शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

सिग्नल एक दिवास्वप्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:50 IST

वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून चौकात केवळ खांबच : वाहतूक सुरळीत होण्याऐवजी अडथळेच

ऑनलाईन लोकमतवर्धा : वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले. नवे अद्यावत वाहतूक नियंत्रक दिवे लावण्याचे काम झाले. रस्त्याच्या मधोमध खांब उभे करून दिवे लावण्याला सहा महिन्याचा कालावधी झाला; पण ते अद्यापही सुरू झाले नाही. यामुळे सिग्नल वर्धेकरांकरिता सध्यातरी दिवास्वप्नच ठरत असल्याचे दिसत आहे.आर्वी नाका व शिवाजी चौक येथे रस्त्याच्या मधोमध खांब उभे करून दिवे उभे करण्यात आले. रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या या खांबांना सुरक्षेकरिता कुठलीही सुविधा नसल्याने येथे वाहने आदळल्याच्या घटना घडल्या आहे. या घटना किरकोळ असल्याने मोठा अनर्थ टळला. याकडे दुर्लक्ष झाल्यास यातून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होणारी मोठी घटना टाळण्याकरिता संबंधीत विभागाने याकडे लक्ष देत पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.पुन्हा वाहतूक नियंत्रक दिवे बेपत्ता होण्याची शक्यतावर्धेत यापुर्वी शिवाजी चौक, बजाज चौक, आर्वी नाका, इंदिरा गांधी चौक आदी ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले होते. या दिव्यांना लवकरच घरघर लागल्याने ते काही काळातच बेपत्ता झाले. अनेक ठिकाणी या दिव्यांच्या खांबांना पाल बांधून काही जणांनी भाजीविक्री, चांभाराचे दुकान थाटले होते. तर शिवाजी चौक परिसरात खांबावर वाहने धडकल्याने त्यांनी आपली जागा सोडली होती. आताही उभ्या असलेल्या नव्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबाची हिच अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे लावलेले दिवे लवकर सुरू करून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची आठवण करून देणे गरजेचे झाले आहे. आर्वी नाका व बजाज चौक या दोन मोठ्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे अत्यंत गरजेचे झाले आहे. या चौकात पोलिसांना उभे राहण्याकरिताही जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच होत आहे.

आर्वी नाका परिसरात या सिंग्रच्या समोरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ते कमेरे सध्या स्थितीत सुरू आहे. मात्र या कॅमेºयाचे वायर खुले असल्याने येत्या काळात ते बंद पडण्याची शक्यता नाकारात येत नाही. शहरातील मोठा आणि पाच रस्त्यांचा एकमेव चौक असलेल्या या भागात वाहतूक नियंत्रकण दिवे असणे गरजेचे झाले आहे. शिवाय रस्त्याच्या मध्यभागी असलेले ड्रमही बेपत्ता होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी