शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

जागा असताना दुकाने रस्त्यावर

By admin | Updated: March 14, 2016 02:11 IST

प्रत्येक शनिवारी येथील आठवडी बाजार भरतो; पण बाजारातील अधिकाधिक दुकाने जागा असताना मुख्य रस्त्यावरच थाटली जातात.

तळेगाव (श्या.पं.) : प्रत्येक शनिवारी येथील आठवडी बाजार भरतो; पण बाजारातील अधिकाधिक दुकाने जागा असताना मुख्य रस्त्यावरच थाटली जातात. परिणामी, बाजारात येणाऱ्या ग्राहकांना मोकाट गुरांचा सामना करावा लागतो. शिवाय रस्त्यावरील दुकाने व ग्राहकांची गर्दी, यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होतो. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बाजारासाठी पूरेपूर जागा उपलब्ध असताना येथील आठवडी बाजारातील दुकाने मुख्य रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली जातात. यामुळे जुन्या वस्तीकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील बाजाराचा तालुक्यात दुसरा क्रमांक लागतो. या आठवडी बाजारात आर्वी, आष्टी, तिवसा, सारवाडी, पार्डी यासह अन्य गावांतील व्यापारी, शेतकरी माल विकण्यासाठी येतात. दुपारनंतर बाजारात गर्दी वाढते. परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहक बाजारहाट करण्याकरिता येथे येतात. सायंकाळी ८.३० ते ९ वाजेपर्यंत बाजारात ग्राहकांची रेलचेल असते. यात मोकाट गुरेही हजेरी लावतात. मोकाट गुरांच्या संचारामुळे ग्राहकांसह व्यापारीही त्रस्त झाले आहेत. गुरांच्या धावपळीत बाजारातील महिला व पुरूषांना जखमी व्हावे लागत असल्याचेही दिसते. दिवसभर हाच प्रकार होत असल्याने व्यापारी व ग्राहकांत असंतोष पसरतो. धावत सुटलेल्या गुरांमुळे कधी कुणाचे नुकसान होईल, हे सांगणेच कठीण झाले आहे. आठवडी बाजार भरत असलेल्या जागेपासून काही अंतरावरच रिकामी जागा आहे; पण त्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जातो. परिणामी, अर्धाधिक बाजार मुख्य रस्त्यावरच भरत असल्याचे दिसते. बाजाराच्या आतमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत ही दुकाने थाटली तर रस्त्याने जाणाऱ्या बैलबंडी, दुचाकी व अन्य वाहनधारकांना सोयीचे होऊ शकेल; पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. ग्रा.पं. प्रशासनाने गावात दवंडी देत शेतकऱ्यांना गुरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश देणे गरजेचे आहे. शिवाय मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांना आतील जागेत बसण्याची नोटीस देणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर) रस्त्यावरील दुकादारांवर दंडात्मक कारवाईची गरजबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना व्यापारी मुख्य रस्त्यावर दुकाने थाटतात. परिणामी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे बाजारात नागरिकांना तसेच रस्त्यावर वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे.