शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

अमाप लोकसंपदेचा समाजमन सुन्न करणारा कवी ‘शंकर बढे’

By admin | Updated: September 14, 2016 00:51 IST

अमाप लोकसंपदा मिळवत या महाराष्ट्राला वऱ्हाडी भाषेची गोडी लावून निखळ विनोदाने ज्यांनी खळखळून हसविले आणि त्याचवेळी संवेदनशील कवितांनी समाज मन सुन्न केले.

ज्ञानेश्वर वाकुडकर : विदर्भ लोकरत्न सन्मान जाहीरहिंगणघाट : अमाप लोकसंपदा मिळवत या महाराष्ट्राला वऱ्हाडी भाषेची गोडी लावून निखळ विनोदाने ज्यांनी खळखळून हसविले आणि त्याचवेळी संवेदनशील कवितांनी समाज मन सुन्न केले. पायावर मस्तक ठेवावे असा जर कोणता कवी असेल ते म्हणजे शंकर बढे होय, अशा भावना प्रसिद्ध कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केल्या. लोकसाहित्य परिषद व वंजारी समाज परिषदेद्वारे कविवर्य स्व. शंकर बढे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर लोकसाहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र चाफले, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, प्रा. शेषकुमार येरलेकर, वसंत हमंड, ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पखाले, कवी जयंत चावरे, सुधाकर हेमके, अभिजीत डाखोरे, जितेंद्र केदार उपस्थित होते. प्रारंभी कवी सुधाकर हेमके, केशव नाक्षिणे, मुरली लाहोटी, अश्विनी नरड, लीना शेंडे, मनीषा रिठे, नीलिमा घिनमिने, कवी मुगल बेग यांनी रचना सादर करून श्रद्धांजली अर्पण केली. यवतमाळचे साहित्यिक नितीन पखाले यांनी शंकर बढे यांचा जीवन प्रवास उलघडून दाखविला. साहित्य संपदेपेक्षा लोकसंपदेवर विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळविणारे शंकर बढे हे पहिले साहित्यिक आहे. वऱ्हाडी भाषेला खऱ्या अर्थाने न्याय देत ग्रामीण व्यक्तिचित्रण हुबेहूब सादर करणारे शंकर बढे वऱ्हाडी रत्न आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कवी जयंत चावरे यवतमाळ यांनी कवितेने श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कवितांनी सभागृहाला रडायला भाग पाडले. शंकर बढे यांच्यापासून प्रेरणा, प्रोत्साहन मिळाली व आज जे काही मी लिहितो, ते सगळं बढे काकांची देण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वऱ्हाडी बोलीला अवीट गोडी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला या अवीट गोडीची चव चाखायची संधी बढे यांच्या साहित्याने दिली. कमी शब्दात भावना व्यक्त करण्याचे कसब बढे यांच्याजवळ होते, असे वाकुडकर म्हणाले. यावेळी त्यांनी कविता सादर करून श्रद्धांजली वाहिली. ज्ञानेश्वर चौधरी यांनी लोकसाहित्य परिषदेद्वारे यावर्षीपासून देण्यात येणारा ‘विदर्भ लोकरत्न’ हा सन्मान स्व. शंकर बढे यांना मरणोत्तर जाहीर केला. जानेवारीत तो प्रदान करण्यात येईल. एक गौरव ग्रंथ काढण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. संचालन प्रा. डाखोरे यांनी केले. कार्यक्रमाला मनोहर ढगे, गिरीधर कचोळे, प्रकाश कहूरके, आशिष भोयर, छत्रपती भोयर, राजू कोंडावार, नितीन शिंगरू, उमेश मानकर, विजय धात्रक, सतीश चौधरी, ज्ञानेश्वर वाघमारे आदींनी सहकार्य केले. सांगता संगीत विशारद विजय गावंडे यांच्या पसायदानाने झाली.(तालुका प्रतिनिधी)