शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नोटाबंदीनंतर पुन्हा रोकड तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:04 IST

नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकॅशलेस एटीएमने वाढविली डोकेदुखी : बहुतांश एटीएमवर ‘नो-कॅश’चे फलक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील एकूण १७६ एटीएम पैकी सुमारे ८० टक्के एटीएम समोर नो-कॅशचे फलक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे असे एकूण १७६ एटीएम कक्ष आहेत. त्यापैकी बहूतांश एटीएम कक्षात रोकड टाकण्याची जबाबदारी बँकांनी खासगी कंपन्यांना दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी प्रत्येक दिवशी सुमारे सहा कोटी रोकडची गरज असते. परंतु, सध्यास्थितीत प्रत्येक पंधरा दिवसांच्या कालावधीत केवळ १ कोटींची रोकडच जिल्ह्याला प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध आर्थिक व्यवहार करण्यासाठी होत असलेली रोकडची मागणी व त्याच्या तुलनेत रिझर्व बँकेकडून नाममात्र होणारा रोकड पुरवठा यामुळे अनेक एटीएम सध्या कॅशलेस असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहराचा फेरफटका मारला असता बहूतांश एटीएम समोर नो-कॅशचा फलक कायम असल्याचे दिसून आले. रोकड काढणाऱ्यांना कॅश असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंतीच करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ज्या एटीएम मध्ये रोकड आहे तेथे रोकड काढणाºयांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. एकूणच कॅशलेस एटीएमने सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखीच वाढविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.२००० च्या नोटांचा तुटवडाकेंद्र सरकारकडून नव्याने संसदेत आणण्यात येणारे विधेयक व नुकत्याच उघडकीस आलेल्या पीएनबी बँक घोटाळ्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक एटीएममधून पूर्वी प्रमाणे दोन हजाराचे चलन निघत नसल्याचे दिसते. काहींनी दोन हजारांचे चलन आपल्याकडे साठवून ठेवल्याने दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा जिल्ह्यात जाणवत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.आॅनलाईन व डिजिटलकडे पाठडिजिटल इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार प्रत्येकाने आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यात सध्यास्थितीत नागरिकांकडून आॅन लाईन पद्धतीने व डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याकडे पाठ दाखविल्या जात आहे. त्यामुळे रोकडच्या मागणीत वाढ होऊन रोकड तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. ही परिस्थिती अशीच आणखी पंधरा दिवस कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.गरज सहा कोटींची; पण प्राप्त होतात केवळ एक कोटीनागरिकांनी डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत आपले आर्थिक व्यवहार केल्यास प्रत्येक दिवशी १ कोटी रोकड असल्यास रोकड तुटवडा जाणवणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी दररोज ६ कोेटी रोकड जिल्ह्याला प्राप्त होत होती. परंतु, आता चौदा दिवसांच्या कालावधी लोटल्यानंतर केवळ १ कोटी इतकीतच रक्कम प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.