शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कापूस खाली करण्याची मजुरी खरेदीदारांनी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:20 IST

कापूस विक्रीकरिता आणल्यावर बाजार समितीत वाहनातील कापूस खाली करण्याची मजुरी नियमबाह्यरित्या शेतकºयांकडून वसूल केल्या जाते.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणी : शेतकºयांवर भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कापूस विक्रीकरिता आणल्यावर बाजार समितीत वाहनातील कापूस खाली करण्याची मजुरी नियमबाह्यरित्या शेतकºयांकडून वसूल केल्या जाते. ही मजुरी नियमानुसार व्यापाºयांनी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी स्वीकारले.पणन महामंडळाचे संचालक यांनी ३१ मार्च २०१० ला राज्यातील बाजार समित्यांकरीता आदर्श उपविधी तयार केली. ती सर्व बाजार समित्यांनी स्वीकृत केली. या नवीन आदर्श उपविधी राज्यातील सर्वच बाजार समित्यांनी स्वीकृत केल्या आहे. स्वीकृत केलेल्या नवीन आदर्श उपविधीत १ ते ६० मधील अनुक्रमांक २८(अ) मध्ये शेतमाल वजनावर लावण्यापासूनचे दर हे खरेदीदाराने द्यावयाचे आहेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. परंतु संपूर्ण राज्यात कापूस या शेतमालाचे परिमान हे वजनावर असून वजनासाठी लावल्यावर वाहनातील कापूस खाली करण्याची मजूरी ही शेतकºयांकडून वसूल केल्या जात आहे. हिंगणघाट बाजार समितीने शेतकरी हिताचा विचार करून कापूस गाडी खाली करण्याचा नियमबाह्य खचार्तून शेतकºयांची त्वरित मुक्तता करावी. उपविधीतील २८(अ) च्या तरतूदीनुसार वजनावर लावल्यानंतर कापूस गाडी खाली करण्याची मजुरी ही खरेदीदारांनी द्यावी असे निर्देशित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. राज्यात हिंगणघाट बाजार समितीत शेतकरी हिताच्या योजना राबविण्यात येतात असा लौकिक आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रा.मधुकर झोटींग, मधुसूदन हरणे, बाबा दिवानजी, दिलीप लाखेकर, मनोज पुसदेकर, सुधाकर अगडे, अजाब राऊत, वाघमारे आदींनी केली.मजुरीदाखल साडेतीन कोटींची लूटहिंगणघाट बाजार समिती आवारात कापसाची आवक मागील दोन हंगामात ३५ लक्ष क्विंटल आहे. यानुसार कापूस खाली करण्याचा मजूरी दर १० रुपये क्विंटल याप्रमाणे ३ कोटी ५० लक्ष रुपये शेतकºयांकडून नियमबाह्यरित्या वसूल करण्यात आले, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. शेतकºयांची नियमबाह्य खचार्तून मुक्तता करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.