शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:02 IST

स्वातंत्र्य चळवळीची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेवाग्राम गावातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यात आश्रम, वर्धा व पवनारचा विकास होत असला तरी गावाकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही.

ठळक मुद्देखापेकर ले-आऊटमध्ये समस्या : नागरिकांचे प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य चळवळीची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेवाग्राम गावातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यात आश्रम, वर्धा व पवनारचा विकास होत असला तरी गावाकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. यामुळे नागरिक संतप्त असून गावाचा विकास करून मुलभूत सुविधा पुरवाव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनही देण्यात आले आहे.वॉर्ड क्र. ४ खापेकर ले-आऊट सेवाग्राम येथे पाणी सुविधा, रस्ते बांधकाम, नाल्यांची सुविधा नाही. कचऱ्याकरिता घंटागाडी देण्यात आली नाही. ओपन स्पेसचा विकास करण्यात आला नाही. या वॉर्डात पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रस्ते तथा नाल्यांचे बांधकाम करण्यात आलेले नाही. केंद्र व राज्य शासनाने २६६ कोटी रुपये सेवाग्राम आराखड्याकरिता मंजूर केले; पण एकही रुपयांचा निधी लोकवस्तीकरिता देण्यात आलेला नाही. देशातच नव्हे तर जगात हे स्थळ प्रसिद्ध आहे; पण राजकीय तथा व जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सेवाग्राम येथील नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी अशोक देशमुख, बाबा धाबर्डे, पूजा देशमुख, देवढे, मोहन वाघमारे, सविता ढोणे, वैशाली देशमुख, स्वाती माळोदे, आकाश वाघाडे, नागेश्वर तिवारी, पुरूषोत्तम भोयर, राजेंद्र भोयर, वंदना राऊत, जोशी आदींनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम