शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

‘जवाद’चा झटका; उभ्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

जवाद चक्रीवादळामुळे उसंत घेत पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण याच पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झाडाला लागून असलेला कापूस भिजल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर सध्या काही शेतकरी मिळेल तेथून शेतमजूर आणून सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बंगालची खाडी तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. शिवाय ‘जवाद’ चक्रीवादळ आध्र प्रदेशातील किनारपट्टीवर धडकल्याने विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकूणच जवाद चक्रीवादळामुळे उसंत घेत पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण याच पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झाडाला लागून असलेला कापूस भिजल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर सध्या काही शेतकरी मिळेल तेथून शेतमजूर आणून सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. परंतु, थोड्या अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे कापणी पश्चात ढीग करून ठेवलेले सोयाबीन भिजल्याने सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

कुटारही भिजले- जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाची जोड दिली आहे. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मालकीचे सोयाबीनचे कुटार पावसामुळे भिजल्याने त्यांना सध्या जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर केला जात असल्याने जनावरांसाठी हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले असल्याचे वृद्ध शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

आपण यंदा १५ एकर शेतजमिनीत सोयाबीनची लागवड केली. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे कापणीपश्चात ढीग करून ठेवलेले सोयाबीन पूर्णपणे भिजले आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे.- सुभाष घायवट, सोयाबीन उत्पादक, पढेगाव.

पूर्वीच कापूस वेचणीसाठी मजूर सहज मिळत नाही. गावाबाहेरून मजूर आणून शेतीची कामे करावी लागत आहेत. अशातच शनिवारी परिसरात झालेल्या पावसामुळे झाडाला लागलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळून दिली पाहिजे.- नरेश झोड, कापूस उत्पादक, चिकणी.

उन्हाळ्यात जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निकाली निघावा म्हणून आपण सोयाबीनच्या मळणीनंतर शेतात सोयाबीनचे कुटार ढीग करून ठेवले होते. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण कुटार भिजले. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. शिवाय उन्हाळ्यात जनावरांसाठीचे वैरण बाजारातूनच खरेदी करावे लागणार आहे. हिरवा चाराही सध्या सहज मिळत नाहीच.- किशोर लुंगे, सोयाबीन उत्पादक, जामणी.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती