शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

लिलावास अपात्र घाटातूनही रेतीचा उपसा

By admin | Updated: January 14, 2015 23:13 IST

नैसर्गिक संसाधनांची लूट होऊ नये व महसूल प्राप्त व्हावा म्हणून रेतीघाटांचे लिलाव केले जातात; पण वर्धा जिल्ह्यात पर्यावरण व भूजल पातळी ही कारणे पूढे करून चोरट्यांच्या हातात कोलित दिले जात आहे़

प्रशांत हेलोंडे - वर्धानैसर्गिक संसाधनांची लूट होऊ नये व महसूल प्राप्त व्हावा म्हणून रेतीघाटांचे लिलाव केले जातात; पण वर्धा जिल्ह्यात पर्यावरण व भूजल पातळी ही कारणे पूढे करून चोरट्यांच्या हातात कोलित दिले जात आहे़ यामुळेच रेतीघाटांतून चोरीचे प्रमाण वाढले आहे. सध्या घाटांचे लिलाव व्हायचे असताना वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर, तांबा, कांदेगाव येथील रेतीघाटांतून अहोरात्र रेतीचा उपसा सुरू आहे.देवळी तालुक्यातील वर्धा नदीवर असलेल्या ३७ घाटांपैकी केवळ तीनच घाट लिलावास पात्र ठरविले होते. यातही दोन ग्रामपंचायतींनी ना-हरकत प्रमाणपत्र न दिल्याने आपटी या एकाच घाटाचा लिलाव होत आहे. हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याने उर्वरित घाट चोरट्यांसाठी मोकळे राहत आहेत. वर्धा नदीवरील कांदेगाव, तांबा व कोटेश्वर तसेच सावंगी (येंडे) या घाटांवर यवतमाळ, अमरावतीसह वर्धा जिल्ह्यातील रेतीचोर अत्यंत सक्रीय झाले आहेत. या सर्व घाटांतून रात्रंदिवस रेतीचा उपसा केला जात आहे. केवळ मजुरांकरवीच नव्हे तर जेसीबी, पोकलँड लावून रेतीचा अतिरेकी उपसा केला जात आहे. यात रेती माफीयांशी महसूल प्रशासन व पोलिसांचे साटेलोटे असल्याचे बोलले जाते. यामुळेच मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा व चोरटी वाहतूक केली जात असताना कारवाई होत नाही. यात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल मात्र बुडत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यातील महसूल व रॉयल्टी यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याला प्राप्त होत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे रेतीच्या चोरीची संधी देणे टाळून प्रशासनाने रेतीमाफीयावर अंकूश मिळविणे गरजेचे झाले आहे.