शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

धक्कादायक! वर्धा जिल्ह्यात आठ महिन्यात ९३ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 07:00 IST

Wardha News जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत वर्धा जिल्ह्यात तब्बल ९३ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर१० प्रकरणात मिळाली शासकीय मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : सततची नापिकी... शेतमालाला हमीभाव नाही...नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही...कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा... खासगी सावकारांसह बँकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा...त्यातच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे झालेली कोंडी... या प्रमुख कारणांमुळे जानेवारी ते ऑगस्ट महिन्यापर्यंत वर्धा जिल्ह्यात तब्बल ९३ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (93 farmers complete life journey in Wardha district in eight months!)

आतापर्यंत केवळ १० प्रकरणात शासकीय मदत मिळाली आहे हे शोकांतिकाच म्हणावी लागेल. शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला, यावर वाद-विवाद सुरूच आहे. असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे ग्रहण काही संपलेले दिसत नाही. कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा दुहेरी संकटात शेतकरी कायमचाच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच जास्त भरडला गेला. कोरोना काळात शेतकऱी आत्महत्या वाढल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते.

कोरोनामुळे शेतकरी आला अडचणीत

रब्बी हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने विकण्याची तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली होती. त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला होता. देश लॉकडाऊन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा, या मानसिकतेत होते. यामुळेच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

३३ शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच सरकारने जे निकष दिले आहेत त्यानुसार तब्बल ३३ शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल ९३ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. मात्र, या प्रकरणांपैकी ३३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून या शेतकरी कुटुंबीयांना सरकारकडून कोणतीही मदत मिळणार नाही हे विशेष.

५० प्रकरणांची चौकशी

वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ५० शेतकरी आत्महत्या या शासनाच्या मदतीस पात्र किंवा अपात्र याविषयी चौकशीतच आहेत. मे मध्ये १२ तर जून महिन्यात झालेल्या १५ सर्वाधिक आत्महत्या जिल्ह्यात झाल्या असून त्याची चौकशी सुरू आहे.