वडनेर : खरीप हंगाम महिन्याभरावर येवून ठेपला आहे. यावर्षी कपाशीच्या पेरणीक्षेत्रात १० हजार हेक्टरची वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने दर्शविले आहेत. पण शेतकरी मात्र सोयाबीन पीकक्षेत्रात वाढ होणार असल्याचे संकेत देत आहेत. परिसरात सोयाबीनचा पेरा वाढणार असून शेतकरी त्यादिशेने नियोजन करण्यात असल्याचे दिसते.सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात पन्नास टक्क्यांनी घट झाली असून वाढलेल्या पेरणीक्षेत्रामुळे यंदा बियाण्याची टंचाई भासणार असल्याचे बोलले जाते. खरीप हंगाम २०१४ मध्ये ३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबिनची पेरणी झाली होती. एकूण सरासरी पेरणी क्षेत्रात ४६ टक्के सोयाबीनचे क्षेत्र होते. यंदाच्या हंगामात किमान ४ लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र राहणार असून यंदाच्या सोयाबीन क्षेत्रात उच्चांक ठरणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून दिले जात आहे. दोन वर्षात सोयाबीनची स्थिती पाहता बियाणे टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाने बियाणे नियोजन केले असले तरी शेतकऱ्यांनी स्वत:जवळील सोयाबीन बियाणे प्रक्रिया करुन घेण्याचे आवाहन केल्याने बळीराजा तयारीला लागला आहे.(वार्ताहर)
शेतकरी देताहेत सोयाबीन क्षेत्रवाढीचे संकेत
By admin | Updated: May 15, 2015 01:57 IST