शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शिवसेनेने ताणली ‘प्रत्यंचा’

By admin | Updated: January 22, 2017 00:26 IST

शिवसेना-भाजप युतीचा चेंडू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे.

दीपक सावंत : सर्व ५२ जागांसाठी ९७ इच्छुकांच्या मुलाखती वर्धा : शिवसेना-भाजप युतीचा चेंडू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे. युती होईल तेव्हा होईल; पण वर्धा जिल्ह्यात शिवसेनेने सर्व ५२ जागाही लढण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग देत धनुष्याची प्रत्यंचा ताणली आहे. शिवसेनेचे नेते आरोग्य राज्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी वर्धेत जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ आणि पंचायत समितीच्या सर्व १०४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जिल्हा परिषदेसाठी ९७ जण या मुलाखतींना सामोरे गेले तर पंचायत समितीसाठी तब्बल ३०० जणांनी मुलाखती दिल्याची माहिती ना. सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. इच्छुकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा चांगला असल्यामुळे पक्षाला जिल्ह्यात चांगलेच यश येईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेना उमेदवारांची घोषणा २५ जानेवारीला करण्यात येणार असल्याची माहितीही ना. सावंत यांनी याप्रसंगी दिली. शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना ना. सावंत म्हणाले, युती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युती झाल्यास पक्षादेश पाळला जाईल. शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. वर्धा जिल्ह्यात ९० टक्केपेक्षा अधिक जागा शिवसेना लढणार, हे आधीच ठरले होते. पूर्ण जागा लढण्याच्या दिशेनेही तयारी सुरू आहे; पण ९० टक्केपेक्षा अधिक जागा हमखास लढणार असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे वर्धा जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख निलेश देशमुख व वर्धा तालुकाप्रमुख राजेश सराफ उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी) निवडणूक हे राजकीय युद्ध शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी सरकारमध्ये झालेल्या चांगल्या निर्णयाबाबत शिवसेना सोबत राहिली आहे; पण जे निर्णय जनतेच्या दृष्टीने बरोबर नाहीत, अशा मुद्यांवर शिवसेना विरोधाची भूमिका घेत आली आहे. निवडणुकीत युती न झाल्यास निवडणूक राजकीय युद्धाप्रमाणे लढली जाईल, असेही ना. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले. २५ जानेवारीला होणार उमेदवारांची घोषणा शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा येत्या २५ जानेवारीला करणार आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच जागांवर सेना आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. ९० टक्केपेक्षा अधिक जागा लढण्याची तयारी पूर्णत्वास गेल्याचे यावेळी सांगण्यात आले.