शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय रेशीम कोष उत्पादन करून दरमहा उत्पन्न घेता येते. जिल्ह्यात सुमारे ६०० एकरवर तुतीची लागवड करण्यात आली ...

ठळक मुद्देशैलेश नवाल : जिल्ह्यात ६०० एकरवर तुतीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय रेशीम कोष उत्पादन करून दरमहा उत्पन्न घेता येते. जिल्ह्यात सुमारे ६०० एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. तुती लागवडीपासून गावातच रोजगार निर्मिती होईल. यामुळे शेतकºयांनी रेशीम शेती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.रेशीम धागा निर्मिती प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शासनाकडून एक एकर तुती लागवड व कीटक संगोपनागृहाचे बांधकामासाठी मनरेगांतर्गत तीन वर्षाकरिता कुशल व अकुशल कामांसाठी प्रती लाभार्थ्याला प्रत्येक एकरासाठी २ लाख ९२ हजार ४६५ रूपये मजुरी स्वरूपात अनुदान देण्यात येते. शिवाय कोषापासून मिळणारे उत्पन्न वेगळे मिळते. त्यामुळे शेतकºयांना रेशीम शेतीपासून रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करून आपले स्त्रोत वाढवावे. यासाठी जिल्ह्यात ६०० एकर वर तुती लागवडीची नोंदणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा रोजंदारीवरील होणारा खर्च शासन करीत आहे. तसेच पारंपारिक पिकापेक्षा कमी खर्च, कमी मेहनत व जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करावी, असे आवाहन नवाल यांनी केले.