शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर पुन्हा रोकड तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:04 IST

नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकॅशलेस एटीएमने वाढविली डोकेदुखी : बहुतांश एटीएमवर ‘नो-कॅश’चे फलक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील एकूण १७६ एटीएम पैकी सुमारे ८० टक्के एटीएम समोर नो-कॅशचे फलक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे असे एकूण १७६ एटीएम कक्ष आहेत. त्यापैकी बहूतांश एटीएम कक्षात रोकड टाकण्याची जबाबदारी बँकांनी खासगी कंपन्यांना दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी प्रत्येक दिवशी सुमारे सहा कोटी रोकडची गरज असते. परंतु, सध्यास्थितीत प्रत्येक पंधरा दिवसांच्या कालावधीत केवळ १ कोटींची रोकडच जिल्ह्याला प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध आर्थिक व्यवहार करण्यासाठी होत असलेली रोकडची मागणी व त्याच्या तुलनेत रिझर्व बँकेकडून नाममात्र होणारा रोकड पुरवठा यामुळे अनेक एटीएम सध्या कॅशलेस असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहराचा फेरफटका मारला असता बहूतांश एटीएम समोर नो-कॅशचा फलक कायम असल्याचे दिसून आले. रोकड काढणाऱ्यांना कॅश असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंतीच करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ज्या एटीएम मध्ये रोकड आहे तेथे रोकड काढणाºयांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. एकूणच कॅशलेस एटीएमने सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखीच वाढविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.२००० च्या नोटांचा तुटवडाकेंद्र सरकारकडून नव्याने संसदेत आणण्यात येणारे विधेयक व नुकत्याच उघडकीस आलेल्या पीएनबी बँक घोटाळ्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक एटीएममधून पूर्वी प्रमाणे दोन हजाराचे चलन निघत नसल्याचे दिसते. काहींनी दोन हजारांचे चलन आपल्याकडे साठवून ठेवल्याने दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा जिल्ह्यात जाणवत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.आॅनलाईन व डिजिटलकडे पाठडिजिटल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार प्रत्येकाने आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यात सध्यास्थितीत नागरिकांकडून आॅन लाईन पद्धतीने व डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याकडे पाठ दाखविल्या जात आहे. त्यामुळे रोकडच्या मागणीत वाढ होऊन रोकड तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. ही परिस्थिती अशीच आणखी पंधरा दिवस कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.गरज सहा कोटींची; पण प्राप्त होतात केवळ एक कोटीनागरिकांनी डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत आपले आर्थिक व्यवहार केल्यास प्रत्येक दिवशी १ कोटी रोकड असल्यास रोकड तुटवडा जाणवणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी दररोज ६ कोेटी रोकड जिल्ह्याला प्राप्त होत होती. परंतु, आता चौदा दिवसांच्या कालावधी लोटल्यानंतर केवळ १ कोटी इतकीतच रक्कम प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.