शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लिलावास अपात्र घाटातूनही रेतीचा उपसा

By admin | Updated: January 14, 2015 23:13 IST

नैसर्गिक संसाधनांची लूट होऊ नये व महसूल प्राप्त व्हावा म्हणून रेतीघाटांचे लिलाव केले जातात; पण वर्धा जिल्ह्यात पर्यावरण व भूजल पातळी ही कारणे पूढे करून चोरट्यांच्या हातात कोलित दिले जात आहे़

प्रशांत हेलोंडे - वर्धानैसर्गिक संसाधनांची लूट होऊ नये व महसूल प्राप्त व्हावा म्हणून रेतीघाटांचे लिलाव केले जातात; पण वर्धा जिल्ह्यात पर्यावरण व भूजल पातळी ही कारणे पूढे करून चोरट्यांच्या हातात कोलित दिले जात आहे़ यामुळेच रेतीघाटांतून चोरीचे प्रमाण वाढले आहे. सध्या घाटांचे लिलाव व्हायचे असताना वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर, तांबा, कांदेगाव येथील रेतीघाटांतून अहोरात्र रेतीचा उपसा सुरू आहे.देवळी तालुक्यातील वर्धा नदीवर असलेल्या ३७ घाटांपैकी केवळ तीनच घाट लिलावास पात्र ठरविले होते. यातही दोन ग्रामपंचायतींनी ना-हरकत प्रमाणपत्र न दिल्याने आपटी या एकाच घाटाचा लिलाव होत आहे. हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याने उर्वरित घाट चोरट्यांसाठी मोकळे राहत आहेत. वर्धा नदीवरील कांदेगाव, तांबा व कोटेश्वर तसेच सावंगी (येंडे) या घाटांवर यवतमाळ, अमरावतीसह वर्धा जिल्ह्यातील रेतीचोर अत्यंत सक्रीय झाले आहेत. या सर्व घाटांतून रात्रंदिवस रेतीचा उपसा केला जात आहे. केवळ मजुरांकरवीच नव्हे तर जेसीबी, पोकलँड लावून रेतीचा अतिरेकी उपसा केला जात आहे. यात रेती माफीयांशी महसूल प्रशासन व पोलिसांचे साटेलोटे असल्याचे बोलले जाते. यामुळेच मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा व चोरटी वाहतूक केली जात असताना कारवाई होत नाही. यात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल मात्र बुडत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील महसूल व रॉयल्टी यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याला प्राप्त होत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे रेतीच्या चोरीची संधी देणे टाळून प्रशासनाने रेतीमाफीयावर अंकूश मिळविणे गरजेचे झाले आहे.