शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

दोन दुर्घटनांत सात जणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: July 2, 2017 04:00 IST

राज्यात शनिवारी दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये सात जणांना बुडून मृत्यू झाला. वर्ध्यातील महाकाळी धरणात चौघांना जलसमाधी मिळाली. तर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/ सोलापूर : राज्यात शनिवारी दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये सात जणांना बुडून मृत्यू झाला. वर्ध्यातील महाकाळी धरणात चौघांना जलसमाधी मिळाली. तर, सोलापुरच्या सांगोला तालुक्यात बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला.वर्ध्याच्या आकोली येथील महाकाळी धरणावर शनिवारी दुपारी मित्रांसह फिरायला गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. सुदैवाने त्यांच्याबरोबर असलेले अन्य चौघे थोडक्यात बचावले. यातील एका मुलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. गौरव गुल्हाणे, श्वेता नेहारे, सोनल नाईक, शीतल प्रधान, स्नेहा पुनसे, आशिष वाघाडे, वैभव सलामे आणि कुणाल फुलकर हे महाकाळी धरणावर फिरण्याकरिता गेले होते. पाण्याचा अंदाज न घेताच धरणात उतरले. दगडावरील शेवाळावरून श्वेताचा पाय घसरल्याने दुसऱ्या मुलींनी तिचा हात पकडला. यात सोनल आणि शीतल या दोघीही पाण्याकडे ओढल्या गेल्या. त्यांना वाचविण्याकरिता गौरव गेला असता तोही पाण्यात बुडाला. तो गटांगळ्या खात असताना आशिष वाघाडे व वैभव सलामे हे दोघे त्याला वाचविण्याकरिता धावले, पण पोहोचण्यापूर्वीच गौरव पाण्यात बुडाला. स्नेहा पुनसे ही पाण्यात गटांगळ्या खात असताना तिला वाचविण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. तर, सोलापुरच्या सांगोला तालुक्यातील कटफळमध्ये शनिवारी सायंकाळी ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रोहन प्रकाश गुंजवटे (१०), संतोष अनिल धोत्रे (१०), गोपी दत्ता माने (१२) अशी मृतांची नावे असून ही इयत्ता ५ आणि ६ वीच्या वर्गात शिकणारी मुले आहेत़ शाळा सुटल्यानंतर ती पोहण्यासाठी गेली होती. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ती बुडाली.