शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
4
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
5
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
6
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
7
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
8
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
9
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
10
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
11
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
12
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
13
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
14
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
15
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
16
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार
17
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
18
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
19
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
20
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार

जागा असताना दुकाने रस्त्यावर

By admin | Updated: March 14, 2016 02:11 IST

प्रत्येक शनिवारी येथील आठवडी बाजार भरतो; पण बाजारातील अधिकाधिक दुकाने जागा असताना मुख्य रस्त्यावरच थाटली जातात.

तळेगाव (श्या.पं.) : प्रत्येक शनिवारी येथील आठवडी बाजार भरतो; पण बाजारातील अधिकाधिक दुकाने जागा असताना मुख्य रस्त्यावरच थाटली जातात. परिणामी, बाजारात येणाऱ्या ग्राहकांना मोकाट गुरांचा सामना करावा लागतो. शिवाय रस्त्यावरील दुकाने व ग्राहकांची गर्दी, यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होतो. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बाजारासाठी पूरेपूर जागा उपलब्ध असताना येथील आठवडी बाजारातील दुकाने मुख्य रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली जातात. यामुळे जुन्या वस्तीकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील बाजाराचा तालुक्यात दुसरा क्रमांक लागतो. या आठवडी बाजारात आर्वी, आष्टी, तिवसा, सारवाडी, पार्डी यासह अन्य गावांतील व्यापारी, शेतकरी माल विकण्यासाठी येतात. दुपारनंतर बाजारात गर्दी वाढते. परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहक बाजारहाट करण्याकरिता येथे येतात. सायंकाळी ८.३० ते ९ वाजेपर्यंत बाजारात ग्राहकांची रेलचेल असते. यात मोकाट गुरेही हजेरी लावतात. मोकाट गुरांच्या संचारामुळे ग्राहकांसह व्यापारीही त्रस्त झाले आहेत. गुरांच्या धावपळीत बाजारातील महिला व पुरूषांना जखमी व्हावे लागत असल्याचेही दिसते. दिवसभर हाच प्रकार होत असल्याने व्यापारी व ग्राहकांत असंतोष पसरतो. धावत सुटलेल्या गुरांमुळे कधी कुणाचे नुकसान होईल, हे सांगणेच कठीण झाले आहे. आठवडी बाजार भरत असलेल्या जागेपासून काही अंतरावरच रिकामी जागा आहे; पण त्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जातो. परिणामी, अर्धाधिक बाजार मुख्य रस्त्यावरच भरत असल्याचे दिसते. बाजाराच्या आतमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत ही दुकाने थाटली तर रस्त्याने जाणाऱ्या बैलबंडी, दुचाकी व अन्य वाहनधारकांना सोयीचे होऊ शकेल; पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. ग्रा.पं. प्रशासनाने गावात दवंडी देत शेतकऱ्यांना गुरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश देणे गरजेचे आहे. शिवाय मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांना आतील जागेत बसण्याची नोटीस देणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर) रस्त्यावरील दुकादारांवर दंडात्मक कारवाईची गरजबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना व्यापारी मुख्य रस्त्यावर दुकाने थाटतात. परिणामी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे बाजारात नागरिकांना तसेच रस्त्यावर वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे.