लुटला आनंदइतरत्र फुटणारे फटाके आणि मोठ- मोठ्या घरांवर केलेली रोषणाई बघितली. जुन्याच कपड्यावर राहून घरात बणविलेले अन्न घाऊन दिवाळीचा सण साजरा केला. दिवाळीकरिता कुठे हात पसरला पण, देणाऱ्यांचे हातही कमी पडलेत.

कोरोनामुळे काही कायम परिणाम झाला लॅाकडाऊनमुळे आठ महिन्यांपासून हाताला काम नाही. दारोदारी भटकून उदरनिर्वाह करणाऱ्यांची परिस्थिती तर फारच विदारक आहे. कुणी उधारीवर पैसे द्यायला तयार नव्हते तर कुणी खायला देण्यास तयार होत नव्हते. गावाबाहेर जाणेही शक्य नसल्याने मिळतच पूर्णत: बंद झाली, असे विरु वैद्य धुर्वे यांनी सांगितले.झोपडीतील मुलांना काय वाटते...दिवाळीच्या दिवशी दररोज सारखचं खेळलो. सायंकाळी समोरच्या घरांवर दिसणारी रोषणाई आणि आकाशात उडणारे फटाके बघत होतो. आईने पालात जे काही शिजविले ते खाल्लं आणि झोपी गेलो. गोडधोडचा तर पत्ताच नाही. दिवाळीत नवीन कपडे आम्हाला कधीही नशिबी आले नाही, असे पालावरील खनको धुर्वे याने सांगितले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी