शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

नोटाबंदीनंतर पुन्हा रोकड तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:04 AM

नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकॅशलेस एटीएमने वाढविली डोकेदुखी : बहुतांश एटीएमवर ‘नो-कॅश’चे फलक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील एकूण १७६ एटीएम पैकी सुमारे ८० टक्के एटीएम समोर नो-कॅशचे फलक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे असे एकूण १७६ एटीएम कक्ष आहेत. त्यापैकी बहूतांश एटीएम कक्षात रोकड टाकण्याची जबाबदारी बँकांनी खासगी कंपन्यांना दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी प्रत्येक दिवशी सुमारे सहा कोटी रोकडची गरज असते. परंतु, सध्यास्थितीत प्रत्येक पंधरा दिवसांच्या कालावधीत केवळ १ कोटींची रोकडच जिल्ह्याला प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध आर्थिक व्यवहार करण्यासाठी होत असलेली रोकडची मागणी व त्याच्या तुलनेत रिझर्व बँकेकडून नाममात्र होणारा रोकड पुरवठा यामुळे अनेक एटीएम सध्या कॅशलेस असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहराचा फेरफटका मारला असता बहूतांश एटीएम समोर नो-कॅशचा फलक कायम असल्याचे दिसून आले. रोकड काढणाऱ्यांना कॅश असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंतीच करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ज्या एटीएम मध्ये रोकड आहे तेथे रोकड काढणाºयांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. एकूणच कॅशलेस एटीएमने सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखीच वाढविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.२००० च्या नोटांचा तुटवडाकेंद्र सरकारकडून नव्याने संसदेत आणण्यात येणारे विधेयक व नुकत्याच उघडकीस आलेल्या पीएनबी बँक घोटाळ्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक एटीएममधून पूर्वी प्रमाणे दोन हजाराचे चलन निघत नसल्याचे दिसते. काहींनी दोन हजारांचे चलन आपल्याकडे साठवून ठेवल्याने दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा जिल्ह्यात जाणवत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.आॅनलाईन व डिजिटलकडे पाठडिजिटल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार प्रत्येकाने आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यात सध्यास्थितीत नागरिकांकडून आॅन लाईन पद्धतीने व डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याकडे पाठ दाखविल्या जात आहे. त्यामुळे रोकडच्या मागणीत वाढ होऊन रोकड तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. ही परिस्थिती अशीच आणखी पंधरा दिवस कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.गरज सहा कोटींची; पण प्राप्त होतात केवळ एक कोटीनागरिकांनी डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत आपले आर्थिक व्यवहार केल्यास प्रत्येक दिवशी १ कोटी रोकड असल्यास रोकड तुटवडा जाणवणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी दररोज ६ कोेटी रोकड जिल्ह्याला प्राप्त होत होती. परंतु, आता चौदा दिवसांच्या कालावधी लोटल्यानंतर केवळ १ कोटी इतकीतच रक्कम प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.