शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योग व मधमाशी पालनामुळे उत्पादनात वाढ

By admin | Updated: March 27, 2016 02:12 IST

रेशीम उद्योग हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मासिक उत्पन्न मिळण्याची हमी ...

एक दिवसीय कार्यशाळेतील सूरवर्धा : रेशीम उद्योग हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मासिक उत्पन्न मिळण्याची हमी असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास योग्य पर्याय आहे. मधमाशी पालनामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकते. मधमाशीद्वारे होणाऱ्या पराग सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनात दुपटीने वाढ होते. शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग व मधमाशी पालन हे व्यवसाय वरदान ठरणारे आहेत, असा सूर कार्यशाळेतील शेती, रेशीम व मधमाशी उद्योग तज्ज्ञांनी काढला. रेशीम उद्योग आणि जैविक कीड व्यवस्थापन केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व स्थानिक यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकदिवसीय रेशीम उद्योग व मधमाशी पालन तंत्रज्ञान शेतकरी कार्यशाळा’ घेण्यात आली. रेशीम व मधमाशी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात ‘तुतीची लागवड व रोग नियंत्रण’ विषयावर बोलताना रेशीम उद्योग संचालनालयाचे प्रकल्प अधिकारी व्ही.पी. रायसिंग भंडारा यांनी रेशीम उद्योगातील उत्पन्न हे मासिक वेतनासारखे असून रेशमाच्या किड्यांची योग्य काळजी घेतल्यास हा व्यवसाय शेतकऱ्यांना मासिक ५० हजार रुपये मिंळवून देणारा आहे, असे सांगितले. रेशीम उद्योग संचालनालय उपसंचालक डॉ. एस.के. शर्मा म्हणाले की, शेतकऱ्यांनी रेशमाच्या किड्यांचे संगोपन करून कोष विकसित करण्यापूरते मर्यादित न राहता कोष प्रक्रिया उद्योगाकडे वळून आपल्या उत्पादनाचे मार्केटींग केल्यास त्याला अधिक फायदा होऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.द्वितीय सत्रात ‘मधमाशी पालन’ विषयावर मधमाशी विकास केंद्र नालवाडीचे संचालक डॉ. गोपाल पालीवाल यांनी पीपीटीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतात आंतर पिके घेतल्यास मधमाशा मोठ्या संख्येने आकर्षित होतात व पराग सिंचनाचे कार्य अनेक पटीने वाढून पीक उत्पादनात वाढ होते. मधमाशी पालन व्यवसायाचे प्रशिक्षण प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावे. आपल्या शेतात मधमाशी पालन पेट्या लाऊन त्यांच्या वसाहती निर्माण कराव्यात, असे आवाहनही डॉ. पालिवाल यांनी केले. ‘पराग सिंचन’ विषयावर शिवाजी सायन्स कॉलेज पवनीचे प्रा.डॉ. बी. एस. रहिले यांनी स्वत:चे अनुभव कथन केले. श्रीकांत गजभिये यांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन अनेक मधमाशी वसाहती वसविल्या. असा प्रयोग वर्धा जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी नागपूर येथील सचिन करडभजने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मधमाशी पालन व्यवसायाबाबत चित्रफित दाखवित मार्गदर्शन केले. खादीग्रामोद्योगचे गुढे यांनी मधमाशी पालन व्यवसायाबाबत विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी व्ही.एम. पौनीकर यांनी शासकीय योजनांबाबत माहिती दिली. दिल्ली येथील केजरीवाल ग्रामसंस्थानचे संचालक योगेश्वरसिंग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. रेशीम उद्योग शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत रेशीम उद्योगतज्ज्ञ डॉ. एम.एम. राय यांनी वायफड येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण केले. दोन्ही सत्राला यशवंत ग्रामीण संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत, संचालक डॉ. किशोर अहेर, प्रतिभा निशाने, मनोहर निशाने, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, शास्त्रज्ञ प्रा.डॉ. एम.के. राठोड, शेतकरी नेते विजय जावंधिया, बाबासाहेब साळवे, किशोर माथनकर उपस्थित होते. संचालन प्रा. प्रमोद नारायणे व प्रा. चंदनकर यांनी केले तर आभार डॉ. उत्तम पारेकर व डॉ. दिलीप भुगुल यांनी मानले. कार्यशाळेला प्रा. फागसे, प्रा. खान, प्रा. जयश्री काशीकर, प्रा. कावळे, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, डॉ. बैस आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)