शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

पाणीवापर अल्प, तरी देयक आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:16 IST

पाण्याचा दरमहा पाच युनिटपेक्षा कमी वापर होत असतानाही ग्राहकांना किमान वापराचे १६९ रुपये देयक दिले जात असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही पठाणी वसुली त्वरित थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

ठळक मुद्देमजिप्राची पठाणी वसुली : तक्रारीला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाण्याचा दरमहा पाच युनिटपेक्षा कमी वापर होत असतानाही ग्राहकांना किमान वापराचे १६९ रुपये देयक दिले जात असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही पठाणी वसुली त्वरित थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.पिपरी (मेघे) अधिक १० गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००९ पासून ग्रामीणकरिता ५.२५ रुपये प्रतियुनिट आकारण्याचे अधिसूचनेत नमूद आहे. मात्र ही सर्व गावे ग्रामपंचायतीमध्ये मोडणारी असल्याने जीवन प्राधिकरणाकडून पेरिअर्बन समजून शहरी दर आकारले जात आहेत. पाणीटंचाईमुळे आठ-नऊ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. गरजेपुरताही पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक भरडले जात आहेत. यामुळे पाणीवापर दरमहा पाच युनिटपेक्षा कमी होत आहे. प्राधिकरणाने योजनेचे ग्रामीण पाणीपुरवठा हे नाव बदलून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना केले आहे. ग्राहकांकडून पाणी वापरापोटी १७.३० रुपये प्रतियुनिट दराने वसुली केली जात आहे. या अन्यायकारक बाबीकडे शासनाने लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण ग्राहकांची होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी वासुदेव राठोड, राजेंद्र ढोबळे, अनिल मुर्डिव, रमेश गुरनुले, लीना टाले, श्याम चंद्रा, अरुण महाबुद्धे, एन. टी. गुजरकर, अजय तळवेकर, प्रमोद टाले, नामदेव रत्नाकर भोयर यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.प्रकरण चालविण्यात मजिप्राची टाळाटाळराष्ट्रीय ग्राहक आयोग, नवी दिल्ली यांनी एका ग्राहकाला ग्रामीण दर ५.२५ रुपये प्रतियुनिट लागू केले आहे. ग्रामीण भागातील सर्वच ग्राहकांना ग्रामीण दर लागू करावे याकरिता प्रकरण वर्धा ग्राहक मंचाकडे पाठविण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रकरण चालविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे. अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी होत आहे.