शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

‘शिवशाही’ अप्रशिक्षित चालकांच्या हाती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

बहुतांशवेळी या गाड्यांवर अप्रशिक्षित चालक दिले जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. किरकोळ अपघातांमुळे चारपैकी तीन शिवशाही गाड्यांचे सुट्या भागांच्या रूपाने लाखोंचे नुकसान होत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गाड्यांवर होणाºया दुरुस्तीच्या खर्चामुळे शासनालाच आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. मात्र, याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या जीविताशी खेळ : गाड्यांचे लाखोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लांब पल्ल्यावरील फेरीकरिता वातानुकूलित शिवशाहीवर चक्क अप्रशिक्षित चालकांना पाठविले जात असल्याने एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा आगाराने प्रवाशांच्या जीविताशी खेळ चालविल्याचा प्रकार उजेडात आला आहे.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत), पुलगाव हे आगार आहेत. संपूर्ण विभागात २६६ बसगाड्या आहेत. या गाड्यांत नोव्हेंबर महिन्यात चार वातानुकूलित, अत्याधुनिक शिवशाही बसगाड्यांची भर पडली. महिनाभरापूर्वी आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅगरची सुविधा, ड्रायव्हर अ‍ॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन या सोबतच दिल्लीत घडलेल्या निर्भया घटनेपासून पॅनिक बटणचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात विभागातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम (व्हीटीएस) ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या आणि कुठेही प्रत्येक बसगाडीचे ठिकाण कळणार आहे.प्रवाशांच्या सेवेत नव्याने आलेल्या शिवशाही बसेस रुजू करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत वर्धा-शिर्डी आणि वर्धा-शेगाव अशा या गाड्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवाशांचीही या गाड्यांना पसंती आहे. सोई-सुविधांमुळे महामंडळ हायटेक होत असले तरी चालकांना चांगले प्रशिक्षण देण्यात महामंडळ उदासीन दिसत आहे.बहुतांशवेळी या गाड्यांवर अप्रशिक्षित चालक दिले जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. किरकोळ अपघातांमुळे चारपैकी तीन शिवशाही गाड्यांचे सुट्या भागांच्या रूपाने लाखोंचे नुकसान होत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गाड्यांवर होणाºया दुरुस्तीच्या खर्चामुळे शासनालाच आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. मात्र, याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात मोठी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवशाही गाड्यांवर अप्रशिक्षित चालक देऊ नये, अशी मागणी होत आहे.प्रवाशांत भीतीचे वातावरणशिवशाही ही बसगाडी अत्याधुनिक आणि पूर्णत: इलेक्ट्रॉनिक आहे. या गाडीवर पाठविण्यापूर्वी चालकाला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मात्र, महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहेत.साध्या बसगाड्यांवरील चालकांना शिवशाहीवर पाठविले जात असल्याने प्रवाशांतही चिंता व्यक्त होत आहे. विभाग नियंत्रकांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Shivshahiशिवशाही