शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

सिग्नल एक दिवास्वप्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:50 IST

वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून चौकात केवळ खांबच : वाहतूक सुरळीत होण्याऐवजी अडथळेच

ऑनलाईन लोकमतवर्धा : वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले. नवे अद्यावत वाहतूक नियंत्रक दिवे लावण्याचे काम झाले. रस्त्याच्या मधोमध खांब उभे करून दिवे लावण्याला सहा महिन्याचा कालावधी झाला; पण ते अद्यापही सुरू झाले नाही. यामुळे सिग्नल वर्धेकरांकरिता सध्यातरी दिवास्वप्नच ठरत असल्याचे दिसत आहे.आर्वी नाका व शिवाजी चौक येथे रस्त्याच्या मधोमध खांब उभे करून दिवे उभे करण्यात आले. रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या या खांबांना सुरक्षेकरिता कुठलीही सुविधा नसल्याने येथे वाहने आदळल्याच्या घटना घडल्या आहे. या घटना किरकोळ असल्याने मोठा अनर्थ टळला. याकडे दुर्लक्ष झाल्यास यातून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होणारी मोठी घटना टाळण्याकरिता संबंधीत विभागाने याकडे लक्ष देत पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.पुन्हा वाहतूक नियंत्रक दिवे बेपत्ता होण्याची शक्यतावर्धेत यापुर्वी शिवाजी चौक, बजाज चौक, आर्वी नाका, इंदिरा गांधी चौक आदी ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले होते. या दिव्यांना लवकरच घरघर लागल्याने ते काही काळातच बेपत्ता झाले. अनेक ठिकाणी या दिव्यांच्या खांबांना पाल बांधून काही जणांनी भाजीविक्री, चांभाराचे दुकान थाटले होते. तर शिवाजी चौक परिसरात खांबावर वाहने धडकल्याने त्यांनी आपली जागा सोडली होती. आताही उभ्या असलेल्या नव्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबाची हिच अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे लावलेले दिवे लवकर सुरू करून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची आठवण करून देणे गरजेचे झाले आहे. आर्वी नाका व बजाज चौक या दोन मोठ्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे अत्यंत गरजेचे झाले आहे. या चौकात पोलिसांना उभे राहण्याकरिताही जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच होत आहे.

आर्वी नाका परिसरात या सिंग्रच्या समोरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ते कमेरे सध्या स्थितीत सुरू आहे. मात्र या कॅमेºयाचे वायर खुले असल्याने येत्या काळात ते बंद पडण्याची शक्यता नाकारात येत नाही. शहरातील मोठा आणि पाच रस्त्यांचा एकमेव चौक असलेल्या या भागात वाहतूक नियंत्रकण दिवे असणे गरजेचे झाले आहे. शिवाय रस्त्याच्या मध्यभागी असलेले ड्रमही बेपत्ता होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी