शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

पावसाच्या संकेताने बळीराजाची लगबग

By admin | Updated: May 30, 2017 01:03 IST

रोहिणी नक्षत्र लागताच पावसाचे संकेत मिळाले आहे. यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

रोहिणी नक्षत्रात पावसाच्या सरी : बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव सुरू लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रोहिणी नक्षत्र लागताच पावसाचे संकेत मिळाले आहे. यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून आले आहे. उन्हाळवाहीची कामे पूर्ण करून पेरणीकरिता सारे फाडणे, शेताला कुंपण करणे आदि कामांसह बाजारात बियाण्यांकरिता गर्दी होणे सुरू झाले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात एकूण ४ लाख १८ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होणार असल्याचा आराखडा कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आला आहे. यात २ लाख २२ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ९ हजार २५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे संकेत कृषी विभागाच्या आराखड्यात आहेत. तर तुरीचा पेरा ७७ हजार ७०० हेक्टरवर होणार असल्याचे आराखड्यात म्हटले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात कपाशीचा पेरा वाढणार असून नियोजित क्षेत्राकरिता संकरित कपाशीची ४ हजार ४४० क्विंटल बियाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सोयाबीची ५३ हजार २६० क्विंटल बियाणे गरजेचे आहे. तर यंदा बाजाराऐवजी इतरत्र भाव खाणाऱ्या तुरीची ४ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत मुबलक बियाणे असून शेतकऱ्यांना भटकंती करावी लागणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केवळ बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांच्यावतीने देण्यात आला आहे. बियाण्यांसह खतांचीही मागणी होणार असून कृषी विभागाच्यावतीने त्याची मागणी पूर्वीच करून ठेवली आहे. जिल्ह्याला यंदाच्या हंगामात सरळ, संयुक्त आणि मिश्र खते असे एकूण १ लाख २८ हजार २०० क्विंटल खताची गरज आहे. यापेक्षा अधिक खत जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. यात गत हंगामातील काही शिल्लक खताचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या हंगामाकरिता कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली असून पावसाचे संकेत मिळत असल्याने शेतकरीही कामाला लागला आहे. रोहिणी नक्षत्र लागताच आकाशात ढग दाटणे सुरू झाले. ढग दाटताच सर्वत्र बळीराजाने शेतीच्या कामांना वेग दिला आहे. शेती कामामुळे ग्रामीण भागात लगबग सुरू झाली आहे. यंदा मान्सूनपूर्व पेरणीला पाठ पावसाळा सुरू होण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणी केल्या जात होती. यंदा मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पेरणीला बगल दिल्याचे दिसून आले आहे. ओलिताची सोय असतानाही केवळ कायम असलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांनी याला पाठ दिल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण झाली असून जोमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हातबट्ट्याचे व्यवहार शासनाकडून कर्जमाफी मिळेल या आशेत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही. यामुळे त्यांना नवे कर्ज मिळण्याची आशा मावळली आहे. यामुळे शेतीची कामे हातबट्ट्याच्या व्यवहारावर सुरू आहे. परिणामी बळीराजा पुन्हा सावकाराच्या दारी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.