शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सिग्नल ठरताहेत शोभेचे

By admin | Updated: March 29, 2015 02:11 IST

शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी याकरिता मोठ्या चौकात वाहतुक नियंत्रक दिवे (सिग्नल्स) लावण्यात आले होते. ते लागले त्या काळातच त्याचा उपयोग झाला.

वर्धा : शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी याकरिता मोठ्या चौकात वाहतुक नियंत्रक दिवे (सिग्नल्स) लावण्यात आले होते. ते लागले त्या काळातच त्याचा उपयोग झाला. गत दोन ते तीन वर्षांपासून ते केवळ चौकात नावालाच उभे आहेत. त्यांचा वापर केवळ जाहिरातींची फलके लावण्याकरिता होत असल्याचे दिसत आहे. या दिव्यांच्या खांबावर तजर काही ठिकाणी दिव्यांवरही जाहिरातींची फलके लावण्यात आली आहेत. यामुळे त्यांचे विद्रुपीकरण होत आहे. याची माहिती पालिका प्रशासनाला असूनही त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दिवे सुरू करण्यात काही वाटा पालिकेचा असता तरी त्यांच्याकडून याकडे मात्र सतत कानाडोळा झाल्याचे दिसून आले आहे. या नियंत्रक दिव्याचा पिशव्या अडकविण्याकरिता खुंटी म्हणून वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले़ या दिव्यांचे वीज बिल थकीत असल्याने ही यंत्रणा गत कित्येक दिवसांपासून बासनात गुंडाळण्यात आली आहे. शिवाजी चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे तर बेपत्ता झाल्याचे चित्र आहे. इतर वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबाचा बॅनर, होर्डिंग्ज लावण्याकरिता वापर केला जात आहे. आर्वी नाका परिसरातील एका वाहतूक नियंत्रक दिव्याचा वापर व्यावसायिकांकडून थैल्या अडकविण्याकरिता केला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले़ गुन्हेगारीवर वॉच ठेवण्याकरिता पोलीस विभागामार्फत या दिव्यांवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याने ते शोभेचे ठरत आहे़ या यंत्रणेवर लाखोंचा केलेला खर्च व्यर्थच गेल्याचे दिसते़ यामुळे वाहतुकीतील बेशिस्त आणखीच वाढली आहे़ याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)