शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दुकानदारांनी स्वत:च काढले अतिक्रमण

By admin | Updated: January 13, 2017 01:19 IST

शहरातून जाणाऱ्या अमरावती हिंगणघाट आर्वी-शिरपूर या राज्य मार्गासह हैदराबाद-भोपाळ व नागपूर-मुंबई या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे.

महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी राबविण्यात आली मोहीमपुलगाव : शहरातून जाणाऱ्या अमरावती हिंगणघाट आर्वी-शिरपूर या राज्य मार्गासह हैदराबाद-भोपाळ व नागपूर-मुंबई या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या मार्गाच्या विस्तारीकरण करण्यात येत आहे. या कामाला प्रारंभ होणार असून या महामार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ झाला आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांना अतिक्रमण हटविण्याकरिता तीन दिवसांपूर्वीच प्रशासनाद्वारे सूचना देण्यात आली होती. आदेशाप्रमाणे १२ जानेवारीपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जेसीबी गजराज ट्रॅक्स, पोलीस व कर्मचारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परंतु प्रशासनाच्या कार्यवाहीपूर्वी पुलगाव, देवळी व पुलगाव, नाचणगाव मार्गावरील लहान दुकानदारांनी आपले पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या हटविल्या तर काही दुकानदारांनी दुकानासमोर लावलेले टिनाचे शेडही काढले. प्रशासनाद्वारे कुठेही बळजबरीने अतिक्रमण हटविल्याचे वृत्त नाही. अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन गेलेपुलगाव : शहरातील एकमात्र मोठा उद्योग पुलगाव कॉटन मील बंद झाल्याने बेरोजगार झालेल्या अनेकांनी मिळालेल्या पैशात रस्त्याच्या बाजूला लहान मोठी दुकाने थाटून उदरनिर्वाहाचा मार्ग निवडला होता. परंतु गत दहा वर्षांत दोनदा अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र या मार्गाचे विस्तारीकरण झाले नाही. मिळालेला पैसा अशा रोजगारात लावला आता अतिक्रमण हटविल्यामुळे रोजगार बंद होऊन अनेक कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे.(तालुका प्रतिनिधी)