शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

लघु सिंचन प्रकल्प वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:18 IST

पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही.

ठळक मुद्देतीन गोदामांवर अतिक्रमण : विटभट्ट्यांमुळे तलावाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही. असाच प्रकार सिंचन विभागातील योजनांबाबत घडत असल्याने लघु प्रकल्पांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या वर्धा शहरालगतच्या तथा आर्वी लघु पाटबंधारे उपविभागांतर्गत येणाºया रोठा तलावाकडे कानाडोळा केला जात असल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, तेथील गोदामांवर अतिक्रमण झाले असून विटभट्ट्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यात १९ लघु प्रकल्प आहेत. सिंचन क्षमता वाढावी, शेतकºयांना पाणी म्ळिावे, भूगर्भातील जलपातळी वाढावी म्हणून या प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली; पण या तलावांकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचेच दिसते. केवळ नोंदी घेण्यापूरतेच हे तलाव राहिले आहेत. पावसाळ्यात तलावाने जलपातळी न गाठल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण कारणांचा शोध घेण्याचे सौजन्य लघु पाटबंधारे विभाग दाखवित नाही. वर्धा लगत रोठा वन आणि रोठा टू हे दोन तलाव आहेत. या तलावांची निर्मिती २५ ते ३० वर्षांपूर्वी करण्यात आली. यातील रोठा वनची माहिती देणारे फलकही त्या भागात अस्तित्वात नाहीत. रोठा टू या तलावासाठी १८९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे फलकावर नमूद आहे. १६२ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करता येईल, एवढी क्षमता या तलावाची असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील खरीप हंगामात ७७ हेक्टर तर रबी हंगामात ८५ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे सिंचन होत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.या तलावाच्या बुडित क्षेत्रातील सर्व अतिक्रमण हटविण्यात आल्याचे लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते; पण प्रत्यक्षात या परिसरात मोठे अतिक्रमण असल्याचे पाहावयास मिळते. रोठा वन व टु च्या जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. या परिसरात सुमारे दोन हजार चौरस फुटामध्ये तीन गोदामांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूर्वी या गोदामांमध्ये सिमेंट ठेवले जात होते. या गोदामावर सध्या परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. गोदामांमध्ये जनावरे बांधली जात असून खत, शेतीपयोगी साहित्य ठेवले जात असल्याचे दिसून आले. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता गोदामांचे दोन हजार रुपये मासिक भाडे दिले जात असल्याचे सांगण्यात आले. भाडे वसुलीकरिता संबंधित विभागाचा एक व्यक्ती येत असल्याचेही परिसरातील नागरिक सांगतात. शिवाय तलाव परिसरातच विटभट्ट्या आहेत. काही भट्टीधारक तलाव परिसरातील माती चोरत असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.घटनांकडे लघु पाटबंधारे तथा पोलिसांचे दुर्लक्षरोठा वन व टू या दोन तलावांच्या परिसरात आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. हत्यांपासून तर आत्महत्यांसारख्या घटना घडत असताना तेथील व्यवस्थेकडे लक्ष दिले जात नाही. प्रेमी युगूल या भागात सर्रास हुंदडताना दिसत असून त्यांना हटकण्याकरिता कुणी राहत नाही. शिवाय ओल्या पार्ट्यांसाठीही या भागाचा गैरवापर केला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे तलावांची तथा पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.