शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

शिंदोल्यांचे झाड दुर्मिळ; चटया, झापड्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

सेवाग्राममध्ये प्रारंभी मोठ्या प्रमाणावर शिंदोल्याची झाडे आणि शिंदोल्याचे बण होते. यात चव्हाण परिवाराचे शिंदोल्यांच्या बण प्रसिद्ध होते. गावात फडे आणि झांज्या बणविण्याची पध्दती होती. सेवाग्राममध्ये मातीच्या भिंती घालून विविध कुट्यांची निर्मिती करण्यात आली.

ठळक मुद्देकारागिरांचीही वानवा : आश्रमातील स्मारकाएवढेच राहिले महत्त्व, उपाययोजना करण्याची गरज

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : प्राकृतिक जीवन पध्दती आणि ग्रामीण भागात जे उपलब्ध आहे त्यांचाच वापर करण्यावर गांधीजींचा अधिक भर होता. यातूनच रोजगार आणि स्वावलंबी जीवन पध्दती निर्माण होणार होती, याची जाणीव बापूंना होती. यासाठी म्हणून त्यांनी आश्रमात शिंदोल्यांच्या पानोळ्यापासून चटया, आसन, झापड्या आणि फडे तयार करण्याच्या कामाला प्राधान्य आणि प्रोत्साहन दिले होते. पण, काळाच्या ओघात शिंदोल्यांचे झाडे दुर्मिळ झाली. कारागीरही मिळणे कठीण झाल्याने आता जिल्ह्यात चटया आणि झापड्यांची समस्या व अडचण निर्माण होऊन ज्या आहेत त्या सांभाळून ठेवण्याची कसरत आश्रम व्यवस्थापकांना करावी लागत आहे.सेवाग्राममध्ये प्रारंभी मोठ्या प्रमाणावर शिंदोल्याची झाडे आणि शिंदोल्याचे बण होते. यात चव्हाण परिवाराचे शिंदोल्यांच्या बण प्रसिद्ध होते. गावात फडे आणि झांज्या बणविण्याची पध्दती होती. सेवाग्राममध्ये मातीच्या भिंती घालून विविध कुट्यांची निर्मिती करण्यात आली.त्यामुळे आश्रमात सर्व प्रकारच्या चटया, फडे आणि कुट्यांना झांज्यांची आवश्यकता पडायला लागली. पावसाच्या पाण्यापासून मातींच्या भिंती संरक्षण करण्याकरिता घरांच्या भिंतींना झांज्या बांधण्यांची तशी जुनीच पद्धत आहे. गांधीजींनी सुध्दा यांच्या उपयोगावर विशेष भर दिल्याने मागणी वाढली. एवढेच नाही तर या झाडांपासून निरा काढण्याचे आणि गुळ बणविण्याचे काम सुरू करण्यात आले. कारागीरांना काम मिळायला लागल्याने रोजगार निर्माण झाला. कालांतराने तो वाढतही गेला. यातून नवीन कारागीर तयार होऊन ग्रामोद्योगाला चालणा मिळाली. आश्रमात झोपणे, भोजन करणे व बसणे या करीता पानोळ्यांपासून चटया व आसने तयार करण्यात येऊ लागले.त्याच्याच दैनंदिन जीवनातही वापर होऊ लागला. आजही आदी निवास व बा कुटीत प्रत्येकी एक तर बापू कुटीत चार चटया दिसून येतात. आश्रमात येणारे कार्यकर्ते असो, विदेशी पाहूने किंवा राष्ट्रीय नेते, सर्व याच चटयावर बसतात.रसोड्यात याच चटयांवर बसून जेवनही करतात. त्यामुळे आता सध्या शिंदोल्यांच्या झाडांच्या दुर्मिळतेमुळे या वस्तुंचे स्मारकापुरतेच महत्त्व राहिलेले असून त्याची जपणूक केली जात आहे.बाहेर जिल्ह्यातून आयातजिल्हातच शिंदोल्याचे झाडे दुर्मिळ झाली आहे. त्याच सोबत चटया बनविणारे कारागिरही मिळणे कठीण झाल्याने भंडारा जिल्हातील तुमसर येथून चटया बनवून आणाव्या लागत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात तुमसर येथून विविध आकाराच्या १८ चटया बणवून आणण्यात आल्या. यासाठी हिराभाई यांचे सहकार्य मिळाले. यापैकी सहा चटया आश्रमातील स्मारकात टाकण्यात आली. तर उर्वरीत चटया सुरक्षित ठेवण्यात आल्या आहे.आश्रमातील कुटींच्या भिंतींचे संरक्षण करण्यासह नित्य वापराकरिता चटया व झांजीची आवश्यकता आहे. परंतु शिंदोल्यांची झाडे संपल्याने मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे आश्रमाच्या शेतात शिंदोल्यांची झाडे लावण्याची बाब विचाराधिन आहेत.टी.आर.एन.प्रभू, अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान,सेवाग्रामसेवाग्राम परिसरातूनच शिंदोल्याची झाडे हद्दपार झाल्यामुळे येत्या काही दिवसात अडचणी वाढणार आहे. आश्रमातील कुट्यांची सुरक्षा कशी करावी असाही प्रश्न निर्माण होणार असल्याने आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.विजय धुमाळे, व्यवस्थापक, मकान विभाग सेवाग्राम