शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकरी देताहेत सोयाबीन क्षेत्रवाढीचे संकेत

By admin | Updated: May 15, 2015 01:57 IST

खरीप हंगाम महिन्याभरावर येवून ठेपला आहे. यावर्षी कपाशीच्या पेरणीक्षेत्रात १० हजार हेक्टरची वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने दर्शविले आहेत.

वडनेर : खरीप हंगाम महिन्याभरावर येवून ठेपला आहे. यावर्षी कपाशीच्या पेरणीक्षेत्रात १० हजार हेक्टरची वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने दर्शविले आहेत. पण शेतकरी मात्र सोयाबीन पीकक्षेत्रात वाढ होणार असल्याचे संकेत देत आहेत. परिसरात सोयाबीनचा पेरा वाढणार असून शेतकरी त्यादिशेने नियोजन करण्यात असल्याचे दिसते.सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात पन्नास टक्क्यांनी घट झाली असून वाढलेल्या पेरणीक्षेत्रामुळे यंदा बियाण्याची टंचाई भासणार असल्याचे बोलले जाते. खरीप हंगाम २०१४ मध्ये ३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबिनची पेरणी झाली होती. एकूण सरासरी पेरणी क्षेत्रात ४६ टक्के सोयाबीनचे क्षेत्र होते. यंदाच्या हंगामात किमान ४ लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र राहणार असून यंदाच्या सोयाबीन क्षेत्रात उच्चांक ठरणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून दिले जात आहे. दोन वर्षात सोयाबीनची स्थिती पाहता बियाणे टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाने बियाणे नियोजन केले असले तरी शेतकऱ्यांनी स्वत:जवळील सोयाबीन बियाणे प्रक्रिया करुन घेण्याचे आवाहन केल्याने बळीराजा तयारीला लागला आहे.(वार्ताहर)