शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

जागा असताना दुकाने रस्त्यावर

By admin | Updated: March 14, 2016 02:11 IST

प्रत्येक शनिवारी येथील आठवडी बाजार भरतो; पण बाजारातील अधिकाधिक दुकाने जागा असताना मुख्य रस्त्यावरच थाटली जातात.

तळेगाव (श्या.पं.) : प्रत्येक शनिवारी येथील आठवडी बाजार भरतो; पण बाजारातील अधिकाधिक दुकाने जागा असताना मुख्य रस्त्यावरच थाटली जातात. परिणामी, बाजारात येणाऱ्या ग्राहकांना मोकाट गुरांचा सामना करावा लागतो. शिवाय रस्त्यावरील दुकाने व ग्राहकांची गर्दी, यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होतो. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बाजारासाठी पूरेपूर जागा उपलब्ध असताना येथील आठवडी बाजारातील दुकाने मुख्य रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली जातात. यामुळे जुन्या वस्तीकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील बाजाराचा तालुक्यात दुसरा क्रमांक लागतो. या आठवडी बाजारात आर्वी, आष्टी, तिवसा, सारवाडी, पार्डी यासह अन्य गावांतील व्यापारी, शेतकरी माल विकण्यासाठी येतात. दुपारनंतर बाजारात गर्दी वाढते. परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहक बाजारहाट करण्याकरिता येथे येतात. सायंकाळी ८.३० ते ९ वाजेपर्यंत बाजारात ग्राहकांची रेलचेल असते. यात मोकाट गुरेही हजेरी लावतात. मोकाट गुरांच्या संचारामुळे ग्राहकांसह व्यापारीही त्रस्त झाले आहेत. गुरांच्या धावपळीत बाजारातील महिला व पुरूषांना जखमी व्हावे लागत असल्याचेही दिसते. दिवसभर हाच प्रकार होत असल्याने व्यापारी व ग्राहकांत असंतोष पसरतो. धावत सुटलेल्या गुरांमुळे कधी कुणाचे नुकसान होईल, हे सांगणेच कठीण झाले आहे. आठवडी बाजार भरत असलेल्या जागेपासून काही अंतरावरच रिकामी जागा आहे; पण त्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जातो. परिणामी, अर्धाधिक बाजार मुख्य रस्त्यावरच भरत असल्याचे दिसते. बाजाराच्या आतमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत ही दुकाने थाटली तर रस्त्याने जाणाऱ्या बैलबंडी, दुचाकी व अन्य वाहनधारकांना सोयीचे होऊ शकेल; पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. ग्रा.पं. प्रशासनाने गावात दवंडी देत शेतकऱ्यांना गुरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश देणे गरजेचे आहे. शिवाय मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांना आतील जागेत बसण्याची नोटीस देणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर) रस्त्यावरील दुकादारांवर दंडात्मक कारवाईची गरजबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना व्यापारी मुख्य रस्त्यावर दुकाने थाटतात. परिणामी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे बाजारात नागरिकांना तसेच रस्त्यावर वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे.