शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

पावसाळ्यातही अतिरिक्त देयकाचा ‘शॉक’

By admin | Updated: August 15, 2016 00:58 IST

परिसरातील गावांमध्ये वीज ग्राहकांना उन्हाळ्यात मोठ्या रक्कमेची देयके मिळत होती.

वीज पुरवठाही वारंवार खंडित : वापर नसतानाही वाढीव देयके वायगाव (नि.) : परिसरातील गावांमध्ये वीज ग्राहकांना उन्हाळ्यात मोठ्या रक्कमेची देयके मिळत होती. पावसाळ्यात विजेचा वापर कमी असल्याने वीजबिलात कपात होईल अशी आशा होती. मात्र जून व जुलै महिन्यातही ग्राहकांच्या हाती भरमसाठ वीजदेयके पडली आहेत. अधिक वापर नसतानाही वाढीव बिलांचा शॉक नागरिकांना बसला आहे. उन्हाळ्यात विजेचा वापर अधिक असल्याने ग्राहकांनी बिलाकडे दुर्लक्ष करून वेळेत वीजदेयकाचा भरणा केला. वर्धा तालुक्यात १२ जून पासून पाऊस सुरू झाला. पावसामुळे विजेची मागणी आपोआपच कमी झाली. वातावरण थंड झाल्याने घरातील कुलर, पंखे आदीचा वापरही कमी झाला. यामुळे विजेचे दरमहा मिळणारे देयक कमी होईल अशी आशा ग्राहकांची होती. मात्र महावितरण कडून जून आणि जुलै महिन्याची बिले अतिरिक्त प्रमाणात देण्यात आल्याची ओरड होत आहे. जूलै महिन्यात तर संततधार पाऊस सुरू असल्याने विजेचा वापर बराच कमी झाली. असे असताना ग्राहकांना उन्हाळ्याच्या तुलनेत फक्त १५ ते २० टक्क्याने कपात होऊन वीजदेयके मिळाल्याची ओरड होत आहे.(वार्ताहर) महावितरणचा भोंगळ कारभार सुरूच वर्धा - तुळजापूर(बघाळा)येथील विद्युत प्रवाह ऐन रात्रीच्या वेळेस वारंवार खंडित होतो. परिणामी ग्रामस्थांना अंधाराचा सामना करीत रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे सेवाग्राम आणि मदनी विद्युत वाहिनी कुचकामी ठरत असल्याची ओरड होत आहे. येथील थ्री फेज ट्रान्सफार्मर कांबळे यांच्या शेतात आहे. वादळाच्या तडाक्यात हमखास विद्युत प्रवाह खंडित होतो. याच वाहिनीवर वघाळा-तुळजापूर ची नळयोजना आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. भर पावसाळ्यात यामुळे पाणीटंचाईचा सामनाही नागरिकांना करावा लागत असल्याने ते संताप व्यक्त करीत आहेत. विद्युत देयक ही देखील कधीच वेळेच्या आत येत नाही. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त भार सोसावा लागतो. कालबाह्य झालेले ट्रान्सफार्मर तातडीने बदलावे अशी मागणी महावितरणच्या खरांगणा(गोडे) येथील उपविभागीय कार्यालयाला नागरिकांद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)