शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी शिवसेना दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:56 IST

शिवसेनेने सरकारच्या विरोधातील धार तीव्र करताना तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध केंद्रांवर शिवसेनेचे पदाधिकारी नेमले आहेत.

ठळक मुद्दे सरकारला शह देण्यासाठी शेतकऱ्यांना हात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात मागील वर्षी तूर विक्री करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. यावर्षीही शासनाने अनेक जाचक अटी तूर खरेदीच्याबाबत लादलेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने सरकारच्या विरोधातील धार तीव्र करताना तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध केंद्रांवर शिवसेनेचे पदाधिकारी नेमले आहेत. ते शेतकऱ्यांना यासाठी मदत करणार आहे.विदर्भात अनेक जिल्ह्यात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापसाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाले. व कापूस वेचाईचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. याचा थेट परिणाम तूरीच्या उत्पादनावर ही झाला आहे. तूर उत्पादन समाधानकारक झाले नाही. शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीचे केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आॅनलाईन नोंदणी करीत नसल्याने केंद्रावर आल्यावर त्याच्या अडचणी वाढतात. अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्यात शिवसेनेने आर्वी भागात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांची नियुक्ती केली आहे. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरू करण्यात आली आहे. येथे गेल्यावर्षी ६० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली यावेळीही शेतकऱ्यांची संपूर्ण तूर वेळेतच खरेदी केली गेली पाहिजे यासाठी शिवसेनेने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. कारंजा, आष्टी, आर्वी बाजार समितीत मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. व शेतकऱ्यांच्या अडचणी तेथे सोडविण्यात येत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाला शह देण्यासोबतच शिवसेना शेतकऱ्यांसोबत कायम स्वरूपी उभी हे दाखविण्यात शिवसेनेचा प्रयत्न आहे. ८० टक्के समाजकारण या धोरणानुसार सदर कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही हिंगणघाट तालुक्यात कर्जमाफीच्या संदर्भात मदत केंद्र सुरू करण्यात आले होते.आर्वी विधानसभा मतदार संघात आष्टी, कारंजा, आर्वी बाजार समितीअंतर्गत आर्वी आणि कारंजा येथे शिवसेनेने मदत केंद्र सुरू केले आहे. आपण स्वत: व शिवसेनेचे तालुका संघटक, उप तालुका संघटक व तालुका प्रमुख शेतकऱ्यांना या कामासाठी मदत करीत आहो.निलेश देशमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती