शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

साहेब...! दिवाळी आली अन् गेली; आम्हा भटकंती करणाऱ्या जमातीसाठी रोजचाच शिमगा, रोजचीच दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच  दिवाळे निघाल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या उत्साहावर पडला. या भटक्या जमातीच्या लाेकांनीही दिवाळीचा आनंद घेता आला नाही.

ठळक मुद्देरस्त्यालगतच्या झोपडीत पेटविली पणती ; फाटक्या कापडांवरच बच्चेकंपनींचा निरागस उत्साह

 लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/ आर्वी : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. हा सण प्रकाशपर्व म्हणून श्रीमंतापासून तर सर्व सामान्यांपर्यंत सारेच आपापल्या परीने साजरे करतात. मात्र, रस्याच्या कडेला पाल ठाकून राहणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांच्या झोपडीत दिवाही पेटला नाही. एकाच पणतीच्या प्रकाशात दिवाळी साजरी करणाऱ्या या भटक्या कुटुंबानी ‘साहेब...! आमच्याकरिता रोजचाच शिमगा अन् रोजचीच दिवाळी’, अशी अगतिकता लोकमतशी बोलताना व्यक्त केली.आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच  दिवाळे निघाल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या उत्साहावर पडला. या भटक्या जमातीच्या लाेकांनीही दिवाळीचा आनंद घेता आला नाही.

दिवाळी काय खरेदी केले?दिवाळी कधी आली अन् कधी गेली आम्हाला कळलेही नाही. त्या दिवशी आमच्या पालात पणती लावली आणि देवीची पूजा केली. पण, आम्हा लाेकांवर देवी कधी प्रसन्न होईल हे देव जाणे. येथे खायचेचे वांधे झाले आहे तेथे दिवाळीची खरेदी कुठून करणार, अशी व्यथा मांडली.

मुलांनी कसा लुटला आनंदइतरत्र फुटणारे फटाके आणि मोठ- मोठ्या घरांवर केलेली रोषणाई बघितली. जुन्याच कपड्यावर राहून घरात बणविलेले अन्न घाऊन दिवाळीचा सण साजरा केला. दिवाळीकरिता कुठे हात पसरला पण, देणाऱ्यांचे हातही कमी पडलेत.

कोरोनामुळे काही कायम परिणाम झाला लॅाकडाऊनमुळे आठ महिन्यांपासून हाताला काम नाही. दारोदारी भटकून उदरनिर्वाह करणाऱ्यांची परिस्थिती तर फारच विदारक आहे. कुणी उधारीवर पैसे द्यायला तयार नव्हते तर कुणी खायला देण्यास तयार होत नव्हते. गावाबाहेर जाणेही शक्य नसल्याने मिळतच पूर्णत: बंद झाली, असे विरु वैद्य धुर्वे यांनी सांगितले.झोपडीतील मुलांना काय वाटते...दिवाळीच्या दिवशी दररोज सारखचं खेळलो. सायंकाळी समोरच्या घरांवर दिसणारी रोषणाई आणि आकाशात उडणारे फटाके बघत होतो. आईने पालात जे काही शिजविले ते खाल्लं आणि झोपी गेलो. गोडधोडचा तर पत्ताच नाही. दिवाळीत नवीन कपडे आम्हाला कधीही नशिबी आले नाही, असे पालावरील खनको धुर्वे याने सांगितले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी