शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

स्मारकांसाठी शिंदोलीच्या झांज्या सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

आश्रमातील स्मारके ग्रामीण पद्धतीने बणविल्या गेली आहेत. स्थानिक साधन साहित्य आणि कारागीर यांच्या श्रमातून; मात्र शंभर रुपयांवर खर्च नको, असे गांधीजींनी आदी निवास या प्रथम कुटी निर्माणावेळी सूचना केल्या होत्या. पण, त्याचा खर्च पाचशे रुपयांपर्यंत झालेला होता. आश्रमातील कुटी गरजेनुसार तयार करण्यात आल्या आहेत. आदी निवास, बा व बापू कुटी आणि बापू दप्तर हे सर्व मात्र माती, कुडापासून तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्मारका़प्रमाणे झाडांचे महत्त्वही कायम : पावसाळ्यात भिंतींचे करतात संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : नैसर्गिक वातावरण, स्थानिक साधन साहित्य आणि कारागिरांच्या माध्यमातून आश्रमातील कुटी तयार व्हाव्यात यासाठी गांधींचा विशेष आग्रह राहिला. पावसाळ्यात मातीच्या भिंतीचे संरक्षण करण्यासाठी शिंदोल्यांच्या पान्होळ्यांपासून बनविलेल्या झांज्याचा उपयोग केला जात होता. ८४ वर्षे झाली, आजही आश्रमातील स्मारकांचे पावसाळ्यात संरक्षण करण्याचे काम झांज्याच करीत असल्याने या झाडांचे महत्त्व स्मारकांप्रमाणे सदैव कायम असल्याचे चित्र आहे.आश्रमातील स्मारके ग्रामीण पद्धतीने बणविल्या गेली आहेत. स्थानिक साधन साहित्य आणि कारागीर यांच्या श्रमातून; मात्र शंभर रुपयांवर खर्च नको, असे गांधीजींनी आदी निवास या प्रथम कुटी निर्माणावेळी सूचना केल्या होत्या. पण, त्याचा खर्च पाचशे रुपयांपर्यंत झालेला होता. आश्रमातील कुटी गरजेनुसार तयार करण्यात आल्या आहेत. आदी निवास, बा व बापू कुटी आणि बापू दप्तर हे सर्व मात्र माती, कुडापासून तयार करण्यात आले आहे. यात बा-बापू यासह अनेक कार्यकर्ते आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा प्रत्यक्ष संबंध राहिला आहे.मातीच्या भिंतींना पावसापासून धोका असल्याने त्यांच्या रक्षणासाठी उपलब्ध शिंदोल्यांच्या पान्होळ्यांपासून झांज्या तयार करून लावल्या जात असे. त्याकाळी मोठ्या प्रमाणावर या झाडांचे बन होते. त्यामुळे कधीच तुटवडा जाणवायचा नाही. पावसाळा संपला की त्या व्यवस्थित सुरक्षित ठेवल्या जात असे. तो बापूंचा नियम होता.चिऱ्यांपासून चटया, आसन, फडे आदी तयार केले जात जात असे. याचा उपयोग आश्रमात तसेच गावातील लोक नित्य करीत होते. बाहेरून आलेल्या व्यक्तींना याच चटयांवर बसावे लागत असे. झोपण्यासाठीसुद्धा याचा उपयोग केला जात होता. आजही आदी निवास, बा व बापू कुटीत चटया दिसून येतात. सर्वत्र याचा उपयोग होत असल्याने स्थानिक कारागिरांना रोजगार यातून मिळाला होता. दोघांच्याही गरजा एकमेकांच्या सहयोगाने पूर्ण होत होत्या. काळ बदलला, झाडे दिसेनाशी झाली. कारागीरही नाहीत. त्यामुळे चिरे करंजी, पवनी, हमदापूर, जुनोना या गावातील शिवारातून खरेदी करावी लागतात. चटयांसाठी रामटेक येथील मधील कारागिरांचा शोध घ्यावा लागतो. यावर्षी जुनोना येथील कामगारांना सांगण्यात आले, मात्र पान्होळ्या मिळाल्या नाही. झाडांची दुर्मिळता यामुळे झांज्या सांभाळून ठेवाव्या लागतात. त्याची जपणूक करावी लागते. आता बांबूच्या बोºयाच्या झापड्याही लावल्या जातात. जगासमोर आश्रम प्रेरणास्थान असून जागतिक संकटकाळ, आधुनिकतेकडे वाटचाल आणि महामारीत बापूंच्या आश्रमातील जीवन पद्धतीचे स्मरण होते, परंपरा आठवायला लागतात. आश्रम राष्ट्रीय धरोवर असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी शिंदोल्यांची झाडे सदैव उपयोगी ठरत आहेत.स्मारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने झांज्या व झापड्या आवश्यक आहेत. पावसापूर्वी लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्मारकांच्या जपवणुकीला सदैव प्राधान्य दिले जाते.मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान. 

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम