शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय रेशीम कोष उत्पादन करून दरमहा उत्पन्न घेता येते. जिल्ह्यात सुमारे ६०० एकरवर तुतीची लागवड करण्यात आली ...

ठळक मुद्देशैलेश नवाल : जिल्ह्यात ६०० एकरवर तुतीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय रेशीम कोष उत्पादन करून दरमहा उत्पन्न घेता येते. जिल्ह्यात सुमारे ६०० एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. तुती लागवडीपासून गावातच रोजगार निर्मिती होईल. यामुळे शेतकºयांनी रेशीम शेती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.रेशीम धागा निर्मिती प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शासनाकडून एक एकर तुती लागवड व कीटक संगोपनागृहाचे बांधकामासाठी मनरेगांतर्गत तीन वर्षाकरिता कुशल व अकुशल कामांसाठी प्रती लाभार्थ्याला प्रत्येक एकरासाठी २ लाख ९२ हजार ४६५ रूपये मजुरी स्वरूपात अनुदान देण्यात येते. शिवाय कोषापासून मिळणारे उत्पन्न वेगळे मिळते. त्यामुळे शेतकºयांना रेशीम शेतीपासून रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करून आपले स्त्रोत वाढवावे. यासाठी जिल्ह्यात ६०० एकर वर तुती लागवडीची नोंदणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा रोजंदारीवरील होणारा खर्च शासन करीत आहे. तसेच पारंपारिक पिकापेक्षा कमी खर्च, कमी मेहनत व जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करावी, असे आवाहन नवाल यांनी केले.