शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शुभांगी केवळ एका प्रवर्गाची की समाजाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:30 IST

शुभांगी मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय होत असल्याचा आरोप करून आदिवासी समाजबांधवांनी रस्त्यावर येत न्यायाची मागणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्यांची मागणी सार्थ असल्याचे गोंडवाना संघटनांकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देशुभांगी मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय होत असल्याचा आरोप

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शुभांगी मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय होत असल्याचा आरोप करून आदिवासी समाजबांधवांनी रस्त्यावर येत न्यायाची मागणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्यांची मागणी सार्थ असल्याचे गोंडवाना संघटनांकडून सांगण्यात आले. आपल्या मुलीवर अन्याय होत असल्याचे पाहून एका हाकेवर विदर्भातील गडचिरोली सारख्या मागास भागातूनही गोंडवाना वर्धेत दाखल झाले. त्यांची संख्या पाहून सर्वच अवाक् झाले. पोलिसांनाही विचार करण्यास बाध्य करणारा हा मोर्चा म्हणावा लागेल!वर्धेत रूपेश मुळे नरबळी प्रकरण असो, वा हल्ली घडलेले; पण पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केलेले समीर मेटांगळे हत्या प्रकरण असो, अन्यायाची चाहूल लागताच सारेच रस्त्यावर येतात, हा इतिहास आहे. अन्याय-अत्याचार विरोधात आंदोलनातून न्याय मागण्याची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचा हा जिल्हा आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणातही वर्धेकरांनी रस्त्यावर येत व्यवस्थेचा निषेध नोंदविला होता. येथे तर शुभांगी वर्धेतील एका आपल्या गावातीलचं! मग, तिच्यासाठी रस्त्यावर येण्यात इतर सामाजिक संघटनांची माघार समाजभान जपणाºया वर्धेकरांच्या भावना बोथट झाल्याचे दर्शविणारी ठरत आहे. याचा कुठेतरी विचार होणे अपेक्षित आहे.शुभांगीच्या मृत्यू प्रकरणात गोंडवानाने काढलेल्या मोर्चात कदाचित इतर संघटनांना आमंत्रित केले नसावे; पण कुणावर होणाºया अन्यायाविरोधात आवाज उठविण्याकरिता आमंत्रणाची वाट पाहणारे वर्धेकर नाही. न्यायाच्या मागणीत जर ‘ही आमची, तो तुमचा’, असा विचार झाला तर न्याय मिळणे नाही. याचा वेळीच विचार झाला पाहिजे. अन्यथा, शुभांगीला कधीच न्याय मिळणार नाही. म्हणूनच ती कुण्या एका प्रवर्गाची नाही तर या समाजाची म्हणून सर्वांनी एकत्र येत न्यायाकरिता आवाज उठविण्याची गरज आहे.या प्रकरणात जिल्हा प्रशासनाला निवेदनेही देण्यात येत आहे; पण तेही एका ठराविकांकडूनच, असे का? महिलांवर अत्याचार झाल्यास लढा उभारण्याकरिता नेहमी तत्पर असलेल्या इतर संघटना सध्या या प्रकरणात चुप्पी साधून असल्याचे वर्धेत दिसत आहे. त्यांनी रस्त्यावर येत शुभांगीकरिता आवाज उठविल्यास तिला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे म्हणत जिल्ह्यात गोंडवाना रस्त्यावर उतरले. ही मुलगी त्यांची म्हणून त्यांचा आक्रोश असल्याचे बोलले गेले; पण त्यांच्या आरोपानुसार घटना घडली असेल तर शुभांगी समाजाची म्हणून इतर सामाजिक संघटनांनी रस्त्यावर येणे अपेक्षित होते. तसे झाले नाही, म्हणूनच ती एका प्रवर्गाची की समाजाची, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.