शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सात-बारासाठी वसुली मोहीम; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: July 1, 2014 01:39 IST

आधीच आर्थिकदृष्टया कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी संगणकावरील उतारा काढण्यासाठी ३० रुपयांची आगाऊ वसुली केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वर्धा : आधीच आर्थिकदृष्टया कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी संगणकावरील उतारा काढण्यासाठी ३० रुपयांची आगाऊ वसुली केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या संदर्भात अधिक माहिती घेतली असता शासनाच्या आदेशानुसार आम्ही संगणकाची खरेदी केली आहे. आकारलेल्या पंधरा रुपयांतील पाच रुपये शासनाकडे भरावयाचे असून दहा रुपये संगणक खरेदीच्या रकमेच्या वसुलीसाठी ठेवायचे असल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या महसूल विभागात सध्या ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सात-बारा, उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.संगणकावरील छपाईचे सात-बारा उतारे देण्याचे आदेश तहसीलदारांनी एक वर्षापूर्वीच सर्व तलाठ्यांना दिले आहे. मात्र अनेक तालुक्यात विविध भागात आजही हस्तलिखितातील सातबारे दिले जातात. कामात गतिमानता नसल्याने शेतकऱ्यांना तासनतास तलाठी कार्यालयात ताटकळत बसावे लागते. एका तलाठ्याकडे अनेक गावांचा कार्यभार असल्याने उतारे मिळविण्यासाठी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. शासन आपल्या दारी असा नारा प्रशासन देत असला तरी शेतकऱ्यांची गैरसोय कमी होताना दिसत नाही. सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत. बँकांमध्ये कर्ज प्रकरणे करण्यासाठी शेतकऱ्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या दारी हेलपाटे मारावे लागतात.अनेकदा तलाठी मुख्यालयी रहात नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेचा खोळंबा होत आहे. ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक गोची सुरू असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)