शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

तूर उत्पादकांना फटका

By admin | Updated: August 22, 2016 00:39 IST

जिल्ह्यात नऊ हजारापेक्षा जास्त भाव असलेल्या तुरीचे दर शनिवारी पाच ते सहा हजाराने पडले.

शेतकरी चिंतातूर : एका महिन्यात चार हजारांची घसरणवर्धा : जिल्ह्यात नऊ हजारापेक्षा जास्त भाव असलेल्या तुरीचे दर शनिवारी पाच ते सहा हजाराने पडले. यामुळे दरवाढीच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना या एका महिन्यात सरासरी चार हजार रुपयांची फटका बसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील बाजार समितीत देत असलेले दर पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. यामुळे दरवाढीच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. तुरीचे भाव गत वर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्यात वाढतील या अपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या तुरी न विकता घरी साठवून ठेवल्या होत्या. अशा शेतकऱ्यांना यामुळे चांगलाच फटका बसला आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी तुरीचे भाव प्रति क्विंटल नऊ हजारावर होते. तुरीचे भाव दहा हजार होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तुरी घरी साठवून ठेवल्या. जुलैच्या १५ तारखेपासून तुरीचे भाव पडणे सुरू झाले. एक महिन्याच्या कालावधीत तुरीचे भाव चार हजाराने कमी होवून आता ते सहा हजाराने खाली आले आहे. एका महिन्यात भावात झालेल्या या घसरणीमुळे तूर उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. तुरीचे बाजारभाव दररोज खाली येत आहे. ते येत्या दिवसात कधीतरी वाढतील या आशेने ज्या शेतकऱ्यांनी तुरी घरी ठेवल्या त्यांची चिंता वाढली आहे. बाजारात कोणत्याच वस्तूचे भाव अस्थिर राहत नाही. याला अपवाद फक्त शेतकऱ्यांचा माल ठरतो. ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. तूर डाळीचे भाव वधारताच समाजातील सर्व घटक ओरड करतात. आता शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान होत असताना कोणीच आवाज काढत नाही. वास्तविकता बाजारात आजही उत्तम तूर डाळ १२० ते १३० रुपये किलो आहे.शासनाने स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून दिलेली डाळ ९५ रुपये किलो असली तरी तिचा दर्जा निकृष्ठ असल्याची ओरड आहे. विदर्भातील स्वस्त धान्य दुकानातून १०३ रुपये किलोप्रमाणे वितरीत होणारी तूर डाळ अत्यंत निकृष्ठ प्रतीची असल्याने स्वस्त धान्य दुकानदार तिची उचल करण्यास उत्सूक नसल्याची चर्चा बाजारात आहे.(प्रतिनिधी)