शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बेलाचे पान वाहन्यापेक्षा बेल वृक्ष लावून श्रावणमासारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:08 IST

श्रावण महिन्यात सर्वांकडून बेलपत्र तोडून ते शिवलिंगावर वाहण्यात येते. यात निसर्गाची हानी होते.

वैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम : शिवलिंग तयार करून हनुमान टेकडीवर वृक्षारोपणलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: श्रावण महिन्यात सर्वांकडून बेलपत्र तोडून ते शिवलिंगावर वाहण्यात येते. यात निसर्गाची हानी होते. ती थांबावी याकरिता वैद्यकीय जनजागृतीमंचच्यावतीने हनुमान टेकडीवर दगडाचे शिवलिंग तयार करून त्यात बेलाचे रोपटे लावत त्याचे संगोपण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. ओसाड आणि दगडांची टेकडी म्हणून ओळख असलेल्या हनुमान टेकडीची अशा उपक्रमातून जुनी ओळख पुसत नवी निसर्गरम्य टेकडी म्हणून ओळख होवू लागली आहे. हनुमान टेकडीवर वेद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने जलसंधारणासह वृक्षारोपण करून टेकडीवर हिरवळ निर्माण करण्याचा उपक्रम गत काही दिवसांपासून सुरू आहे. या उपक्रमात प्रत्येक सणाला काही ना काही नवा उपक्रम राबविण्याचा मंचच्या सदस्यांकडून पायंडा पाडल्या जात असल्याचे दिसत आहे. या शिवाय प्रत्येक रविवारी येथे महाश्रमदानातून वृक्षारोपण सुरू असते. या महाश्रमदानात वर्धेतील विविध शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्था सहभागी होत असतात. या संस्थांकडून झालेल्या वृक्षारोपणाची काळजी मंचाच्या सदस्यांकडून करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. हननुमान टेकडीची एक बाजू आता वृक्षारोपणाने पूर्ण झाली असून दुसऱ्या बाजूला वृक्षारोपणाचे काम सुरू करण्यात आले आनले आले आहे. याकरिता वैद्यकीय जनाजगत्ृाी मंचाच्यावतीने सर्वांना सहकार्य मिळत आहे. झाडांना १०८ वेळा पाणी देण्याचा संकल्प जलसंधारण आणि वृक्षारोपणाचे अविरत कार्य सुरू असलेल्या वैद्यकीय जनाजागृती मंचच्या सदस्यांनी आज १०८ वेळा बेलपत्र वाहण्यापेक्षा लावलेल्या सर्वच रोपट्यांना वर्षात १०८ वेळा पाणी देण्याचा संकल्प केला. यातून या रोपट्यांना तीन दिवसांआड पाणी मिळणार आहे. या पाण्यातून त्यांचे संगोपण होणार असल्याची माहिती मंचच्या सदस्यांनी दिली. नागरिकांनी जनावरे सोडू नये टेकडीवर वृक्षारोपण आणि जलसंधारणातून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र काही नागरिकांकडून या भागात चरण्याकरिता जनावरे सोडण्यात येत आहे. यामुळे लावलेल्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची काळजी घेत परिसरातील नागरिकांनी त्यांची जनावरे या भागात सोडू नये, असे आवाहन मंचच्यावतीने करण्यात येत आहे. शिवाय जिल्हा प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.