शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

पावसाच्या संकेताने बळीराजाची लगबग

By admin | Updated: May 30, 2017 01:03 IST

रोहिणी नक्षत्र लागताच पावसाचे संकेत मिळाले आहे. यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

रोहिणी नक्षत्रात पावसाच्या सरी : बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव सुरू लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रोहिणी नक्षत्र लागताच पावसाचे संकेत मिळाले आहे. यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून आले आहे. उन्हाळवाहीची कामे पूर्ण करून पेरणीकरिता सारे फाडणे, शेताला कुंपण करणे आदि कामांसह बाजारात बियाण्यांकरिता गर्दी होणे सुरू झाले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात एकूण ४ लाख १८ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होणार असल्याचा आराखडा कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आला आहे. यात २ लाख २२ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ९ हजार २५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे संकेत कृषी विभागाच्या आराखड्यात आहेत. तर तुरीचा पेरा ७७ हजार ७०० हेक्टरवर होणार असल्याचे आराखड्यात म्हटले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात कपाशीचा पेरा वाढणार असून नियोजित क्षेत्राकरिता संकरित कपाशीची ४ हजार ४४० क्विंटल बियाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सोयाबीची ५३ हजार २६० क्विंटल बियाणे गरजेचे आहे. तर यंदा बाजाराऐवजी इतरत्र भाव खाणाऱ्या तुरीची ४ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत मुबलक बियाणे असून शेतकऱ्यांना भटकंती करावी लागणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केवळ बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांच्यावतीने देण्यात आला आहे. बियाण्यांसह खतांचीही मागणी होणार असून कृषी विभागाच्यावतीने त्याची मागणी पूर्वीच करून ठेवली आहे. जिल्ह्याला यंदाच्या हंगामात सरळ, संयुक्त आणि मिश्र खते असे एकूण १ लाख २८ हजार २०० क्विंटल खताची गरज आहे. यापेक्षा अधिक खत जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. यात गत हंगामातील काही शिल्लक खताचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या हंगामाकरिता कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली असून पावसाचे संकेत मिळत असल्याने शेतकरीही कामाला लागला आहे. रोहिणी नक्षत्र लागताच आकाशात ढग दाटणे सुरू झाले. ढग दाटताच सर्वत्र बळीराजाने शेतीच्या कामांना वेग दिला आहे. शेती कामामुळे ग्रामीण भागात लगबग सुरू झाली आहे. यंदा मान्सूनपूर्व पेरणीला पाठ पावसाळा सुरू होण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणी केल्या जात होती. यंदा मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पेरणीला बगल दिल्याचे दिसून आले आहे. ओलिताची सोय असतानाही केवळ कायम असलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांनी याला पाठ दिल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण झाली असून जोमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हातबट्ट्याचे व्यवहार शासनाकडून कर्जमाफी मिळेल या आशेत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही. यामुळे त्यांना नवे कर्ज मिळण्याची आशा मावळली आहे. यामुळे शेतीची कामे हातबट्ट्याच्या व्यवहारावर सुरू आहे. परिणामी बळीराजा पुन्हा सावकाराच्या दारी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.