शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

पाणीवापर अल्प, तरी देयक आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:16 IST

पाण्याचा दरमहा पाच युनिटपेक्षा कमी वापर होत असतानाही ग्राहकांना किमान वापराचे १६९ रुपये देयक दिले जात असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही पठाणी वसुली त्वरित थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

ठळक मुद्देमजिप्राची पठाणी वसुली : तक्रारीला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाण्याचा दरमहा पाच युनिटपेक्षा कमी वापर होत असतानाही ग्राहकांना किमान वापराचे १६९ रुपये देयक दिले जात असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही पठाणी वसुली त्वरित थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.पिपरी (मेघे) अधिक १० गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००९ पासून ग्रामीणकरिता ५.२५ रुपये प्रतियुनिट आकारण्याचे अधिसूचनेत नमूद आहे. मात्र ही सर्व गावे ग्रामपंचायतीमध्ये मोडणारी असल्याने जीवन प्राधिकरणाकडून पेरिअर्बन समजून शहरी दर आकारले जात आहेत. पाणीटंचाईमुळे आठ-नऊ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. गरजेपुरताही पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक भरडले जात आहेत. यामुळे पाणीवापर दरमहा पाच युनिटपेक्षा कमी होत आहे. प्राधिकरणाने योजनेचे ग्रामीण पाणीपुरवठा हे नाव बदलून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना केले आहे. ग्राहकांकडून पाणी वापरापोटी १७.३० रुपये प्रतियुनिट दराने वसुली केली जात आहे. या अन्यायकारक बाबीकडे शासनाने लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण ग्राहकांची होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी वासुदेव राठोड, राजेंद्र ढोबळे, अनिल मुर्डिव, रमेश गुरनुले, लीना टाले, श्याम चंद्रा, अरुण महाबुद्धे, एन. टी. गुजरकर, अजय तळवेकर, प्रमोद टाले, नामदेव रत्नाकर भोयर यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.प्रकरण चालविण्यात मजिप्राची टाळाटाळराष्ट्रीय ग्राहक आयोग, नवी दिल्ली यांनी एका ग्राहकाला ग्रामीण दर ५.२५ रुपये प्रतियुनिट लागू केले आहे. ग्रामीण भागातील सर्वच ग्राहकांना ग्रामीण दर लागू करावे याकरिता प्रकरण वर्धा ग्राहक मंचाकडे पाठविण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रकरण चालविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे. अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी होत आहे.