शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सिकलसेल रुग्णांत वाढ

By admin | Updated: January 25, 2017 00:46 IST

गंभीर व अनुवांशिक असलेल्या सिकलसेलची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.

नऊ लाख नागरिकांची तपासणी : जिल्ह्यात २८ हजार ६८ रोगवाहक गौरव देशमुख   वायगाव (नि.) गंभीर व अनुवांशिक असलेल्या सिकलसेलची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी ठरत आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालयात २००९ पासून तर जिल्ह्यात २०१०-११ पासून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ ते ३० वर्षे वयोगटातील ८ लाख ८२ हजार ८०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १ हजार ४७२ सिकलसेलग्रस्त रुग्ण आणि २८ हजार ६८ सिकलसेल वाहक आढळून आलेत. सदर रुग्णांना उपचारासाठी शासनाकडून औषधी पुरवठा केला जात आहे. सिकलसेल आजारात लाल रक्तपेशी आपला गोल आकार बदलवून कोयत्याच्या आकाराच्या बनतात. साधारण रक्तपेशी गोल असल्याने त्या शरीराच्या सर्व भागात रक्त वाहून नेतात; सिकलसेल आजार जडलेल्या व्यक्तीच्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांतून रक्त वाहून नेऊ शकत नाहीत. त्या घट्ट आणि चिकट होतात. ते रक्त वाहिन्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण करतात. परिणामी, अवयवांना पुरेसे आॅक्सिजन मिळत नसल्याने अवयव निकामी होतात. सिकलसेलग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करणे, त्याच्या रक्ताची तपासणी करण्याचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून करण्यात येतात. वाढत्या रुग्णसंख्येवर केवळ नियंत्रण हाच उपाय आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सिकलसेल आजाराची तपासणी सोल्युक्लिटी, इलेक्ट्रोफोरेसिस आणि एचपीएलसी या पद्धतीने केली जाते. सोल्युबिलिटी चाचणी ही सर्व रुग्णालयांमध्ये केली जाते; पण इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केवळ आर्वी, हिंगणघाट येथील उपजिल्हा तथा वर्धा सामान्य रुग्णालय या तीन ठिकाणीच केली जाते. एचपीएलसी तपासणी मात्र नागपूर येथील एक शासकीय रुग्णालयत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील रुग्णालयामध्ये करण्यात येते. आई आणि वडील हे दोन्ही सिकलसेलग्रस्त व वाहक असतील तर अपत्यांनाही हा आजार होतो. यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व्यक्ती शोधून काढणे आणि त्यांचे आपापसातील विवाह टाळणे गरजेचे झाले आहे. समाज सिकलसेलमुक्त करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. लग्नापूर्वीच सिकलसेल रक्त तपासणी करणे हाच निरोगी अपत्याला जन्म देण्याचा एकमेव व साधा उपाय आहे. यामुळे जोडप्यांनी सिकलसेलची तपासणी करून घेणे आवश्यक झाले आहे. सदर रुग्णांना शासनाकडून आर्थिक मदतही केली जाते. रुग्णांना मोफत रक्त देण्यासोबतच औषध आणि उपचाराकरिता प्रशासनाकडून दरमहा ६०० रुपयांची मदत केली जाते. विभागासह विविध सवलती दिल्या जातात.