शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

सात टक्के महागाई भत्त्याचा केंद्राला विसर

By admin | Updated: January 10, 2015 01:51 IST

केंद्र शासनाने जुलै २०१४ ला पात्र झालेला सात टक्के महागाई भत्ता देवून सहा महिन्यांचा काळ लोटला.

वर्धा : केंद्र शासनाने जुलै २०१४ ला पात्र झालेला सात टक्के महागाई भत्ता देवून सहा महिन्यांचा काळ लोटला. असे असले तरी राज्य शासनाने सदर हफ्त्याची घोषणा न केल्याने राज्य शासनाला याबाबीचा विसर तर पडला नाही ना, अशी शंका जिल्ह्यातील कर्मचारी व्यक्त करीत आहे़निवडणुका असल्या म्हणजे शासनाला समाजातील शेतकरी, कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार यांची प्रामुख्याने आठवण असते़ आता सर्वच सार्वजनिक निवडणुका संपल्या असल्याने शासन आधी दिलेली सर्वच आश्वासने विसरल्याचे जाणवत आहे़ जेव्हा जेव्हा केंद्र शासन आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता देईल़, त्या महागाई भत्त्याचा हफ्ता जसाच्या तसाच राज्य शासन आपल्या कर्मचाऱ्यांनाही देईल, असा करार राज्य शासन व कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्यामध्ये शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना झाला होता़ त्यानुसार जानेवारी २०१४ पर्यंत राज्य शासनाने हा करार पाळला़ करार पाळताना ३४ महिन्यांचा महागाई भत्ता गहाळ केला. मागे पुढे का होईना पण पात्र झालेला महागाईचा हप्ता कर्मचाऱ्यांना दिला़ मात्र जुलै २०१४ पासून देय झालेला ७ टक्के महागाई भत्ता डिसेंबर १४ संपूनही राज्य शासनाने दिलेला नाही. त्यामुळे शासन हा भत्ता देणार की गोठविणार याबाबत शंका कर्मचारी व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)